शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जानेवारी महिन्यात देशात १३ तर राज्यात ४ वाघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 19:02 IST

यावर्षी केवळ जानेवारी महिन्यात देशभरात १३ वाघांचा मृत्यू झाला. या काळात महाराष्ट्रात चार वाघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिकार, विजेचा शाॅक, विषप्रयाेग कारणीभूत‘वाघ वाचवा’ माेहिमेला धक्का

निशांत वानखेडे

नागपूर : गेल्या वर्षीपासून सुरू असलेले व्याघ्र मृत्यूचे सत्र थांबताना दिसत नाही. मागील वर्षी दशकातील सर्वाधिक व्याघ्र मृत्यूची नाेंद झाली हाेती. यावर्षीची सुरुवात त्याच दिशेने हाेत आहे. यावर्षी केवळ जानेवारी महिन्यात देशभरात १३ वाघांचा मृत्यू झाला. या काळात महाराष्ट्रात चार वाघांचा मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशातील काॅलरवाली वगळता हे सर्व मृत्यू अनैसर्गिक आहेत. त्यामुळे ‘वाघ वाचवा’ माेहिमेला धक्का लागल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी महिन्यात विदर्भात झालेल्या चार वाघांचे मृत्यू हे संरक्षित क्षेत्राच्या बाहेर झालेले आहेत. पहिला मृत्यू ३ जानेवारीला उमरेड-कऱ्हांडला रेंजच्या काेदाचलबर्डी, भद्रावती बीटमध्ये झाला. त्यानंतर ५ जानेवारीला गडचिराेली सर्कलच्या वडसा विभागात कटाली गावात एका प्राैढ वाघाचा मृत्यू झाला. १३ जानेवारीला अर्जुनी माेरगाव रेंजच्या रामाघाट बीटमध्ये नर वाघ मृत आढळला आणि आता २८ जानेवारीला भंडारा जिल्ह्यात डाेडमाधरी बीटमध्ये माथाडी गावात एका तरुण वाघाचा मृत्यू झाला. इतर नऊ मृत्यू मध्य प्रदेश, कर्नाटक व बिहार राज्यात नाेंदविण्यात आले.

शिकारीवर बऱ्यापैकी नियंत्रण आले असले तरी ते बंद झाले नाही. याशिवाय विषप्रयाेग आणि विजेच्या शाॅकमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे ‘वाघ वाचवा’ मोहिमाचा फज्जा उडाला का, असा सवाल असून अनैसर्गिक मृत्यूमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तृणभक्षी प्राण्याच्या शिकारीत वाघही बळी

हिवाळ्याच्या दिवसात शेतामध्ये चांगले अन्नपदार्थ मिळते. ते खाण्यासाठी जंगलातील तृणभक्षी प्राणी शेताकडे धाव घेतात. त्यांच्या शिकारीसाठी वाघही शेताकडे वळतात. या प्राण्यांपासून शेताचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विषप्रयाेग केला जाताे किंवा विद्युत तारेचे कुंपण टाकले जाते. यामध्ये वाघही बळी पडतात. इतर प्राण्यांच्या मृत्यूची तर नाेंदही हाेत नाही. विद्युत प्रवाहामुळे गेल्या १२ महिन्यात सात वाघांचा मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक घटना नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या.

दशकात सर्वाधिक मृत्यू २०२१ मध्ये

२०२१ साली देशात तब्बल १२७ वाघांच्या मृत्यूची नाेंद झाली. या वर्षात महाराष्ट्रातही २६ वाघांचा मृत्यू झाला. देश व राज्य पातळीवर हा दशकभरातील सर्वाधिक आकडा आहे. महाराष्ट्रात जानेवारीत ४, फेब्रुवारीत २, मार्चमध्ये ८, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये प्रत्येकी एक, नाेव्हेंबरमध्ये ३ तर डिसेंबर महिन्यात ३ वाघ मृत्युमुखी पडले.

सर्वांना रेडिओ काॅलर लावा

- वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत डाॅ. जेरिल बानाईत यांच्या मते, वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी सर्व वाघांना रेडिओ काॅलर लावणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे बाहेर येणाऱ्या वाघांचीही माॅनिटरिंग करणे शक्य हाेईल.

- शेतकऱ्यांना नि:शुल्क किंवा अल्पदरात साेलर फेन्सिंगचा पुरवठा करावा.

- व्याघ्र संवर्धनाचे धाेरण ठरविताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे. त्यांच्या समस्या जाणून कारवाई करावी.

- व्याघ्र शिकार प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक काेर्टची स्थापना करावी. अनेक प्रकरणात गुन्हेगारावर चार्जशीट दाखल हाेत नाही. न्यायालयात प्रकरणे बराच काळ प्रलंबित असतात व बहुतेक आराेपींची निर्दाेष सुटका हाेते.

टॅग्स :Tigerवाघ