शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी सहा मृतदेह मिळाले

By admin | Updated: July 11, 2017 01:21 IST

सेल्फीच्या नादात आठ तरुणांना नागपूर नजीकच्या वेणा जलाशयात जलसमाधी मिळाली.

वेणा जलाशयात आठ तरुणांना जलसमाधी सेल्फीचा मोह नडला १३ तास चालले आॅपरेशन सर्च एकाचा शोध सुरूचलोकमत न्यूज नेटवर्कधामणा (नागपूर) : सेल्फीच्या नादात आठ तरुणांना नागपूर नजीकच्या वेणा जलाशयात जलसमाधी मिळाली. त्यातील एकाचा मृतदेह रविवारी रात्री तर सहा तरुणांचे मृतदेह सोमवारी बचाव पथकाने पाण्याबाहेर काढले. एकाचा अद्यापही शोध लागलेला नाही. नागपूर नजीकच्या वेणा जलाशयात रविवारी सायंकाळी पिकनिक करण्यासाठी १० तरुण गेले होते. जलाशयातील नावेत बसल्यानंतर त्यांना सेल्फी काढण्याचा मोह झाला. हा मोहच या तरुणांना मृत्यूच्या दाढेत पोहोचवणारा ठरला. नाव पाण्यात बुडाली नावाड्यासह तिघांना पोहता येत असल्यामुळे ते बचावले. आठ जणांचा मात्र जलाशयात बुडून मृत्यू झाला.मृतांमध्ये राहुल जाधव (रा. नवीन सुभेदार, नागपूर), अंकित अरुण भोस्कर (२२, रा. हिंगणा), परेश काटोके (रा. नागपूर), रोशन खांदारे (रा. पेठ कालडोंगरी), अक्षय मोहन खांदारे (रा. पेठ कालडोंगरी), अतुल भोयर (रा. हुडकेश्वर, नागपूर), पंकज डोईफोडे (रा. उदयनगर, नागपूर) आणि प्रतीक आमडे (रा. उदयनगर, नागपूर) या तरुणांचा समावेश आहे. नशीब बलवत्तर म्हणून अमोल मुरलीधर दोडके (२८, रा. दत्तात्रयनगर, नागपूर), रोशन मुरलीधर दोडके (रा. दत्तात्रयनगर, नागपूर) तसेच नावाडी अतुल ज्ञानेश्वर बावणे (२१, रा. पेठ कालडोंगरी) हे तिघे बचावले. राहुलचा मृतदेह रविवारी रात्री गवसला तर अंकित, परेश, रोशन, अक्षय व प्रतीक यांचे मृतदेह सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आणि पंकजचा मृतदेह सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पाण्याबाहेर काढण्यात आला. अतुलला शोधण्याचे कार्य सुरूच होते. रविवारी सुटी असल्याने हे सर्वजण वेणा जलाशय परिसरात पिकनिकला गेले होते. सर्वजण मौजमस्ती करण्याच्या मुडमध्ये असल्यामुळे त्यांना नावेत बसून जलविहार करण्याचा मोह अनावर झाला.त्यानुसार सर्व जण एकाच नावेत बसून जलाशयात निघाले. नावेत अतिरिक्त वजन झाल्याने त्यातच सेल्फी काढण्यासाठी त्यांनी इकडे - तिकडे हालचाली केल्यामुळे ही नाव डगमगली आणि काही कळायच्या आतच नावेतील सर्वच्या सर्व पाण्यात बुडाले. माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांसह महसूल विभागातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लगेच स्थानिक मासेमाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. दरम्यान, पोहणे येत असल्यामुळे अमोल दोडके, रोशन दोडके व अतुल बावणे पाण्याबाहेर आले. तर काही वेळेनंतर राहुलचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. अंधार वाढल्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी ७.३० वाजतापासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. सकाळी ८.२० वाजताच्या सुमारास अंकितचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाने बाहेर काढला. त्यानंतर रोशन, परेश, अक्षय व प्रतीकचा मृतदेह आढळला. अतुल भोयरला शोधण्याचे कार्य सायंकाळपर्यंत सुरूच होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास उलटलेली नाव शोधून काढण्यात आली. सातही जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह महसूल व पाटबंधारे भागातील अधिकारी दिवसभर घटनास्थळी तळ ठोकून होते. मृतांच्या आप्तस्वकीयांसह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, नगरसेवक अभय गोटेकर, विलास करांगळे यांनीही घटनास्थळाला भेट दिली.एसडीआरएफ पथकाची गैरसोयबुडालेल्या तरुणांना शोधण्यासाठी एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड)च्या नागपूर येथील पथकाला बोलावण्यात आले होते. शिवाय, जगदीश खरे यांचीही विशेष मदत घेण्यात आली. बचाव पथक व जगदीश खरे सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी या पथकातील सदस्यांना साधा नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय करून देण्यात आली नाही. प्रशासनाची तत्परता, नौदल कमांडरची घेतली मदत रविवारी सायंकाळची घटना. परंतु ती जवळपास ८.३० वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती होताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवित गतीने पावले उचलली. प्रशासनाच्या निर्देशानुसार एसडीओ, तहसीलदार हे घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे त्यांच्याकडून मिनिट-टू-मिनिट माहिती घेत होते आणि आवश्यक ते निर्देश देत होते. रात्र असल्याने शोध कार्यात अडचणी आल्या.८ पैकी केवळ एकाचाच मृतदेह काढता आला. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. एसडीओ व तहसीलदारांसह अधिकारी उशिरापर्यंत घटनास्थळी होते. बुडलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात आली. नौदल कमांडर नायर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ते कामठीला होते. त्यांना विनंती करण्यात आली. त्यांना तातडीने घटनास्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली. नौदल कमांडर नायर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू झाले. तीन तरुणांना वाचवता आले. तसेच ज्या तरुणांचा मृतदेह बाहेर निघाला, त्यांना तातडीने कळमेश्वर येथील रुग्णालयात पाठवून त्याचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांना मृतदेह स्वाधीन करण्यात आला.तेथेही धावून गेले जगदीश खरेजगदीश खरे हे नाव नागपूरकरांसाठी नवीन नाही. गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्यांचे मृतदेह काढणारी एकमेव व्यक्ती म्हणजे जगदीश. त्यांनी आजवर अनेकांचे जीवही वाचविले आहे. वेणा नदीतील घटनेनंतर जगदीश खरेंशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी ते तिथेही धावून गेले. पालकमंत्र्यांनी दिली भेटघटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दुपारी घटनास्थळाला भेट देत बचाव पथकाद्वारे सुरू असलेल्या शोधकार्याचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अतुल व पंकजला शोधण्यात स्थानिक बचाव पथकाना यश आले नाही तर पुणे येथून एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स)च्या पथकाला बोलावण्यात येईल. तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. घटनास्थळी आ. डॉ. आशिष देशमुख, आ. प्रकाश गजभिये, सलील देशमुख, नाना गावंडे आदींनी भेट दिली. अक्षय हा एकुलता एक मुलगामोहन खांदारे हे पेठ (कालडोंगरी)चे माजी सरपंच असून, अक्षय हा त्यांचा एकुलता एक मुलगा होय. अक्षयला काळाने हिरावून नेल्याने खांदारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहन खांदारे यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. ते अजूनही माठ घडवून विकण्याचा व्यवसाय करीत असून, याच व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सख्खे भाऊ बचावलेवेणा जलाशय परिसरात मित्रांसह पिकनिकसाठी गेलेल्यांमध्ये अमोल मुरलीधर दोडके आणि रोशन मुरलीधर दोडके या दोन सख्ख्या भावांचाही समावेश होता. जलाशयातील नावेमध्ये ते दोघेही बसले होते. जलाशयात ती नाव बुडाली. मात्र या दोन्ही भावांना पोहणे येत असल्याने ते कसेबसे पाण्याबाहेर निघाले. मित्रांना जलसमाधी मिळाल्याने या दोन्ही भावांना जबर मानसिक धक्का बसला.