शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब, ‘पीडब्ल्यूडी’ला ही फोडला घाम !

By admin | Updated: November 30, 2015 02:29 IST

जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजहितासाठी लढा देणारे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. त्यांची आत्महत्या अनेकांना धक्का देणारी आहे.

लढवय्ये वकील खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला : समाजहितासाठी अखेरपर्यंत झटलेनागपूर : जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजहितासाठी लढा देणारे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. त्यांची आत्महत्या अनेकांना धक्का देणारी आहे. मात्र त्यांचे काम नागपूरकरांच्या स्मरणात राहील. राज्य शासनाने ज्या दोन जनहित याचिकांमुळे सिंचन घोटाळ्याची एसीबी चौकशी करण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी एका जनहित याचिकेचे कामकाज अ‍ॅड. खंडाळकर यांनी पाहिले होते.हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे यश होय. याशिवाय त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) सुमारे ११९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भातील जनहित याचिकेत मध्यस्थी अर्ज दाखल केला होता. या याचिकेमुळे शासनाला दोषी अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध कारवाई करावी लागली. महाराष्ट्र भूमी अभिलेख नागपूर विभागातील गैरव्यवहार खंडाळकर यांच्या याचिकेमुळे प्रकाशात आला होता. ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक उमेश चौबे यांनी अ‍ॅड. खंडाळकर यांच्यामार्फत अनेक जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या दोघांनी बुटीबोरी ‘एमआयडीसी’च्या प्रवेशद्वारापुढे प्रस्तावित उड्डाण पुलाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. यामुळे २०१३ पासून या उड्डाणपुलाचे घोडे पुढे सरकू शकले नाही. शेवटी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समाधानकारक स्पष्टीकरण सादर केल्यामुळे ही याचिका यावर्षी खारीज झाली. याशिवाय डेंग्यू या घातक आजारासाठी कारणीभूत ठरत असलेली शहरातील अस्वच्छता, रामटेक तालुक्यातील मौजा सत्रापूर येथे १ लाखावर वृक्षांची अवैध कत्तल, कोराडी रोडवरील मानकापूर उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या समस्या, भोकारा नाल्यावरील अतिक्रमण, उपराजधानीतील सार्वजनिक भूखंडांच्या दुरुपयोगामुळे शासनाचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान, आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी पतसंस्थांतील घोटाळ्याची चौकशी व दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, बनावट कागदपत्रे सादर करून कोळशाच्या कोट्याची अवैधरीत्या उचल, शहरातील कोल्ड स्टोअरेजमधील गैरव्यवहार, खापा आणि माहुरझरी वनपरिक्षेत्रातील अवैध खनन व वृक्षतोड, उमरेड व भिवापूर सामाजिक वनीकरण विभागात मनरेगा योजनेंतर्गत झालेला आर्थिक गैरव्यवहार अशा विषयांवर खंडाळकर यांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत.(प्रतिनिधी)