शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याबाबत मौन

By admin | Updated: November 28, 2014 01:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऐनवेळी परीक्षा ‘पोस्टपोन’ का केल्या यासंदर्भात गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु आपल्या चुकांवर

विद्वत् परिषदेत मुद्दा उपस्थित : ‘अ‍ॅकेडमिक कॅलेंडर’चे पालन का नाही?नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऐनवेळी परीक्षा ‘पोस्टपोन’ का केल्या यासंदर्भात गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु आपल्या चुकांवर पांघरुण टाकण्यासाठी प्रशासनाने यासंदर्भात मौन बाळगले आणि सभागृहाला पूर्ण माहिती देणे शक्य नसल्याचे सांगितले. परीक्षा विभागातील काही माजी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यापीठाला ‘सीबीएस’ पद्धतीच्या सर्व परीक्षा ‘पोस्टपोन’ कराव्या लागल्या. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा २६ नोव्हेंबरला सुरू झाल्या. अनेक ‘पेपर्स’चे ‘मॉडरेशन’च झाले नसल्याने परीक्षा विभागाची अडचण झाली अशी माहिती सूत्रांनी दिली होती.यासंदर्भात विद्वत् परिषदेत सदस्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे नेमके कारण काय याची विचारणा केली. विद्वत् परिषदेकडून ‘अ‍ॅकेडमिक कॅलेंडर’ तयार करण्यात येते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. परीक्षांचे वेळापत्रक बदलताना विद्यापीठाने संबंधित शाखांच्या अधिष्ठात्यांनादेखील विचारणा करण्याचे सौजन्य का दाखवले नाही असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. २२० पैकी ९८ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती यावेळी प्रशासनाने दिली. परंतु विद्यापीठाने परीक्षा समोर का ढकलण्यात आल्या यासंदर्भात सभागृहाला संपूर्ण माहिती देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.(प्रतिनिधी)‘बी.व्होक.’च्या विलंबाबाबत नाराजीविद्यापीठाने ‘बी.व्होक.’ अभ्यासक्रमाला अंतिम मान्यता देण्यासंदर्भात विलंब का लावला यासंदर्भातदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. मागील महिन्यात २७ तारखेला झालेल्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या की ‘बी.व्होक.’ला विशेषाधिकारात मान्यता देण्यात यावी. परंतु ते कुलगुरूंना शक्य नव्हते तर व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलविण्यास महिन्याभराचा कालावधी का लावला असा मुद्दा सदस्यांनी मांडला.महाविद्यालये बंद करण्यासाठी समितीदरम्यान, गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत अनेक महाविद्यालये तसेच अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यासंदर्भात बैठकीदरम्यान चर्चा झाली. यासंदर्भातील प्रक्रियेकरिता महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ९२ नुसार चौकशी समिती गठित करण्याची मागणी महाविद्यालयांकडून करण्यात आली. विद्वत् परिषदेने या समिती गठित करण्याचे संपूर्ण अधिकार कुलगुरूंना दिले.