शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘नोटाबंदी’मुळे अर्थव्यवस्थेची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:47 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विरोधकांकडून काळा दिवस पाळण्यात येत असताना, भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी शहरभरात आर्थिक विजय दिवस साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देभाजपाने साजरा केला ‘आर्थिक विजय दिवस’ : काळ्या पैशाचा केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विरोधकांकडून काळा दिवस पाळण्यात येत असताना, भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी शहरभरात आर्थिक विजय दिवस साजरा करण्यात आला. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे अभिनंदन सभांचे आयोजन करण्यात आले होते. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली असून, काळ्या पैशाविरोधातील या लढ्याला सामान्यांचीदेखील साथ लाभली असल्याचा पदाधिकाºयांचा सूर होता. विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये खा. अजय संचेती, आ. गिरीश व्यास तसेच शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.शहरातील सर्व मंडळांमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले. दक्षिण पश्चिमची सभा प्रतापनगर चौक, मध्य नागपूरची सभा भारतमाता चौक, उत्तर नागपूरची सभा कमाल चौक, पूर्व नागपूरची सभा हिवरीनगर येथील भीम चौक, दक्षिण मंडळाची सभा सक्करदरा चौक तर पश्चिम नागपुरच्या सभेचे आयोजन रामनगर चौकात करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी गृहसंपर्कदेखील साधला.काँग्रेसने नैतिक अधिकार गमावला आहे : अजय संचेतीपश्चिम नागपुरात रामनगर चौकात भाजपतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा.अजय संचेती यांनी उपस्थितांना संबोधित केले. गेल्या ६५ वर्षांत देशामध्ये काँग्रेस व इतर मित्र पक्षांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला खिंडार पाडले. नकली नोटांवर नियंत्रण आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाने उचललेले ऐतिहासिक पाऊल अर्थव्यवस्थेला निश्चित मजबूत करणारे आहे. नोटाबंदीनंतर जनतेनेदेखील या निर्णयाला स्वीकारले. मात्र काळ्या पैशाने तिजोरी भरून ठेवलेल्या काँग्रेससह इतर पक्षांना हे रुचले नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुकांमधील निकालांनी जनतेची भावना समोर आणलीच. त्यामुळे काँग्रेसने आता नैतिक अधिकारच गमावला आहे, असे अजय संचेती म्हणाले. भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष किशन गावंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता, भूषण शिंगणे हेदेखील उपस्थित होते. सतीश वडे यांनी आभार मानले.मध्य नागपूर भाजपतर्फे भारतमाता चौक येथे नोटाबंदीसाठी अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले होते. आ.गिरीश व्यास व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी या सभेला संबोधित केले. संपुआच्या काळात काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद यांचे प्रमाण टोकाला गेले होते. मात्र नोटाबंदीच्या एका निर्णयाने या सर्वांवर नियंत्रण आले. अर्थव्यवस्थेला नोटाबंदीने सांभाळले असून, एक नवी सुरुवात झाली आहे. कोट्यवधी लोकांनी याला आनंदाने स्वीकारले, असे व्यास म्हणाले. यावेळी उपमहापौर, माजी महापौर अर्चना डेहनकर, मध्य मंडळ भाजपचे अध्यक्ष सुधीर ऊर्फ बंडू राऊत, महामंत्री किशोर पलांदूरकर, विलास त्रिवेदी, हाजी अब्दुल कादीर, अश्फाक पटेल, वंदना यंगटवार, राजेश घोडपागे, बाळू बांते, श्याम चांदेकर, राहुल खंगार, दीपांशु लिंगायत, दशरथ मस्के, अशोक नायक, सरला नायक, प्रमोद दहिकर, संजय महाजन, सचिन राठोड, गोपाल बनकर, सुमेधा देशपांडे, शकुंतला पारवे, आशिष पारधी इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अमोल ठाकरे यांनी संचालन केले तर कल्पक भनारकर यांनी आभार मानले.अर्थव्यवस्थेला नवी दिशा : कृष्णा खोपडेपूर्व नागपूर मंडळातर्फे हिवरीनगर येथील भीम चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.कृष्णा खोपडे यांनी संबोधन केले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवीन दिशा मिळाली आहे. दहशतवाद, काळा पैसा यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आहे. काँग्रेसच्या नेत्यांचे या निर्णयामुळे वैयक्तिक नुकसान झाले. त्यामुळे ते काळा दिवस पाळत आहेत, असे खोपडे म्हणाले. यावेळी मंचावर प्रमोद पेंडके, महेंद्र राऊत, बंटी कुकडे, धर्मपाल मेश्राम, हरीश दिकोंडवार, प्रदीप पोहाणे, राजकुमार सेलोकर,दीपक वाडीभस्मे,वंदना भुरे प्रामुख्याने उपस्थित होते. बाल्या रारोकर यांनी संचालन केले, तर संजय अवचट यांनी आभार मानले.आमदारांकडे इतर मतदारसंघांची जबाबदारीदरम्यान, बुधवारी झालेल्या कार्यक्रमांमध्ये शहरातील काही आमदारांची उपस्थिती नव्हती. याचे कारण म्हणजे प्रत्येक आमदाराकडे राज्यातील इतर मतदारसंघातील कार्यक्रम व सभांची जबाबदारी देण्यात आली होती. शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे हे परभणीत होते. तर काही आमदार मुंबईच्या जवळील मतदारसंघांमध्ये होते, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख चंदन गोस्वामी यांनी दिली.