शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

अवघ्या पाच ओळीत शिवरायांचा इतिहास

By admin | Updated: December 17, 2014 00:30 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची सातत्याने अवहेलना करण्यात येत आहे. देशाबाहेरून आलेल्या मुघल सम्राटांना मोठी जागा देणाऱ्या ‘एनसीईआरटी’ने

‘एनसीईआरटी’च्या प्रतापांकडे अद्यापही दुर्लक्ष योगेश पांडे - नागपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची सातत्याने अवहेलना करण्यात येत आहे. देशाबाहेरून आलेल्या मुघल सम्राटांना मोठी जागा देणाऱ्या ‘एनसीईआरटी’ने (नॅशनल कौन्सिल आॅफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग) इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची माहिती अवघ्या पाच ओळीत दिली आहे. पुस्तकात नगण्य स्थान दिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत महाराजांच्या पराक्रमाचा गौरवशाली इतिहास योग्य तऱ्हेने पोहचत नसल्याचे चित्र आहे. राज्य शासन याबाबत पुढाकार घेऊन केंद्र व ‘एनसीईआरटी’ला इतिहासात बदल करायला भाग पाडणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.इयत्ता सातवीच्या ‘हमारे अतीत-२’ या इतिहास विषयाच्या पुस्तकातील बहुतांश पानांमध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघल सम्राटांची माहिती मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहे. परंतु लाखो नागरिकांचे आदर्श असलेल्या शिवरायांची माहिती अवघ्या पाच ओळीत छापण्यात आली आहे. निरनिराळ्या मुघल सम्राटांना स्वतंत्र स्थान देत असताना शिवाजी महाराज, पेशवे यांचा इतिहास ‘मराठा’ या शीर्षकाखाली दीड पानात संपविण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतिहासाच्या या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे एकही छापील चित्र नाही. केंद्रातील हाच अभ्यासक्रम महाराष्ट्रातील अनेक शाळांत शिकवला जात असून, लाखो विद्यार्थी शिवरायांच्या इतिहासापासून वंचित राहत आहेत. यासंदर्भात गेल्या पाच वर्षांपूर्वीदेखील आवाज उठविण्यात आला होता. परंतु त्यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा झाला नव्हता.राज्याच्या अस्मितेचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही फोटो ‘एनसीईआरटी’ला उपलब्ध होऊ नये, ही आश्चर्याची बाब आहे. ही राज्याच्या अस्मितेची बाब आहे. भाजपा-शिवसेनेच्या या सरकारने आपल्या अधिकारात या पुस्तकात बदल करावा. त्यांना पुस्तकात २५ टक्के बदल करण्याचा अधिकार आहे. हे शक्य नसेल तर कमीतकमी केंद्राकडे आक्षेप नोंदवून हा मुद्दा लावून धरावा, असे मत हिंदू जनजागरण समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले. गोवा सरकारने २००९ सालीच या पुस्तकात बदल केला असल्याचा दावादेखील त्यांनी केला. यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.भारतमातेवर आक्षेप?याशिवाय इयत्ता दहावीच्या ‘भारत और समकालीन विश्व-२’ या पुस्तकात भारतमातेचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. ज्या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी देशातील हुतात्म्यांनी जात-धर्म-पंथ यांना बाजूला सारत बलिदान केले, त्यावरून आक्षेपार्ह टीप लिहिण्यात आली आहे. हातात त्रिशूळ घेऊन सिंहाजवळ उभ्या असलेल्या भारतमातेचे चित्र देशातील सर्व पंथ-समुदायांच्या लोकांना मान्य होईल का, असा प्रश्न यात उपस्थित करण्यात आला आहे.