शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘सर, मला ऑनलाईन शिक्षण परवडत नाही हो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याची झळ लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोसावी लागत आहे. घरातील परिस्थिती मुलांना ...

नागपूर : कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याची झळ लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोसावी लागत आहे. घरातील परिस्थिती मुलांना अस्वस्थ करीत असून, त्यांनी बाल हट्टही सोडले आहेत. घरात भासत असलेल्या आर्थिक चणचणीपोटी सहाव्या वर्गातील एका विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांना पत्र लिहून, ‘सर, मला ऑनलाईन शिक्षण परवडत नाही हो...’ अशी खंत व्यक्त केली आहे. सहाव्या वर्गातील या विद्यार्थिनीचे मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे पत्र वाचून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतोय.

लोकमत प्रतिनिधीला हे पत्र मिळाले. ही विद्यार्थिनी श्री सत्यसाई विद्यामंदिर, अंबिकानगर, नरसाळा रोड येथील सहाव्या वर्गात शिकणारी आहे. इशिका भाजे असे तिचे नाव. यासंदर्भात शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आले की, इशिका काही दिवसांपासून शाळेत सुरू असलेल्या ऑनलाईन वर्गात उपस्थित राहत नव्हती. तेव्हा शिक्षकांनी तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून कारण विचारण्यास सांगितले. तर इशिकाने मुख्याध्यापकांच्या नावाने स्वत:च्या हस्ताक्षरात पत्रच पाठविले. पत्रात तिने सांगितले की माझ्या आई-वडिलांचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे कमावण्याचे साधन कुठलेच नाही. आम्ही दोन भावंडे आहोत, ऑनलाईन शिक्षणासाठी दोघांसाठी दोन मोबाईल विकत घ्यावे लागले. पण रिचार्जचा खर्च महिन्याला ८०० ते १००० रुपये येतो आहे. हा खर्च नियमित शाळेत सुद्धा होत नाही. वडिलांचा रोजगार बंद असल्यामुळे इतका खर्च आम्हाला शक्य नाही. आम्हाला परवडेल अशी उपाययोजना आपण करावी, शाळेला अडचण असेल तर शासनातर्फे काही मदत होईल का? असाही प्रश्न तिने उपस्थित केला.

- इशिकाचे पत्र मिळाल्यानंतर वाईट वाटले. ती हुशार मुलगी आहे. आम्ही तिला नक्कीच मदत करणार आहे. तिच्या अडचणी सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

निलेश सोनटक्के, मुख्याध्यापक, श्री सत्यसाई विद्यामंदिर

ईशिकाचे पत्र एक उदाहरण आहे

ही बातमी केवळ इशिकाची नाही. इशिकासारखे अनेक विद्यार्थी आज शिक्षणापासून दूर जात आहेत. त्यामुळे इशिकाच्या पत्राची दखल घेण्याची गरज आहे. आरटीईचा कायदा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आहे. इशिकासारख्या अनेकांसाठी मोफत शिक्षणाची सोय होणे गरजेचे आहे.