शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अयोध्या प्रश्नाचा निकाल लागण्याचे श्रेय श्री श्री रविशंकर यांना : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:01 IST

अनेक वर्ष रखडलेला अयोध्येचा प्रश्न आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळेच निकाली लागला. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्री श्री यांनी परिश्रम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देक्रीडा, सांस्कृतिक महोत्सवानंतर ‘शैक्षणिक महोत्सव’ होणारतिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्ष रखडलेला अयोध्येचा प्रश्न आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळेच निकाली लागला. हा निर्णय आता दिला असला तरी उच्च न्यायालयाने त्यापूर्वीच स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख सदस्य म्हणून श्री श्री यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. अत्यंत शांततेने आणि समन्वयाने हा प्रश्न निकाली लागावा आणि अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्री श्री यांनी परिश्रम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले.तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ आध्यात्मिक गुरु व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी, गडकरी बोलत होते. यावेळी, खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आ. अनिल सोले, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. रामदास आंबटकर, आ. विकास कुंभारे, माजी आ. सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठे, माजी महापौर नंदा जिचकार, डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ कवी मधुप पाण्डेय, नगरसेवक संदीप गवई, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, संस्कार भारतीच्या महानगर अध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होते. संचालन रेणुका देशकर यांनी केले. प्रास्ताविक आ. अनिल सोले यांनी केले.खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आता शैक्षणिक क्षेत्रासाठी ‘खासदार शैक्षणिक महोत्सव’ आयोजित करण्याचा मानस यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. केवळ भौतिक विकास पुरेसा नाही तर व्यक्तीचा आणि पर्यायाने समाजाचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा गुणांचा विकासही आवश्यक आहे. लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकसंस्कार या त्रिसूत्रीचा संयोग खासदार सांस्कृतिक महोत्सवात होत असल्याचे ते म्हणाले. श्री श्री रविशंकर हे आपले सांस्कृतिक राजदूत आहेत. आपल्या ऐतिहासिक संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार त्यांनी जगभरात केला आहे. त्यांच्याच प्रेरणेतून ‘सूरताल संसद’ हा भव्य कार्यक्रम आकाराला आल्याचेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.साहित्य-संस्कृतीमुळेच जाणिवा समृद्ध होतात - श्री श्री रविशंकर 

जगण्यासाठी रोटी, कपडा, मकान या पायाभूत गरजा महत्त्वाच्या असल्या तरी चांगले जीवन जगण्यासाठी साहित्य-संस्कृती अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जगातील ४० टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. त्यावरचा सर्वात सुंदर उपाय म्हणजे अशा महोत्सवांचे आयोजन होय. खासदाराच्या नावाने होत असलेला हा देशातील पहिलाच महोत्सव असून, नागपूर हे देशाचे हृदयबिंदू आहे. येथूनच चांगल्या गोष्टींचा प्रसार देशाच्या चहूबाजूंनी होणार असल्याचे श्री श्री रविशंकर यावेळी म्हणाले.अमिताभ बच्चन येणार!गेल्या दोन वर्षापासून महानायक अमिताभ बच्चन यांना खासदार महोत्सवात आमंत्रित करत आहे. मात्र, त्यांच्या व्यस्ततेमुळे आणि आधीच ठरलेल्या तारखांमुळे ते येऊ शकले नाहीत. मात्र, यंदा त्यांनी स्वत: मी या महोत्सवाला हजेरी लावू इच्छित असल्याची भावना माझ्याजवळ बोलून दाखवली. यंदा त्यांचे येणे होते की नाही, ही वेळच ठरवेल. मात्र, पुढच्या वर्षीची तारीख त्यांनी निश्चित केली असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcultureसांस्कृतिकAyodhyaअयोध्या