शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

सहा एकरातील काेबीचे पीक खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामामुळे राेडवरील पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडसर निर्माण झाला आणि पाणी शेतात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामामुळे राेडवरील पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडसर निर्माण झाला आणि पाणी शेतात शिरले. या पाण्यामुळे सहा एकरातील काेबीचे पीक खराब झाले. हा प्रकार कळमेश्वर तालुक्यात नुकताच घडला.

कळमेश्वर-नागपूर मार्गावरील रेल्वे फाटकाजवळील वाहतूककाेंडी साेडविण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिज निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या रेल्वे ओव्हरब्रिजचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी कंत्राटदार कंपनीने राेडच्या दाेन्ही बाजूंनी पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खाेदल्या आहेत. या नाल्यांलगत शेती आहे.

या नाल्या समतल नसल्याने, त्यातून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी त्यात तुंबून राहते. कळमेश्वर तालुक्यात आठवडाभरापासून पावसाच्या सरी काेसळत आहेत. त्यामुळे या दाेन्ही नाल्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. यातील एका नालीतील पाणी संजय जयस्वाल, रा.कळमेश्वर या शेतात झिरपले. त्यामुळे त्यांच्या शेतात दलदल तयार झाल्याने सहा एकरातील काेबीचे पीक खराब झाले आहे. यावर रेल्वे प्रशासन व कंत्राटदार कंपनीने तातडीने प्रभावी उपाययाेजना कराव्या व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

जबाबदारी स्वीकारणार काेण?

या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. वास्तवात, ते काम एका वर्षात पूर्ण करावयाचे हाेते. या नाल्याही दीड वर्षापूर्वीच खाेदण्यात आल्या. त्या अपूर्ण असून, समतल नाहीत. या नाल्यांमधील पाणी सलग दुसऱ्याही वर्षी शेतात माेठ्या प्रमाणात झिरपल्याने शेत पाणथळ झाले आहे. त्यामुळे या शेतात पुढील काही वर्षे चांगले पीक येण्याची शक्यता मावळली आहे. यात शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत असल्याने, याची जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्नही संजय जयस्वाल यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केला आहे.