शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

बच्चू कडू- राणा यांच्यातील गैरसमज शिंदे- फडणवीस मिटवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 18:31 IST

Nagpur News आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ठळक मुद्देबावनकुळे यांचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पेंग्विन सेना घेऊन ठाकरेंची टिव-टिव

नागपूर : प्रहारचे आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. त्यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला समर्थन देणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी १ नोव्हेंबरला वेगळा निर्णय घेण्याचा इशारा बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत दिला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सरकारला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले. भाजपसोबत १६४ आमदार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे हे आपले कार्यकर्ते तुटू नयेत, यासाठी सरकार पडण्याच्या वल्गना करीत असून यासाठीच संभ्रम निर्माण करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी राज्यभर दौरा करीत आहे. प्रत्येक दौऱ्यात या तीनही पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. भाजपकडे फ्लो वाढत चालला आहे. त्यामुळे या तीनही पक्षांतील नेते अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरे यांना इव्हेंट मॅनेजमेंटची सवय आहे. जेव्हा सरकारमध्ये अडीच वर्षे संधी होती, तिचे सोने करण्याऐवजी माती केली. आता केवळ पेंग्विन सेना घेऊन टिव-टिव सुरू आहे. कोल्हापूरच्या पुरात फडणवीस यांनी एनडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन दुप्पट-चारपट मदत केली. उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असताना कधीतरी एनडीआरच्या निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे का? हे काम त्यांना करता आले नाही. फेसबुक लाइव्ह न करता ते राज्यभर फिरले असते, आमदारांना सांभाळले असते तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, असा चिमटाही त्यांनी काढला.

आ. राणांनी केलेल्या आरोपांची ईडी, सीबीआय चौकशी व्हावी : लोंढे

- आ. रवी राणा यांनी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा चिमटाही लोंढे यांनी काढला आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBacchu Kaduबच्चू कडू