शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

उमरेड विभागातील प्रकल्पात अल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

उमरेड : मागील अनेक दिवसांपासून दडी मारल्यानंतर उमरेड विभागात या मोसमात पहिल्यांदाच गुरुवारी दिवसभर पाऊस बरसला. पावसाच्या 'एन्ट्री'ने ...

उमरेड : मागील अनेक दिवसांपासून दडी मारल्यानंतर उमरेड विभागात या मोसमात पहिल्यांदाच गुरुवारी दिवसभर पाऊस बरसला. पावसाच्या 'एन्ट्री'ने सारेच सुखावले असले तरी अद्यापही उपविभागातील प्रकल्पात जलसाठा अल्प आहे. उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यातील एकूण २७ प्रकल्पांपैकी केवळ एकमेव पिरावा तलावात १०० टक्के जलसाठा झाला आहे. अन्य तलावात ठणठणाट दिसून येत असून मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस कमीच झाल्याचे चित्र आहे. विभागात मकरधोकडा, सायकी आणि पांढराबोडी हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या तीन तलावांपैकी मकरधोकडा प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. या तलावाच्या माध्यमातून सिंचन तसेच उमरेडकरांची तहान भागविली जाते. यामुळे या तलावात जलसाठा चिंताजनक आहे. सायकी प्रकल्पात सुद्धा केवळ ६.५० टक्के जलसाठा असून पांढराबोडी प्रकल्प ४७.६० टक्केच भरला आहे. उर्वरित लघु प्रकल्पांपैकी नवेगाव आणि निशाणघाट याठिकाणी सुद्धा जलसाठा शून्य टक्केच आहे. विभागातील बोटेझरी प्रकल्पात ५०.७२ टक्के जलसाठा आहे. चिचाळा (१४.६६), (२६.९०), गोठणगाव (२८.६५), करांडला (७४.३३), उरकुडापार (८.२५), वणी (७०.६० टक्के), नांदेरा (२१.७२), चनोडा (०.६५), पारडगाव (१६.८४), खापरी (४३.४७), उकरवाही (२०.०५), वडेगाव (१२.८२), वडद (७.९५), मटकाझरी (११.४२), उंदरी (२०.५३), सिर्सी (२४.१८), ठाणा (७९.८४), जवळी (३०.४) तसेच भिवापूर प्रकल्पात केवळ २४.१९ जलसाठा आहे. एकूणच काही भागात पाऊस झाला तर काही भागात अजूनही पाऊस पाहिजे तेव्हढा बरसला नाही. यामुळेच बहुतांश तलावाची अवस्था जलसाठ्याबाबत दयनीय आहे. अनेक वर्षांपासून तलावांच्या खोलीकरणाची मागणी धूळखात आहे. यामुळे तलावातील गाळ व खोलीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले दिसते. गाळमुक्त तलाव योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास नक्कीच जलव्यवस्थापन सुधारेल, असे बोलल्या जात आहे.

---------------------------------------

पर्जन्यमापक यंत्र का नाही?

उमरेड उपविभाग हा तलावांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात तब्बल २७ प्रकल्प आहेत. यापैकी केवळ पांढराबोडी, मकरधोकडा, सतीघाट, नवेगाव, कऱ्हांडला, निशानघाट, वणी, नांदेरा या एकूण केवळ ८ प्रकल्पात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. अन्य प्रकल्पात हे यंत्रच नाहीत. बऱ्याच वर्षांपासून ही मागणी शासन दरबारी धूळखात पडलेली आहे. पर्जन्यमान मोजण्यासाठी यंत्र का नाही, असा सवाल विचारला जात आहे. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील काय, अशीही विचारणा केली जात आहे.

---

उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात अद्यापही पाणीसाठा अत्यल्प आहे, असेच चित्र सर्वत्र दिसून येत आहे.