शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुंबईत अधिवेशन गेल्यावरदेखील विदर्भातील मंत्र्यांचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 07:00 IST

Nagpur News नागपुरात अधिवेशन घेण्याबाबत राज्य शासनाने परत एकदा घूमजाव केले असून, विदर्भाला परत डावलण्यात आले आहे. याबाबत विरोधकांसह विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक अस्मिता केवळ भाषणांपुरतीच का? विरोधक, विदर्भवाद्यांकडून नाराजीचा सूर

नागपूर : नागपुरात अधिवेशन घेण्याबाबत राज्य शासनाने परत एकदा घूमजाव केले असून, विदर्भाला परत डावलण्यात आले आहे. याबाबत विरोधकांसह विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचा सूर असून, विदर्भातील मंत्री व लोकप्रतिनिधींनी यावर मौन का धारण केले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारमध्ये विदर्भातील मोठे मंत्री असतानादेखील डोळ्यांदेखत नागपूरवरील अन्याय होत असल्याची बाब निश्चितच दुर्दैवी असल्याची जनभावना आहे.

कोरोनामुळे नागपुरात २०२० चे हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. त्यानंतर २०२१ मधील एखादे अधिवेशन होईल, अशी अपेक्षा होती; मात्र असे काहीच झाले नाही. मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनातच अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता कोरोनाच्या नावाखाली परत अधिवेशन मुंबईतच घेण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे मंत्री विदर्भातील आहेत. असे असतानादेखील विदर्भात अधिवेशन घ्यावे, अशी आग्रही भूमिका या नेत्यांना मांडता आली नाही. विशेष म्हणजे अधिवेशनाबाबत घोषणा झाल्यानंतर एकानेही यावर भाष्य केलेले नाही. विदर्भातील अनुशेष, येथील प्रलंबित समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर नागपुरातील अधिवेशनातच योग्य चर्चा होऊ शकते याची या नेत्यांना जाण असतानादेखील त्यांनी सरकारदरबारी आग्रही भूमिका का घेतली नाही व त्यांची प्रादेशिक अस्मिता भाषणांपुरतीच असते का, असे सवाल विदर्भवाद्यांकडून उपस्थित होत आहेत.

नागपूर कराराचा उघडपणे भंग

राज्यकर्त्यांनी आजपर्यंत विदर्भावर अन्यायच केला. गेल्या दोन वर्षांपासून नागपूर कराराचा उघडपणे भंग करून नागपुरात अधिवेशन घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. सरकारला विदर्भातील समस्या दिसताच की नाही, हा प्रश्नच आहे. आता सरकारने विदर्भात येऊच नये. येथे अधिवेशन घेऊदेखील नका, आम्हाला वेगळा विदर्भ द्या.

- वामनराव चटप, ज्येष्ठ विदर्भवादी नेते

सरकारला विदर्भातील लोक आपले वाटतच नाहीत

कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांना विदर्भाशी काहीच घेणेदेणे नाही. त्यांच्यासाठी मुंबई, पश्चिम महाराष्ट्र हेच भाग महत्त्वाचे आहेत. नागपुरात अधिवेशन झाले तर येथील समस्यांवर उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाहीत. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी विदर्भाकडे परत एकदा पाठ फिरविण्यात आली आहे.

- प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

मंत्र्यांना विदर्भ नव्हे, स्वत:चे पद महत्त्वाचे

नागपुरात मागील दोन वर्षांपासून अधिवेशनाचे एकही सत्र घेण्यात आलेले नाही हा विदर्भाचा अपमान आहे. कोरोनाचा संसर्गदेखील घटला आहे. विदर्भातील मंत्री स्वार्थी असून, मंत्रिमंडळातील स्थान टिकविण्यासाठी ते मौन बाळगून आहेत. त्यांना विदर्भापेक्षा स्वत:चे पद महत्त्वाचे आहे.

- कृष्णा खोपडे, भाजप आमदार

टॅग्स :Politicsराजकारण