शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुत्तेमवारांवर टीका करण्याचा शिवसेनेला अधिकार नाही

By admin | Updated: August 7, 2016 02:29 IST

शिवसेनेचे नेते सतीश हरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या मार्गदर्शनातच २१ वर्षे राजकारणाचे धडे घेतले आहेत.

वाद स्वतंत्र विदर्भाचा : अग्निहोत्री यांची हरडे यांच्यावर टीका नागपूर : शिवसेनेचे नेते सतीश हरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या मार्गदर्शनातच २१ वर्षे राजकारणाचे धडे घेतले आहेत. असे असताना मुत्तेमवारांवर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी केली आहे. विलास मुत्तेमवार यांनी नुकतेच विदर्भाच्या मुद्यावर पश्चिम महाराष्ट्राच्या स्वपक्षीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. यावर सतीश हरडे यांनी मुत्तेमवारांनी उपदेश देणे बंद करावे, अशी टीका केली होती. हरडे यांचे वक्तव्य शहर काँग्रेसच्या जिव्हारी लागले असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत याचा निषेध केला. मुत्तेमवार नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मुत्तेमवारांनीच हरडेंना जनसेवेचे धडे दिले आहेत. उलट हरडेंना साधी नगरसेवकाची निवडणूक जिंकता आली नसल्याची टीका अग्निहोत्री यांनी केली. शिवसेनेने त्यांना शहराचा अध्यक्ष बनविले असले तरी त्यांच्यात संघटन मजबूत करण्याची क्षमता नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली. हरडे केवळ पब्लिसिटीसाठी काँग्रेस नेत्यांवर टीका करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेला नगरसेवक सुरेश जग्यासी, प्रशांत धवड, एम.एल. शर्मा, केदार शाहू, भास्कर चापले आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) अग्निहोत्रींनी शिवसेनेला उपदेश देण्याची गरज नाही उमाकांत अग्निहोत्री यांनी शिवसेनेला उपदेश देण्याची गरज नाही. त्यापेक्षा त्यांनी दयनीय अवस्थेत असलेल्या काँग्रेस पक्षाची चिंता करावी, अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे डॉ. रामचरण दुबे यांनी आज येथे आयोजित पत्रपरिषदेत केली. काँग्रेसचे प्रदेश सचिव अग्निहोत्री यांनी सेनेचे जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांच्यावर संघटना बांधण्याची क्षमता नसल्याची टीका केली होती. यावर तीव्र प्रतिक्रिया देत शिवसेनेने अग्निहोत्री यांना धारेवर धरले. शिवसेना पक्ष ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी भूमिका ठेवून काम करतो. पक्षात जातपात पाहून उमेदवारी दिली जात नाही. त्यामुळे अग्निहोत्री यांनी आम्हाला समाजकारण शिकवू नये, असे आवाहन दुबे यांनी केले. शिवसैनिकांनी यावेळी विलास मुत्तेमवार यांच्यावरही टीका केली. मुत्तेमवार हे नऊ वेळा खासदार राहिले आहेत व मंत्रीही राहिले आहेत. तेव्हा त्यांनी विदर्भाच्या विकासासाठी काय केले, असा सवाल दुबे यांनी केला. काँग्रेसने अनेक वर्ष सत्ता उपभोगली आहे, तेव्हा त्यांना आजपर्यंत विदर्भ आठवला नाही आणि आता सत्ता गेल्यावर विदर्भाचा पुळका आल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. पत्रपरिषदेला ओमकार पारवे, राजेश कनोजिया, रविनीश पांडे, नितीन तिवारी, शरद सरोदे, गुलाबराव भोयर आदी उपस्थित होते.