शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दुसऱ्या दिवशीही फटका

By admin | Updated: September 17, 2014 00:58 IST

आॅटोवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने पुकारलेल्या दुसऱ्या दिवसाच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपाचा सर्वात जास्त फटका आॅटोने

आॅटो बंदला संमिश्र प्रतिसाद : प्रवाशांचे हालनागपूर : आॅटोवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने पुकारलेल्या दुसऱ्या दिवसाच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपाचा सर्वात जास्त फटका आॅटोने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह सीताबर्डी ते व्हेरायटी चौकातून इतरत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. विशेष म्हणजे, एकीकडे संप सुरू असताना दुसरीकडे विनामीटर धावत असलेल्या १५ आॅटोंवर आरटीओने जप्तीची कारवाई केली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आज बोलविलेल्या आॅटो संघटनेच्या बैठकीत कारवाईमध्ये शिथिलता आणण्याची सूचना केली.आरटीओकडून तीन सीटर आॅटोचालकांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात समितीने दोन दिवस आॅटो बंदचा इशारा दिला होता. सोमवारी पहिल्या दिवशी सुमारे ८० टक्के आॅटोचालक यात सहभागी झाले होते, मात्र आज मंगळवारी सीताबर्डी, व्हेरायटी चौकासह काही महत्त्वाचे चौक सोडल्यास अनेक ठिकाणी प्रवासी घेऊन आॅटो धावताना दिसून आले. मात्र विद्यार्थ्यांची ने-आण करणारे आॅटो दुसऱ्या दिवशीही बंद होते. यामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानकावर आॅटोरिक्षा फार कमी प्रमाणात होते. दरम्यान, आॅटोरिक्षा चालकांच्या मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आॅटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. यावेळी आरटीओ व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसह कामगार नेते मोहनदास नायडू, समितीचे महासचिव हरिश्चंद्र पवार, मोहन बावणे, चरणदास वानखेडे, कैलाश श्रीपतवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)१५ आॅटोंवर जप्तीची कारवाई ॉटोचालकांचा संप सुरू असताना मीटरनुसार न चालणाऱ्या आॅटोंवर आरटीओचा कारवाईचा धडाका सुरूच होता. मंगळवारी १५ आॅटोरिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत ४०५ आॅटोंवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.आॅटोचालकांचा जल्लोषतीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने पुकारलेला बंद १०० टक्के यशस्वी झाल्याच्या निमित्ताने गणेशपेठ येथे आॅटोचालकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी कामगार नेते मोहनदास नायडू, समितीचे महासचिव हरिश्चंद्र पवार, मोहन बावणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली.दोन-तीन प्रवासी आॅटोंवर कारवाईत शिथिलताआॅटोंमध्ये दोन किंवा तीन प्रवासी असेल तर कारवाईत शिथिलता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओ आणि वाहतूक विभागाला दिल्याची माहिती आहे. मात्र आॅटो मीटरनेच चालेल यावरही भर दिला.‘कॅलिब्रेशन’चा आढावा घेणारजिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओला २५ तारखेपर्यंत किती आॅटोचालकांनी मीटरमध्ये बदल (कॅलिब्रेशन) करवून घेतले, याचा आढावा घेण्यास सांगितले. त्यानंतरच नियमानुसार निर्णय घेण्याची सूचना केली.