शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब, ‘पीडब्ल्यूडी’ला ही फोडला घाम !

By admin | Updated: November 30, 2015 02:29 IST

जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजहितासाठी लढा देणारे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. त्यांची आत्महत्या अनेकांना धक्का देणारी आहे.

लढवय्ये वकील खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला : समाजहितासाठी अखेरपर्यंत झटलेनागपूर : जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजहितासाठी लढा देणारे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. त्यांची आत्महत्या अनेकांना धक्का देणारी आहे. मात्र त्यांचे काम नागपूरकरांच्या स्मरणात राहील. राज्य शासनाने ज्या दोन जनहित याचिकांमुळे सिंचन घोटाळ्याची एसीबी चौकशी करण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी एका जनहित याचिकेचे कामकाज अ‍ॅड. खंडाळकर यांनी पाहिले होते.हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे यश होय. याशिवाय त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) सुमारे ११९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भातील जनहित याचिकेत मध्यस्थी अर्ज दाखल केला होता. या याचिकेमुळे शासनाला दोषी अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध कारवाई करावी लागली. महाराष्ट्र भूमी अभिलेख नागपूर विभागातील गैरव्यवहार खंडाळकर यांच्या याचिकेमुळे प्रकाशात आला होता. ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक उमेश चौबे यांनी अ‍ॅड. खंडाळकर यांच्यामार्फत अनेक जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या दोघांनी बुटीबोरी ‘एमआयडीसी’च्या प्रवेशद्वारापुढे प्रस्तावित उड्डाण पुलाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. यामुळे २०१३ पासून या उड्डाणपुलाचे घोडे पुढे सरकू शकले नाही. शेवटी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समाधानकारक स्पष्टीकरण सादर केल्यामुळे ही याचिका यावर्षी खारीज झाली. याशिवाय डेंग्यू या घातक आजारासाठी कारणीभूत ठरत असलेली शहरातील अस्वच्छता, रामटेक तालुक्यातील मौजा सत्रापूर येथे १ लाखावर वृक्षांची अवैध कत्तल, कोराडी रोडवरील मानकापूर उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या समस्या, भोकारा नाल्यावरील अतिक्रमण, उपराजधानीतील सार्वजनिक भूखंडांच्या दुरुपयोगामुळे शासनाचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान, आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी पतसंस्थांतील घोटाळ्याची चौकशी व दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, बनावट कागदपत्रे सादर करून कोळशाच्या कोट्याची अवैधरीत्या उचल, शहरातील कोल्ड स्टोअरेजमधील गैरव्यवहार, खापा आणि माहुरझरी वनपरिक्षेत्रातील अवैध खनन व वृक्षतोड, उमरेड व भिवापूर सामाजिक वनीकरण विभागात मनरेगा योजनेंतर्गत झालेला आर्थिक गैरव्यवहार अशा विषयांवर खंडाळकर यांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत.(प्रतिनिधी)