शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सहा एकरातील काेबीचे पीक खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामामुळे राेडवरील पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडसर निर्माण झाला आणि पाणी शेतात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामामुळे राेडवरील पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडसर निर्माण झाला आणि पाणी शेतात शिरले. या पाण्यामुळे सहा एकरातील काेबीचे पीक खराब झाले. हा प्रकार कळमेश्वर तालुक्यात नुकताच घडला.

कळमेश्वर-नागपूर मार्गावरील रेल्वे फाटकाजवळील वाहतूककाेंडी साेडविण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिज निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या रेल्वे ओव्हरब्रिजचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी कंत्राटदार कंपनीने राेडच्या दाेन्ही बाजूंनी पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खाेदल्या आहेत. या नाल्यांलगत शेती आहे.

या नाल्या समतल नसल्याने, त्यातून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी त्यात तुंबून राहते. कळमेश्वर तालुक्यात आठवडाभरापासून पावसाच्या सरी काेसळत आहेत. त्यामुळे या दाेन्ही नाल्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. यातील एका नालीतील पाणी संजय जयस्वाल, रा.कळमेश्वर या शेतात झिरपले. त्यामुळे त्यांच्या शेतात दलदल तयार झाल्याने सहा एकरातील काेबीचे पीक खराब झाले आहे. यावर रेल्वे प्रशासन व कंत्राटदार कंपनीने तातडीने प्रभावी उपाययाेजना कराव्या व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

जबाबदारी स्वीकारणार काेण?

या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. वास्तवात, ते काम एका वर्षात पूर्ण करावयाचे हाेते. या नाल्याही दीड वर्षापूर्वीच खाेदण्यात आल्या. त्या अपूर्ण असून, समतल नाहीत. या नाल्यांमधील पाणी सलग दुसऱ्याही वर्षी शेतात माेठ्या प्रमाणात झिरपल्याने शेत पाणथळ झाले आहे. त्यामुळे या शेतात पुढील काही वर्षे चांगले पीक येण्याची शक्यता मावळली आहे. यात शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत असल्याने, याची जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्नही संजय जयस्वाल यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केला आहे.