शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

बच्चू कडू- राणा यांच्यातील गैरसमज शिंदे- फडणवीस मिटवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 18:31 IST

Nagpur News आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ठळक मुद्देबावनकुळे यांचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पेंग्विन सेना घेऊन ठाकरेंची टिव-टिव

नागपूर : प्रहारचे आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. त्यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला समर्थन देणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी १ नोव्हेंबरला वेगळा निर्णय घेण्याचा इशारा बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत दिला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सरकारला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले. भाजपसोबत १६४ आमदार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे हे आपले कार्यकर्ते तुटू नयेत, यासाठी सरकार पडण्याच्या वल्गना करीत असून यासाठीच संभ्रम निर्माण करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी राज्यभर दौरा करीत आहे. प्रत्येक दौऱ्यात या तीनही पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. भाजपकडे फ्लो वाढत चालला आहे. त्यामुळे या तीनही पक्षांतील नेते अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरे यांना इव्हेंट मॅनेजमेंटची सवय आहे. जेव्हा सरकारमध्ये अडीच वर्षे संधी होती, तिचे सोने करण्याऐवजी माती केली. आता केवळ पेंग्विन सेना घेऊन टिव-टिव सुरू आहे. कोल्हापूरच्या पुरात फडणवीस यांनी एनडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन दुप्पट-चारपट मदत केली. उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असताना कधीतरी एनडीआरच्या निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे का? हे काम त्यांना करता आले नाही. फेसबुक लाइव्ह न करता ते राज्यभर फिरले असते, आमदारांना सांभाळले असते तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, असा चिमटाही त्यांनी काढला.

आ. राणांनी केलेल्या आरोपांची ईडी, सीबीआय चौकशी व्हावी : लोंढे

- आ. रवी राणा यांनी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा चिमटाही लोंढे यांनी काढला आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBacchu Kaduबच्चू कडू