शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुंबईत अधिवेशन गेल्यावरदेखील विदर्भातील मंत्र्यांचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 07:00 IST

Nagpur News नागपुरात अधिवेशन घेण्याबाबत राज्य शासनाने परत एकदा घूमजाव केले असून, विदर्भाला परत डावलण्यात आले आहे. याबाबत विरोधकांसह विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक अस्मिता केवळ भाषणांपुरतीच का? विरोधक, विदर्भवाद्यांकडून नाराजीचा सूर

नागपूर : नागपुरात अधिवेशन घेण्याबाबत राज्य शासनाने परत एकदा घूमजाव केले असून, विदर्भाला परत डावलण्यात आले आहे. याबाबत विरोधकांसह विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचा सूर असून, विदर्भातील मंत्री व लोकप्रतिनिधींनी यावर मौन का धारण केले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारमध्ये विदर्भातील मोठे मंत्री असतानादेखील डोळ्यांदेखत नागपूरवरील अन्याय होत असल्याची बाब निश्चितच दुर्दैवी असल्याची जनभावना आहे.

कोरोनामुळे नागपुरात २०२० चे हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. त्यानंतर २०२१ मधील एखादे अधिवेशन होईल, अशी अपेक्षा होती; मात्र असे काहीच झाले नाही. मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनातच अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता कोरोनाच्या नावाखाली परत अधिवेशन मुंबईतच घेण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे मंत्री विदर्भातील आहेत. असे असतानादेखील विदर्भात अधिवेशन घ्यावे, अशी आग्रही भूमिका या नेत्यांना मांडता आली नाही. विशेष म्हणजे अधिवेशनाबाबत घोषणा झाल्यानंतर एकानेही यावर भाष्य केलेले नाही. विदर्भातील अनुशेष, येथील प्रलंबित समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर नागपुरातील अधिवेशनातच योग्य चर्चा होऊ शकते याची या नेत्यांना जाण असतानादेखील त्यांनी सरकारदरबारी आग्रही भूमिका का घेतली नाही व त्यांची प्रादेशिक अस्मिता भाषणांपुरतीच असते का, असे सवाल विदर्भवाद्यांकडून उपस्थित होत आहेत.

नागपूर कराराचा उघडपणे भंग

राज्यकर्त्यांनी आजपर्यंत विदर्भावर अन्यायच केला. गेल्या दोन वर्षांपासून नागपूर कराराचा उघडपणे भंग करून नागपुरात अधिवेशन घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. सरकारला विदर्भातील समस्या दिसताच की नाही, हा प्रश्नच आहे. आता सरकारने विदर्भात येऊच नये. येथे अधिवेशन घेऊदेखील नका, आम्हाला वेगळा विदर्भ द्या.

- वामनराव चटप, ज्येष्ठ विदर्भवादी नेते

सरकारला विदर्भातील लोक आपले वाटतच नाहीत

कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांना विदर्भाशी काहीच घेणेदेणे नाही. त्यांच्यासाठी मुंबई, पश्चिम महाराष्ट्र हेच भाग महत्त्वाचे आहेत. नागपुरात अधिवेशन झाले तर येथील समस्यांवर उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाहीत. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी विदर्भाकडे परत एकदा पाठ फिरविण्यात आली आहे.

- प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

मंत्र्यांना विदर्भ नव्हे, स्वत:चे पद महत्त्वाचे

नागपुरात मागील दोन वर्षांपासून अधिवेशनाचे एकही सत्र घेण्यात आलेले नाही हा विदर्भाचा अपमान आहे. कोरोनाचा संसर्गदेखील घटला आहे. विदर्भातील मंत्री स्वार्थी असून, मंत्रिमंडळातील स्थान टिकविण्यासाठी ते मौन बाळगून आहेत. त्यांना विदर्भापेक्षा स्वत:चे पद महत्त्वाचे आहे.

- कृष्णा खोपडे, भाजप आमदार

टॅग्स :Politicsराजकारण