शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपूर-मुंबई-नागपूर सहा विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:17 IST

दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधाअतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली आहे.नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेसमध्ये नेहमीच वेटिंगची स्थिती पाहावयास मिळते. दिवाळीच्या काळात हे वेटिंग आणखीनच वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ०२०३२ नागपूर-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून शुक्रवार ९, १६ आणि २३ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सोडण्यात येईल. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१० वाजता पोहोचेल.रेल्वेगाडी क्रमांक ०२०३१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून गुरुवारी ८, ११ आणि २२ नोव्हेंबरला रात्री ११.३५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, दादर येथे थांबा देण्यात आला आहे.दोन्ही गाड्यात एकूण १२ कोच असून त्यात एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, चार स्लिपर आणि पाच साधारण द्वितीय कोच राहतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवाशांसाठी आरक्षण केंद्रावर उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर