शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ राबत आहे, केवळ मुलींसाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:07 IST

शरद मिरे भिवापूर : सततच्या नापिकीमुळे वाढलेल्या कर्जामुळे हताश व निराश झालेला बळीराजा आत्महत्या करतो. मग सरकार लाख - ...

शरद मिरे

भिवापूर : सततच्या नापिकीमुळे वाढलेल्या कर्जामुळे हताश व निराश झालेला बळीराजा आत्महत्या करतो. मग सरकार लाख - दोन लाखांची मदत करत, आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करते. मात्र शासनाच्या तुटपुंज्या मदतीने खरंच पीडित कुटुंबाचं जगणं सुसह्य होते का, हा प्रश्नच आहे. कारण शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर आधार हरवलेली ‘ती’ आता दुसऱ्याच्या शेतात दिवसरात्र कष्ट उपसतेय. ‘ती’ राबत आहे. जगत आहे. केवळ पोटच्या दोन मुलींसाठी!

तालुक्यातील चिखली येथील शेतकरी राजेंद्र डोमाजी पिंपळकर या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून ११ जानेवारी २०१९ रोजी शेतातील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. पत्नी कविताच्या कपाळावरील कुंकू कायमचे पुसले गेले. जान्हवी व साक्षी या चिमुकल्या मुलींचे पालकत्व हरपले. राजेंद्रकडे चार एकर शेती. त्यात कुटुंबाचे पालनपोषण आणि मुलींचे शिक्षण ही जबाबदारी होती. त्यावेळी जान्हवी ११ वीत, तर साक्षी ८ वी मध्ये शिकत होती. आता यातील जान्हवी बी.ए. भाग १ ला, तर साक्षी १० वीमध्ये शिकत आहे. दोन्ही बहिणी दररोज चिखलीवरून एकाच सायकलने भिवापूरला शिक्षणाकरिता येतात. विधवा झालेली मायमाउली कविता मुलींच्या शिक्षणासाठी शेतात कष्ट उपसते. हयातीत असताना राजेंद्र चार एकर शेती वाहायचा, मात्र त्याच्या निधनानंतर कविता एकाकी पडली. त्यामुळे गावालगतची दोन एकर शेती ‘ती’ स्वत: करत आहे, तर लांब असलेली दोन एकर शेती पडीत आहे. त्यातही दोन एकर शेतात पेरलेले पीक कधी कीड व रोगांचा प्रादुर्भाव खाऊन टाकते तर कधी निसर्गाच्या चक्रव्यूहात शेतातील उभे पीक जमीनदोस्त होते. अशा विदारक परिस्थितीत पोटाची खळगी भरून दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याचे मोठे आवाहन कविता पुढे आहे. त्यामुळे ‘ती’ स्वत:च्या दोन एकर शेतात कष्ट उपसत, गावातील इतरांच्या शेतात मजुरीचे काम करते. यातून मिळणाऱ्या मजुरीत ‘ती’ संसारगाडा हाकत आहे.

शेतकरी आत्महत्येचं ‘स’मूळ नष्ट व्हावे!

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो, तेव्हा घरातील कर्ता पुरुष गेल्याचे दु:ख व वेदना केवळ ‘त्या’ कुटुंबाला माहीत असतात. लाख रुपयांच्या शासकीय मदतीने या वेदना व दु:ख संपत नाही, अशी खंत जान्हवीने ‘लोकमत’कडे व्यक्त केली. त्यामुळे शासनाने शेतकरी आत्महत्येचं ‘स’मूळ नष्ट करावे. कर्ज व नापिकीला कंटाळून शेतकरी बळीराजा भविष्यात आत्महत्येचे पाऊलच उचलणार नाही, अशी व्यवस्था उभी करणे आवश्यक असल्याचे ती म्हणाली.

१० वर्षांत २३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

भिवापूर तालुक्यात गत १० वर्षांतील शेतकरी आत्महत्येकडे बघितल्यास, प्रत्येक वर्षात कधी दोन तर कधी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०१० पासून ९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत तालुक्यात तब्बल २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यातील २०२० पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त २० कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली, तर या वर्षातील आत्महत्येचे ३ प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.