शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, नागपुरात अपघातामुळे रोज २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 07:00 IST

Nagpur News मागील ५५ दिवसांत नागपूर जिल्ह्यात तब्बल १६२ अपघात झाले असून यात ११३ व्यक्तींचे जीव गेले आहेत. यावरून रोज जवळपास ३ अपघात होत असून २ जणांचा मृत्यू होत आहे.

ठळक मुद्दे५५ दिवस, ११३ मृत्यू कुठे आहे, रस्ता सुरक्षा अभियान?

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच रस्त्यावर पुन्हा एकदा गर्दी होऊ लागली आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील ५५ दिवसांत नागपूर जिल्ह्यात तब्बल १६२ अपघात झाले असून यात ११३ व्यक्तींचे जीव गेले आहेत. यावरून रोज जवळपास ३ अपघात होत असून २ जणांचा मृत्यू होत आहे.

भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. रोज ७०० व्यक्ती जखमी होतात किंवा त्यांना कायमचे अपंग येते. विशेष म्हणजे, अपघातांमध्ये २० ते ४० या वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. परिणामी, थेट कुटुंबावरच प्रभाव पडत आहे. एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. यामुळे वाहतूक नियमांच्या जनजागृतीचे व रस्ता वापरणाऱ्या घटकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे, परंतु प्रत्यक्ष तसे होताना दिसून येत नसल्याचे वास्तव आहे.

३१ दिवसांत शहरात ३२ मृत्यू

जानेवारी महिन्यात शहरात ९२ अपघात झाले. यात ३२ व्यक्तींचे जीव गेले. ४२ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून १८ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. एकूण शहरात रोज जवळपास ३ अपघात होत असून यात एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे.

५५ दिवसांत ग्रामीणमध्ये अपघातात ८१ मृत्यू

जानेवारी महिन्यात नागपूर ग्रामीणमध्ये ४१ अपघात झाले. यात ४९ व्यक्तींचे जीव गेले. तर १ ते २४ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या २९ अपघातात ३२ मृत्यू झाले. एकूणच मागील ५५ दिवसांत झालेल्या ७० अपघातात ८१ मृत्यू झाले. यावरून ग्रामीणमध्ये रोज एकापेक्षा जास्त अपघात होत असून तेवढ्याच व्यक्तींचे जीव जात आहेत.

रस्ता सुरक्षा अभियान नावालाच!

रस्ता सुरक्षा आणि त्याचे महत्त्व वाढावे व रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी या उद्देशाने दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते, परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून हे अभियान नावालाच आहे. नागपूर जिल्ह्यात वाढत्या अपघातात जात असलेले बळी पाहता कुठे आहे रस्ता सुरक्षा अभियान, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

 

 

 

टॅग्स :Accidentअपघात