शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

धक्कादायक! जानेवारी महिन्यात देशात १३ तर राज्यात ४ वाघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 19:02 IST

यावर्षी केवळ जानेवारी महिन्यात देशभरात १३ वाघांचा मृत्यू झाला. या काळात महाराष्ट्रात चार वाघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिकार, विजेचा शाॅक, विषप्रयाेग कारणीभूत‘वाघ वाचवा’ माेहिमेला धक्का

निशांत वानखेडे

नागपूर : गेल्या वर्षीपासून सुरू असलेले व्याघ्र मृत्यूचे सत्र थांबताना दिसत नाही. मागील वर्षी दशकातील सर्वाधिक व्याघ्र मृत्यूची नाेंद झाली हाेती. यावर्षीची सुरुवात त्याच दिशेने हाेत आहे. यावर्षी केवळ जानेवारी महिन्यात देशभरात १३ वाघांचा मृत्यू झाला. या काळात महाराष्ट्रात चार वाघांचा मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशातील काॅलरवाली वगळता हे सर्व मृत्यू अनैसर्गिक आहेत. त्यामुळे ‘वाघ वाचवा’ माेहिमेला धक्का लागल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी महिन्यात विदर्भात झालेल्या चार वाघांचे मृत्यू हे संरक्षित क्षेत्राच्या बाहेर झालेले आहेत. पहिला मृत्यू ३ जानेवारीला उमरेड-कऱ्हांडला रेंजच्या काेदाचलबर्डी, भद्रावती बीटमध्ये झाला. त्यानंतर ५ जानेवारीला गडचिराेली सर्कलच्या वडसा विभागात कटाली गावात एका प्राैढ वाघाचा मृत्यू झाला. १३ जानेवारीला अर्जुनी माेरगाव रेंजच्या रामाघाट बीटमध्ये नर वाघ मृत आढळला आणि आता २८ जानेवारीला भंडारा जिल्ह्यात डाेडमाधरी बीटमध्ये माथाडी गावात एका तरुण वाघाचा मृत्यू झाला. इतर नऊ मृत्यू मध्य प्रदेश, कर्नाटक व बिहार राज्यात नाेंदविण्यात आले.

शिकारीवर बऱ्यापैकी नियंत्रण आले असले तरी ते बंद झाले नाही. याशिवाय विषप्रयाेग आणि विजेच्या शाॅकमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे ‘वाघ वाचवा’ मोहिमाचा फज्जा उडाला का, असा सवाल असून अनैसर्गिक मृत्यूमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तृणभक्षी प्राण्याच्या शिकारीत वाघही बळी

हिवाळ्याच्या दिवसात शेतामध्ये चांगले अन्नपदार्थ मिळते. ते खाण्यासाठी जंगलातील तृणभक्षी प्राणी शेताकडे धाव घेतात. त्यांच्या शिकारीसाठी वाघही शेताकडे वळतात. या प्राण्यांपासून शेताचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विषप्रयाेग केला जाताे किंवा विद्युत तारेचे कुंपण टाकले जाते. यामध्ये वाघही बळी पडतात. इतर प्राण्यांच्या मृत्यूची तर नाेंदही हाेत नाही. विद्युत प्रवाहामुळे गेल्या १२ महिन्यात सात वाघांचा मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक घटना नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या.

दशकात सर्वाधिक मृत्यू २०२१ मध्ये

२०२१ साली देशात तब्बल १२७ वाघांच्या मृत्यूची नाेंद झाली. या वर्षात महाराष्ट्रातही २६ वाघांचा मृत्यू झाला. देश व राज्य पातळीवर हा दशकभरातील सर्वाधिक आकडा आहे. महाराष्ट्रात जानेवारीत ४, फेब्रुवारीत २, मार्चमध्ये ८, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये प्रत्येकी एक, नाेव्हेंबरमध्ये ३ तर डिसेंबर महिन्यात ३ वाघ मृत्युमुखी पडले.

सर्वांना रेडिओ काॅलर लावा

- वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत डाॅ. जेरिल बानाईत यांच्या मते, वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी सर्व वाघांना रेडिओ काॅलर लावणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे बाहेर येणाऱ्या वाघांचीही माॅनिटरिंग करणे शक्य हाेईल.

- शेतकऱ्यांना नि:शुल्क किंवा अल्पदरात साेलर फेन्सिंगचा पुरवठा करावा.

- व्याघ्र संवर्धनाचे धाेरण ठरविताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे. त्यांच्या समस्या जाणून कारवाई करावी.

- व्याघ्र शिकार प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक काेर्टची स्थापना करावी. अनेक प्रकरणात गुन्हेगारावर चार्जशीट दाखल हाेत नाही. न्यायालयात प्रकरणे बराच काळ प्रलंबित असतात व बहुतेक आराेपींची निर्दाेष सुटका हाेते.

टॅग्स :Tigerवाघ