शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपूर-मुंबई-नागपूर सहा विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:17 IST

दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधाअतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली आहे.नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेसमध्ये नेहमीच वेटिंगची स्थिती पाहावयास मिळते. दिवाळीच्या काळात हे वेटिंग आणखीनच वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ०२०३२ नागपूर-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून शुक्रवार ९, १६ आणि २३ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सोडण्यात येईल. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१० वाजता पोहोचेल.रेल्वेगाडी क्रमांक ०२०३१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून गुरुवारी ८, ११ आणि २२ नोव्हेंबरला रात्री ११.३५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, दादर येथे थांबा देण्यात आला आहे.दोन्ही गाड्यात एकूण १२ कोच असून त्यात एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, चार स्लिपर आणि पाच साधारण द्वितीय कोच राहतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवाशांसाठी आरक्षण केंद्रावर उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर