शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

‘सर, मला ऑनलाईन शिक्षण परवडत नाही हो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याची झळ लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोसावी लागत आहे. घरातील परिस्थिती मुलांना ...

नागपूर : कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याची झळ लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोसावी लागत आहे. घरातील परिस्थिती मुलांना अस्वस्थ करीत असून, त्यांनी बाल हट्टही सोडले आहेत. घरात भासत असलेल्या आर्थिक चणचणीपोटी सहाव्या वर्गातील एका विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांना पत्र लिहून, ‘सर, मला ऑनलाईन शिक्षण परवडत नाही हो...’ अशी खंत व्यक्त केली आहे. सहाव्या वर्गातील या विद्यार्थिनीचे मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे पत्र वाचून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतोय.

लोकमत प्रतिनिधीला हे पत्र मिळाले. ही विद्यार्थिनी श्री सत्यसाई विद्यामंदिर, अंबिकानगर, नरसाळा रोड येथील सहाव्या वर्गात शिकणारी आहे. इशिका भाजे असे तिचे नाव. यासंदर्भात शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आले की, इशिका काही दिवसांपासून शाळेत सुरू असलेल्या ऑनलाईन वर्गात उपस्थित राहत नव्हती. तेव्हा शिक्षकांनी तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून कारण विचारण्यास सांगितले. तर इशिकाने मुख्याध्यापकांच्या नावाने स्वत:च्या हस्ताक्षरात पत्रच पाठविले. पत्रात तिने सांगितले की माझ्या आई-वडिलांचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे कमावण्याचे साधन कुठलेच नाही. आम्ही दोन भावंडे आहोत, ऑनलाईन शिक्षणासाठी दोघांसाठी दोन मोबाईल विकत घ्यावे लागले. पण रिचार्जचा खर्च महिन्याला ८०० ते १००० रुपये येतो आहे. हा खर्च नियमित शाळेत सुद्धा होत नाही. वडिलांचा रोजगार बंद असल्यामुळे इतका खर्च आम्हाला शक्य नाही. आम्हाला परवडेल अशी उपाययोजना आपण करावी, शाळेला अडचण असेल तर शासनातर्फे काही मदत होईल का? असाही प्रश्न तिने उपस्थित केला.

- इशिकाचे पत्र मिळाल्यानंतर वाईट वाटले. ती हुशार मुलगी आहे. आम्ही तिला नक्कीच मदत करणार आहे. तिच्या अडचणी सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

निलेश सोनटक्के, मुख्याध्यापक, श्री सत्यसाई विद्यामंदिर

ईशिकाचे पत्र एक उदाहरण आहे

ही बातमी केवळ इशिकाची नाही. इशिकासारखे अनेक विद्यार्थी आज शिक्षणापासून दूर जात आहेत. त्यामुळे इशिकाच्या पत्राची दखल घेण्याची गरज आहे. आरटीईचा कायदा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आहे. इशिकासारख्या अनेकांसाठी मोफत शिक्षणाची सोय होणे गरजेचे आहे.