शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू- राणा यांच्यातील गैरसमज शिंदे- फडणवीस मिटवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 18:31 IST

Nagpur News आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ठळक मुद्देबावनकुळे यांचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पेंग्विन सेना घेऊन ठाकरेंची टिव-टिव

नागपूर : प्रहारचे आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. त्यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला समर्थन देणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी १ नोव्हेंबरला वेगळा निर्णय घेण्याचा इशारा बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत दिला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सरकारला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले. भाजपसोबत १६४ आमदार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे हे आपले कार्यकर्ते तुटू नयेत, यासाठी सरकार पडण्याच्या वल्गना करीत असून यासाठीच संभ्रम निर्माण करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी राज्यभर दौरा करीत आहे. प्रत्येक दौऱ्यात या तीनही पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. भाजपकडे फ्लो वाढत चालला आहे. त्यामुळे या तीनही पक्षांतील नेते अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरे यांना इव्हेंट मॅनेजमेंटची सवय आहे. जेव्हा सरकारमध्ये अडीच वर्षे संधी होती, तिचे सोने करण्याऐवजी माती केली. आता केवळ पेंग्विन सेना घेऊन टिव-टिव सुरू आहे. कोल्हापूरच्या पुरात फडणवीस यांनी एनडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन दुप्पट-चारपट मदत केली. उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असताना कधीतरी एनडीआरच्या निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे का? हे काम त्यांना करता आले नाही. फेसबुक लाइव्ह न करता ते राज्यभर फिरले असते, आमदारांना सांभाळले असते तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, असा चिमटाही त्यांनी काढला.

आ. राणांनी केलेल्या आरोपांची ईडी, सीबीआय चौकशी व्हावी : लोंढे

- आ. रवी राणा यांनी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा चिमटाही लोंढे यांनी काढला आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBacchu Kaduबच्चू कडू