शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

श्वेता भट्टडने स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेतले

By admin | Updated: February 8, 2016 03:11 IST

श्वेता भट्टड यांनी जनमंचच्या शेतकरी मेळाव्यादरम्यान स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेत शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांच्या व्यथांकडे वेधले लक्ष : तिसऱ्यांदा केला प्रयोगनागपूर : श्वेता भट्टड यांनी जनमंचच्या शेतकरी मेळाव्यादरम्यान स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेत शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधले. श्वेता भट्टड या नागपुरातील प्रसिद्ध परफॉर्मर्स आर्टिस्ट आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्या स्वत:ला जमिनीत पुरून घेतात. हा त्यांचा तिसरा प्रयोग होता. यापूर्वी त्यांनी पुणे आणि पॅरिसमध्ये असा यशस्वी प्रयोग सादर केला आहे. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पांढरे कपडे घालून त्यांनी स्वत:ला शवपेटीमध्ये बंद केले. ते संपूर्ण शवपेटी नंतर जमिनीत पुरण्यात आली. यासाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील पार्किंग परिसरात एक खड्डा तयार करण्यात आला होता. ही एक विशिष्ट प्रकारची शवपेटी होती. त्यात कॅमेऱ्याची सुविधा होती. त्यामुळे आत काय सुरू आहे, हे बाहेर असलेल्यांना एलसीडीवर पाहता येत होते. तीन तास त्या या शवपेटीसह जमिनीत होत्या. यादरम्यान श्वेता भट्टड या शवपेटीमध्ये झोपल्या नव्हत्या तर त्या एका बुकमध्ये विश्वास, विश्वास असे लिहित होत्या. ४ वाजून ३० मिनिटांनी जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आले तेव्हासुद्धा त्या लिहीतच होत्या. त्यांना जमिनीत पुरताना आणि बाहेर काढताना शेतकऱ्यांसह उपस्थितांनी मोठी गर्दी होती. श्वेता बाहेर येताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. अभिनंदनाचा वर्षाव केला. तीन डॉक्टरांची चमू ठेवून होती लक्ष श्वेता भट्टड यांच्या या प्रयोगासाठी दंदे हॉस्पिटलने विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. स्वत: डॉ. पिनाक दंदे यांच्यासह डॉ. सुलभ शर्मा, डॉ. रितेश यांची चमू श्वेता यांच्यावर लक्ष ठेवून होते. त्यांना आॅक्सिजन व्यवस्थित मिळत आहे का, त्यांच्या हृदयाचे ठोके आदी सर्वांवर डॉक्टरांचे लक्ष होते. यासाठी आयसीयू फॅसिलिटी उपलब्ध होती. जनमंचतर्फे स्वागत तीन तस जमिनीत घालवून परत आल्यानंतर श्वेता भट्टड यांचे जनमंचतर्फे व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. शरद निंबाळकर, ई.झेड. खोब्रागडे, अ‍ॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, राजीव जगताप, डॉ. पिनाक दंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सर्वांनी एकजूट व्हा - श्वेता भट्टडतुम्ही सर्वांनी एकजूट होऊन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करावी, असे आव्हान श्वेता भट्टड यांनी यावेळी केले. जमिनीत स्वत:ला पुरण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मी हा प्रयोग करीत आहे. हे करीत असतांना आपल्याला भीती वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विश्वासावरच सर्व अवलंबून असते असे स्पष्ट करीत आत आपण विश्वास असे लिहित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गर्व आहे, पण भीती वाटतेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपली मुलगी हा प्रयोग करते. त्यात तिला मान सन्मानही मिळतो याबाबत गर्व वाटतो. परंतु ती हा जीवघेणा प्रयोग करते, तेव्हा आई म्हणून भीती तर वाटतेच.उषा भट्टड, श्वेताची आई