शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

शेषराव मोरे आणि अदिती हर्डीकर यांना संस्कार भारतीचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 14:47 IST

संस्कार भारतीच्या वतीने या वर्षापासून दिला दिल्या जाणारा 'स्व. डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' जेष्ठ विचारवंत शेषराव मोरे आणि लेखिका अदिती जोगळेकर-हर्डीकर यांना प्रदान केला जाणार आहे.

ठळक मुद्दे'गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी' आणि 'कला व राष्ट्रविचार' या ग्रंथांची निवड'

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: संस्कार भारतीच्या वतीने या वर्षापासून दिला दिल्या जाणारा 'स्व. डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' जेष्ठ विचारवंत शेषराव मोरे आणि लेखिका अदिती जोगळेकर-हर्डीकर यांना प्रदान केला जाणार आहे.राजहंस प्रकाशनाच्या शेषराव मोरे लिखित 'गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी' व विवेकानंद केंद्राच्या मराठी विभागाने प्रकाशित केलेल्या अदिती हर्डीकर लिखित 'कला आणि राष्ट्रविचार' या साहित्यकृतींची निवड यावर्षीच्या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.मानपत्र आणि १५००० रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून दि. ३ ऑगस्ट २०१९ रोजी विदर्भ संस्कार भारतीच्या वरोरा येथे आयोजित प्रांत अधिवेशनात तो समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त, प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील बर्वे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रांताध्यक्ष सूरमणी प्रा.कमल भोंडे, महामंत्री आशुतोष अडोणी, सेंसार बोर्ड सदस्य चंद्रकांत घरोटे यावेळी उपस्थित राहणार आहेत.डॉ. कल्पना व्यवहारे उमरेडच्या कला वाणिज्य महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक होत्या. व्यासंगी वैचारिक व ललित लेखक म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांची कन्या सौ. वैशाली देशपांडे व दीपाली एकताटे यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिल्या जाणार आहे.यावर्षी दिल्या जाणारा पहिला पुरस्कार वैचारिक लेखनासाठी निश्चित करण्यात आला होता. रवींद्र देशपांडे, प्रकाश एदलाबादकर व डॉ. छाया नाईक यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने पुरस्कारार्थ ग्रंथ निवड केली.प्रखर बुद्धिनिष्ठ,वैचारिक लेखनाचा प्रवाह समृद्ध करणारे मराठीतील एक सशक्त लेखक, विचारवंत म्हणून शेषराव मोरे यांची ख्याती आहे. स्वा. सावरकरांच्या विचारांचे चिकित्सक अभ्यासक आणि समर्थ भाष्यकार असणाऱ्या शेषराव मोरे यांनी १८५७ चा जिहाद, अप्रिय पण, काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?, काश्मीर एक शापित नंदनवन, प्रेषितानंतरचे पहिले चार आदर्श खलिफा, मुस्लिम मनाचा शोध, विचारकलह, सत्य आणि विपर्यास, सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद, सावरकरांचे समाजकारण आदी महत्वपूर्ण वैचारिक ग्रंथलेखन करून मराठी साहित्यात भरीव योगदान दिले आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मानाचे धनी असलेल्या शेषराव मोरे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह अनेक व्यासपीठांवरून वैचारिक मंथन घडवले आहे.गांधीहत्येसंबंधात स्वा. सावरकरांवरील आधारहीन आरोपांचा अतिशय अभ्यासपूर्ण, साधार, संतुलित आणि खणखणीत समाचार 'गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी' या ग्रंथात मोरे यांनी घेतला आहे.जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई येथून कलापारंगत अदिती हर्डीकर उत्तम निवेदिका, सृजनशील चित्रकार व ललित लेखिका म्हणून परिचित आहेत. रचनात्मक शैक्षणिक उपक्रम राबविणा?्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी कार्य केले आहे. छात्र प्रबोधन, दै सकाळ, विवेक विचार व कला विषयक विविध नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे.स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांच्या कला विचारांचे समीक्षण करणारा आणि कलाविषयक भारतीय चिंतनाची मौलिकता विषद करणारा त्यांचा कला आणि राष्ट्रविचार हा ग्रंथ पदार्पणातच लक्षवेधी ठरला आहे.

टॅग्स :literatureसाहित्य