शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन काळातही सुरू असतात दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी, संचारबंदी साेबतच लाॅकडाऊनची घाेषणा केली. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी, संचारबंदी साेबतच लाॅकडाऊनची घाेषणा केली. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची विशिष्ट वेळ देण्यात आली. या काळात अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसलेल्या वस्तूंची दुकाने उघडण्यात आली असून, त्या दुकानांसमाेर ग्राहकांची गर्दी दिसून येते. दुकानदारांनी व ग्राहकांकडून हाेत असलेली ही उपाययाेजनांची पायमल्ली काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत आहे. परिणामी, कुही तालुक्यात काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत मार्च व एप्रिलमध्ये काेराेना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.

तालुक्यातील काेराेना रुग्णांची संख्या चार हजारावर गेली आहे. मार्च व एप्रिलमध्ये तालुक्यात राेज १२० ते १५० रुग्णांची नाेंद केली जायची. याच काळात प्रशासनाने काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा वेगही वाढविला. सध्या राेज चार ते पाच रुग्ण आढळून येत असून, मागील आठवड्यापासून तालुक्यातील काेराेना संक्रमण हळूहळू कमी हाेत असल्याचे दिसून येत आहे. संक्रमण राेखण्यासाठी कुही शहरासह तालुक्यातील किराणा, भाजीपाला, आटाचक्की व फळांची दुकाने राेज सकाळी ७ ते ११ या काळात सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, काहींनी या नियमांची पायमल्ली करीत अत्यावश्यक सेवेत येत नसलेल्या साहित्याची दुकानेही या काळात सुरू केली.

या दुकानांसमाेर ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. उपाययाेजनांची केली जात असलेली पायमल्ली काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तवात, या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्या दुकानदारांना प्रशासनाने काेणतीही समज दिली नाही अथवा दंडात्मक कारवाई केली नाही. तालुक्यातील काेराेना संक्रमण कमी हाेत असताना नियमांची पायमल्ली केली जात असून, उपाययाेजनांचे पालन केले जात नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.

......

तरुणांचा मृत्यू धक्कादायक काही रुग्णांना उपचाराचा अभाव, रुग्णालयातील खाटांची कमतरता तसेच वेळीच ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गमवावा लागला. तालुक्यात उपचाराची साेय नसल्याने रुग्णांना नागपूरला पाठविले जायचे. मृतांमध्ये ३५ ते ४० वर्षे वयाेगटातील तरुणांची संख्या अधिक असल्याने तसेच हे मृत्यू लागाेपाठ झाल्याने ते सर्वांसाठी धक्कायदाक हाेते. यात कुही शहरातील तिघांसह ग्रामीण भागातील काहींचा समावेश आहे.

...