शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भिवापूर तालुक्यात डीएपीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST

शरद मिरे भिवापूर : पाऊस समाधानकारक असल्यामुळे अनेक शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहे. अशातच तालुक्यात डीएपीचा तुटवडा जाणवू लागल्याने ...

शरद मिरे

भिवापूर : पाऊस समाधानकारक असल्यामुळे अनेक शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहे. अशातच तालुक्यात डीएपीचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून डीएपी कुठे आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्याने कृषी केंद्र चालकांच्या गोदामातही डीएपीचा ठणठणाट आहे.

तालुक्यात युरिया ७८० टन उपलब्ध झाला. त्यापैकी सध्या १७४ टन वेगवेगळ्या कृषी केंद्रात उपलब्ध आहे. डीएपी २८० टन उपलब्ध झाले. त्यापैकी केवळ १० टन शिल्लक असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मात्र ते कुठे आणि कोणत्या कृषी केंद्राकडे उपलब्ध आहे हे कृषी केंद्र चालकांच्याही ध्यानीमनी नाही. एमओपी ९० टन उपलब्ध पैकी ४५ टन शिल्लक आहे. एसएसपी जी १,९५५ टन पैकी ८२० टन शिल्लक आहे. एसएसपी ४०० पैकी ८५ टन शिल्लक आहे. एमआयएक्स ११५ पैकी ६५ टन उपलब्ध आहे. बियाणांच्या बाबतीत सोयाबीन बियाणाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात ५,८३० क्विंटल सोयाबीन बियाणांचा पुरवठा झाला. त्यापैकी सद्यस्थितीत २०९ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. कपाशी २९,८६० पैकी १४,७७२ शिल्लक आहे. मिरची १५१ किलो पैकी ६५ किलो शिल्लक आहे. एकंदरीत ही आकडेवारी बघता तालुक्यात डीएपीचा तुटवडा निर्माण झाला असून येत्या दिवसात सोयाबीन बियाणाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

हे आहे मुख्य कारण

हवामान खात्याचा अंदाज समाधानकारक असल्यामुळे तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी आणि कपाशी लागवडीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भविष्यात तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने आधीच डीएपीची खरेदी करत घरात साठवणूक करून ठेवल्याचे समजते. यातूनही डीएपीचा तुटवडा निर्माण झाल्याचा अंदाज कृषी केंद्र चालकांनी व्यक्त केला. महत्वाचे म्हणजे शासनाने सबसिडी जाहीर केल्यामुळे सरसकट दराबाबतच्या तांत्रिक कारणामुळेसुद्धा डीएपी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याचे वृत्त आहे.

आठवडाभरात ‘रॅक’लागणार

यासंदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, तालुक्यात डीएपीचा तुटवडा आहे. ही बाब सत्य असली तरी या आठवड्यात डीएपीची रॅक लागणार असून तालुक्याला मुबलक प्रमाणात डीएपी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, १५ जुलैपर्यंत पेरणी करता येणार आहे, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.