शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याबाबत मौन

By admin | Updated: November 28, 2014 01:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऐनवेळी परीक्षा ‘पोस्टपोन’ का केल्या यासंदर्भात गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु आपल्या चुकांवर

विद्वत् परिषदेत मुद्दा उपस्थित : ‘अ‍ॅकेडमिक कॅलेंडर’चे पालन का नाही?नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऐनवेळी परीक्षा ‘पोस्टपोन’ का केल्या यासंदर्भात गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु आपल्या चुकांवर पांघरुण टाकण्यासाठी प्रशासनाने यासंदर्भात मौन बाळगले आणि सभागृहाला पूर्ण माहिती देणे शक्य नसल्याचे सांगितले. परीक्षा विभागातील काही माजी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यापीठाला ‘सीबीएस’ पद्धतीच्या सर्व परीक्षा ‘पोस्टपोन’ कराव्या लागल्या. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा २६ नोव्हेंबरला सुरू झाल्या. अनेक ‘पेपर्स’चे ‘मॉडरेशन’च झाले नसल्याने परीक्षा विभागाची अडचण झाली अशी माहिती सूत्रांनी दिली होती.यासंदर्भात विद्वत् परिषदेत सदस्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे नेमके कारण काय याची विचारणा केली. विद्वत् परिषदेकडून ‘अ‍ॅकेडमिक कॅलेंडर’ तयार करण्यात येते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. परीक्षांचे वेळापत्रक बदलताना विद्यापीठाने संबंधित शाखांच्या अधिष्ठात्यांनादेखील विचारणा करण्याचे सौजन्य का दाखवले नाही असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. २२० पैकी ९८ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती यावेळी प्रशासनाने दिली. परंतु विद्यापीठाने परीक्षा समोर का ढकलण्यात आल्या यासंदर्भात सभागृहाला संपूर्ण माहिती देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.(प्रतिनिधी)‘बी.व्होक.’च्या विलंबाबाबत नाराजीविद्यापीठाने ‘बी.व्होक.’ अभ्यासक्रमाला अंतिम मान्यता देण्यासंदर्भात विलंब का लावला यासंदर्भातदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. मागील महिन्यात २७ तारखेला झालेल्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या की ‘बी.व्होक.’ला विशेषाधिकारात मान्यता देण्यात यावी. परंतु ते कुलगुरूंना शक्य नव्हते तर व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलविण्यास महिन्याभराचा कालावधी का लावला असा मुद्दा सदस्यांनी मांडला.महाविद्यालये बंद करण्यासाठी समितीदरम्यान, गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत अनेक महाविद्यालये तसेच अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यासंदर्भात बैठकीदरम्यान चर्चा झाली. यासंदर्भातील प्रक्रियेकरिता महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ९२ नुसार चौकशी समिती गठित करण्याची मागणी महाविद्यालयांकडून करण्यात आली. विद्वत् परिषदेने या समिती गठित करण्याचे संपूर्ण अधिकार कुलगुरूंना दिले.