शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

कोरोनामुळे नागपूर विभागात उद्योगांची सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:00 IST

कोरोना महामारीमुळे मार्चच्या अखेरच्या आठवड्यात नागपूर विभागातील उद्योगांची जवळपास ६ हजार कोटींची उलाढाल (विक्री) ठप्प राहिली. यामुळे ८२० कोटींचे जीएसटी कलेक्शन कमी झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे मार्चचा अखेरचा आठवडा कारखाने सुरू झाल्यानंतरच होणार करवसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीमुळे मार्चच्या अखेरच्या आठवड्यात नागपूर विभागातील उद्योगांची जवळपास ६ हजार कोटींची उलाढाल (विक्री) ठप्प राहिली. यामुळे ८२० कोटींचे जीएसटी कलेक्शन कमी झाल्याची माहिती आहे. यापैकी एकट्या बुटीबोरी इंडस्ट्रियल एरियात जवळपास १५०० कोटींची उलाढाल ठप्प राहिली. त्यातून शासनाचे जीएसटीचे १८० कोटींचे नुकसान झाले आहे. इंडस्ट्रीयल एरियामध्ये बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसी, कळमेश्वर आणि अन्य एरियातील उद्योगांचा समावेश आहे.बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सीए मिलिंद कानडे म्हणाले, लॉकडाऊन पुन्हा वाढावा, अशी कोणत्याही उद्योजकांची मनस्थिती नाही. कारण कारखाने बंद राहिल्याने सर्वच उद्योजकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय राज्य शासनाकडेही पैसा नाही. करवसुली ठप्प आहे. कारखान्यांचे लॉकडाऊन हटवून उत्पादन सुरू करण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. अनेकांच्या कारखान्यांमध्ये फिनिश उत्पादन आहेत. विक्री न झाल्याने जवळपास सर्वच कारखान्यांत १५ दिवसांचा स्टॉक पडून आहे. मार्चमध्ये बिल बनविता आले नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर यंत्राची निगा राखून कारखाने हळूहळू सुरू करावे लागतील. उत्पादन सुरळीत होण्यासाठी १५ दिवस लागणार आहेत. कारखान्यात उत्पादन सुरू झाल्यानंतरही मशीनवर कामगार दूरदूर असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार आहे. कामगारांचे पगार करायचे आहेत. त्याकरिता कारखाने सुरू होण्याची नितांत गरज आहे.बँकांची आर्थिक मदत मिळणारकानडे म्हणाले, उद्योग नव्याने सुरू करण्यासाठी लघु उद्योजकांकडे पैसे नाहीत. बँकांनी उद्योजकांना आर्थिक मदत करण्याचे रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक आले आहे. कमी व्याजदरात उद्योजकांना मदत मिळणार आहे. त्यानुसार बँकांकडून उद्योजकांना ३१ मार्चला फोन आले होते. लॉकडाऊन उठल्यानंतर ज्या उद्योजकाकडे बँकेचे एक कोटीचे खेळते भांडवल (सीसी) आहे, त्या उद्योजकाला ३० लाख रुपये बँका देणार आहेत. त्यातून कामगारांचे पगार आणि कच्च्या मालाची खरेदी होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कमी केल्याचा फायदा उद्योजकांना होणार आहे. कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू झाल्यानंतर राज्य शासनाला कर स्वरूपात महसूल मिळेल, असे कानडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :businessव्यवसाय