शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या प्रश्नाचा निकाल लागण्याचे श्रेय श्री श्री रविशंकर यांना : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:01 IST

अनेक वर्ष रखडलेला अयोध्येचा प्रश्न आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळेच निकाली लागला. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्री श्री यांनी परिश्रम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देक्रीडा, सांस्कृतिक महोत्सवानंतर ‘शैक्षणिक महोत्सव’ होणारतिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्ष रखडलेला अयोध्येचा प्रश्न आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळेच निकाली लागला. हा निर्णय आता दिला असला तरी उच्च न्यायालयाने त्यापूर्वीच स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख सदस्य म्हणून श्री श्री यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. अत्यंत शांततेने आणि समन्वयाने हा प्रश्न निकाली लागावा आणि अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्री श्री यांनी परिश्रम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले.तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ आध्यात्मिक गुरु व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी, गडकरी बोलत होते. यावेळी, खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आ. अनिल सोले, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. रामदास आंबटकर, आ. विकास कुंभारे, माजी आ. सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठे, माजी महापौर नंदा जिचकार, डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ कवी मधुप पाण्डेय, नगरसेवक संदीप गवई, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, संस्कार भारतीच्या महानगर अध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होते. संचालन रेणुका देशकर यांनी केले. प्रास्ताविक आ. अनिल सोले यांनी केले.खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आता शैक्षणिक क्षेत्रासाठी ‘खासदार शैक्षणिक महोत्सव’ आयोजित करण्याचा मानस यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. केवळ भौतिक विकास पुरेसा नाही तर व्यक्तीचा आणि पर्यायाने समाजाचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा गुणांचा विकासही आवश्यक आहे. लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकसंस्कार या त्रिसूत्रीचा संयोग खासदार सांस्कृतिक महोत्सवात होत असल्याचे ते म्हणाले. श्री श्री रविशंकर हे आपले सांस्कृतिक राजदूत आहेत. आपल्या ऐतिहासिक संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार त्यांनी जगभरात केला आहे. त्यांच्याच प्रेरणेतून ‘सूरताल संसद’ हा भव्य कार्यक्रम आकाराला आल्याचेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.साहित्य-संस्कृतीमुळेच जाणिवा समृद्ध होतात - श्री श्री रविशंकर 

जगण्यासाठी रोटी, कपडा, मकान या पायाभूत गरजा महत्त्वाच्या असल्या तरी चांगले जीवन जगण्यासाठी साहित्य-संस्कृती अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जगातील ४० टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. त्यावरचा सर्वात सुंदर उपाय म्हणजे अशा महोत्सवांचे आयोजन होय. खासदाराच्या नावाने होत असलेला हा देशातील पहिलाच महोत्सव असून, नागपूर हे देशाचे हृदयबिंदू आहे. येथूनच चांगल्या गोष्टींचा प्रसार देशाच्या चहूबाजूंनी होणार असल्याचे श्री श्री रविशंकर यावेळी म्हणाले.अमिताभ बच्चन येणार!गेल्या दोन वर्षापासून महानायक अमिताभ बच्चन यांना खासदार महोत्सवात आमंत्रित करत आहे. मात्र, त्यांच्या व्यस्ततेमुळे आणि आधीच ठरलेल्या तारखांमुळे ते येऊ शकले नाहीत. मात्र, यंदा त्यांनी स्वत: मी या महोत्सवाला हजेरी लावू इच्छित असल्याची भावना माझ्याजवळ बोलून दाखवली. यंदा त्यांचे येणे होते की नाही, ही वेळच ठरवेल. मात्र, पुढच्या वर्षीची तारीख त्यांनी निश्चित केली असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcultureसांस्कृतिकAyodhyaअयोध्या