शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

धक्कादायक! जानेवारी महिन्यात देशात १३ तर राज्यात ४ वाघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 19:02 IST

यावर्षी केवळ जानेवारी महिन्यात देशभरात १३ वाघांचा मृत्यू झाला. या काळात महाराष्ट्रात चार वाघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिकार, विजेचा शाॅक, विषप्रयाेग कारणीभूत‘वाघ वाचवा’ माेहिमेला धक्का

निशांत वानखेडे

नागपूर : गेल्या वर्षीपासून सुरू असलेले व्याघ्र मृत्यूचे सत्र थांबताना दिसत नाही. मागील वर्षी दशकातील सर्वाधिक व्याघ्र मृत्यूची नाेंद झाली हाेती. यावर्षीची सुरुवात त्याच दिशेने हाेत आहे. यावर्षी केवळ जानेवारी महिन्यात देशभरात १३ वाघांचा मृत्यू झाला. या काळात महाराष्ट्रात चार वाघांचा मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशातील काॅलरवाली वगळता हे सर्व मृत्यू अनैसर्गिक आहेत. त्यामुळे ‘वाघ वाचवा’ माेहिमेला धक्का लागल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी महिन्यात विदर्भात झालेल्या चार वाघांचे मृत्यू हे संरक्षित क्षेत्राच्या बाहेर झालेले आहेत. पहिला मृत्यू ३ जानेवारीला उमरेड-कऱ्हांडला रेंजच्या काेदाचलबर्डी, भद्रावती बीटमध्ये झाला. त्यानंतर ५ जानेवारीला गडचिराेली सर्कलच्या वडसा विभागात कटाली गावात एका प्राैढ वाघाचा मृत्यू झाला. १३ जानेवारीला अर्जुनी माेरगाव रेंजच्या रामाघाट बीटमध्ये नर वाघ मृत आढळला आणि आता २८ जानेवारीला भंडारा जिल्ह्यात डाेडमाधरी बीटमध्ये माथाडी गावात एका तरुण वाघाचा मृत्यू झाला. इतर नऊ मृत्यू मध्य प्रदेश, कर्नाटक व बिहार राज्यात नाेंदविण्यात आले.

शिकारीवर बऱ्यापैकी नियंत्रण आले असले तरी ते बंद झाले नाही. याशिवाय विषप्रयाेग आणि विजेच्या शाॅकमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे ‘वाघ वाचवा’ मोहिमाचा फज्जा उडाला का, असा सवाल असून अनैसर्गिक मृत्यूमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तृणभक्षी प्राण्याच्या शिकारीत वाघही बळी

हिवाळ्याच्या दिवसात शेतामध्ये चांगले अन्नपदार्थ मिळते. ते खाण्यासाठी जंगलातील तृणभक्षी प्राणी शेताकडे धाव घेतात. त्यांच्या शिकारीसाठी वाघही शेताकडे वळतात. या प्राण्यांपासून शेताचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विषप्रयाेग केला जाताे किंवा विद्युत तारेचे कुंपण टाकले जाते. यामध्ये वाघही बळी पडतात. इतर प्राण्यांच्या मृत्यूची तर नाेंदही हाेत नाही. विद्युत प्रवाहामुळे गेल्या १२ महिन्यात सात वाघांचा मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक घटना नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या.

दशकात सर्वाधिक मृत्यू २०२१ मध्ये

२०२१ साली देशात तब्बल १२७ वाघांच्या मृत्यूची नाेंद झाली. या वर्षात महाराष्ट्रातही २६ वाघांचा मृत्यू झाला. देश व राज्य पातळीवर हा दशकभरातील सर्वाधिक आकडा आहे. महाराष्ट्रात जानेवारीत ४, फेब्रुवारीत २, मार्चमध्ये ८, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये प्रत्येकी एक, नाेव्हेंबरमध्ये ३ तर डिसेंबर महिन्यात ३ वाघ मृत्युमुखी पडले.

सर्वांना रेडिओ काॅलर लावा

- वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत डाॅ. जेरिल बानाईत यांच्या मते, वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी सर्व वाघांना रेडिओ काॅलर लावणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे बाहेर येणाऱ्या वाघांचीही माॅनिटरिंग करणे शक्य हाेईल.

- शेतकऱ्यांना नि:शुल्क किंवा अल्पदरात साेलर फेन्सिंगचा पुरवठा करावा.

- व्याघ्र संवर्धनाचे धाेरण ठरविताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे. त्यांच्या समस्या जाणून कारवाई करावी.

- व्याघ्र शिकार प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक काेर्टची स्थापना करावी. अनेक प्रकरणात गुन्हेगारावर चार्जशीट दाखल हाेत नाही. न्यायालयात प्रकरणे बराच काळ प्रलंबित असतात व बहुतेक आराेपींची निर्दाेष सुटका हाेते.

टॅग्स :Tigerवाघ