शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब, ‘पीडब्ल्यूडी’ला ही फोडला घाम !

By admin | Updated: November 30, 2015 02:29 IST

जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजहितासाठी लढा देणारे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. त्यांची आत्महत्या अनेकांना धक्का देणारी आहे.

लढवय्ये वकील खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला : समाजहितासाठी अखेरपर्यंत झटलेनागपूर : जनहित याचिकाच्या माध्यमातून समाजहितासाठी लढा देणारे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबला. त्यांची आत्महत्या अनेकांना धक्का देणारी आहे. मात्र त्यांचे काम नागपूरकरांच्या स्मरणात राहील. राज्य शासनाने ज्या दोन जनहित याचिकांमुळे सिंचन घोटाळ्याची एसीबी चौकशी करण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी एका जनहित याचिकेचे कामकाज अ‍ॅड. खंडाळकर यांनी पाहिले होते.हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे यश होय. याशिवाय त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) सुमारे ११९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भातील जनहित याचिकेत मध्यस्थी अर्ज दाखल केला होता. या याचिकेमुळे शासनाला दोषी अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध कारवाई करावी लागली. महाराष्ट्र भूमी अभिलेख नागपूर विभागातील गैरव्यवहार खंडाळकर यांच्या याचिकेमुळे प्रकाशात आला होता. ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक उमेश चौबे यांनी अ‍ॅड. खंडाळकर यांच्यामार्फत अनेक जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या दोघांनी बुटीबोरी ‘एमआयडीसी’च्या प्रवेशद्वारापुढे प्रस्तावित उड्डाण पुलाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. यामुळे २०१३ पासून या उड्डाणपुलाचे घोडे पुढे सरकू शकले नाही. शेवटी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समाधानकारक स्पष्टीकरण सादर केल्यामुळे ही याचिका यावर्षी खारीज झाली. याशिवाय डेंग्यू या घातक आजारासाठी कारणीभूत ठरत असलेली शहरातील अस्वच्छता, रामटेक तालुक्यातील मौजा सत्रापूर येथे १ लाखावर वृक्षांची अवैध कत्तल, कोराडी रोडवरील मानकापूर उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या समस्या, भोकारा नाल्यावरील अतिक्रमण, उपराजधानीतील सार्वजनिक भूखंडांच्या दुरुपयोगामुळे शासनाचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान, आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी पतसंस्थांतील घोटाळ्याची चौकशी व दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, बनावट कागदपत्रे सादर करून कोळशाच्या कोट्याची अवैधरीत्या उचल, शहरातील कोल्ड स्टोअरेजमधील गैरव्यवहार, खापा आणि माहुरझरी वनपरिक्षेत्रातील अवैध खनन व वृक्षतोड, उमरेड व भिवापूर सामाजिक वनीकरण विभागात मनरेगा योजनेंतर्गत झालेला आर्थिक गैरव्यवहार अशा विषयांवर खंडाळकर यांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत.(प्रतिनिधी)