शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मनाशी निश्चय करून ती मृत्यूच्या दारात उभी झाली अन् ...  असे काही घडले की.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2023 23:08 IST

Nagpur News पतीच्या संशयखोर स्वभावाला कंटाळून तिने निश्चय केला आणि ती पोहचली अजनी रेल्वे स्थानकावर.. येणाऱ्या रेल्वेगाडीखाली स्वतःला झोकून द्यायचा तिचा विचार होता.. पण असे काही घडले की..

नरेश डोंगरे नागपूर : पती पत्नीतील किरकोळ वादामुळे तिच्या मनात काहूर उठले. रोजच्या कटकटीमुळे ती अक्षरश: वैतागली अन् नकोच हा जीव म्हणत रामटेकहून नागपुरात पोहचली. रेल्वेखाली झोकून द्यायचे आणि एकदाचे सर्वच संपवायचे, या विचारात असताना तिचा फोन खणखणला. पलिकडून बोलणारा तिचा पती होता. आत्महत्या करायला अजनी रेल्वेस्थानकावर आल्याचे तिने त्याला एका झटक्यात सांगून टाकले. ते ऐकून तो हादरला अन् तिला आपल्या प्रेमाची, घरच्यांची आठवण करून देत तिला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले. ती बधत नव्हती. दूरून भोंगा वाजवत येणारी रेल्वेगाडी त्याच्या काळजाची धडधड वाढवत होती. अचानक त्याने तिला आपल्या काळजाच्या तुकड्यांची आण घातली. तू गेल्यानंतर त्यांचे कसे होईल, असा प्रश्न केला. या प्रश्नाने तिची ममता पाझरली अन् ...

घटना कमालीची हृदयस्पर्शी आहे. कमला आणि कमाल (काल्पनिक नावे) रामटेकजवळ राहतात. एकाच गावात, आजुबाजुला राहत असल्याने बालपणापासूनच त्यांची मैत्री. वयात आल्यानंतर ती प्रेमात रुपांतरीत झाली. दोघेही होतकरू, त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरच्यांनी जातीचे कारण सांगून कडाडून विरोध केला. तो झिडकारून या दोघांनी ९ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यांना दोन गोंडस मुले (मुलगा-मुलगी) झाली. रोजगार अस्थिर असला तरी एकमेकांच्या प्रेमाच्या शिदोरीवर त्यांचे जीवनगाणे चांगले सुरू होते.

मात्र, कुणाची नजर लागली कळायला मार्ग नाही. दोघांच्याही मनात शंकांनी घर केले अन् सुरू झाल्या कटकटी. तो तिचेवर आणि ती त्याच्यावर संशय घेऊन भांडू लागले. दोन दिवसांपासून या वादाने टोक गाठले अन् तिच्या मनात विचारांचे काहूर उठले. प्रचंड तणावात आल्यामुळे काय चांगले, काय वाईट याचा विचार न करता तिने थेट आत्महत्या करण्याचाच निर्णय घेतला. ती नागपुरातील अजनी स्थानकावर पोहचली. तत्पूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिली. जगणे असह्य झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद केले. तत्पूर्वी पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून आत्महत्या करीत असल्याचेही सांगितले. आता गाडी आली की, तिच्यासमोर स्वत:ला झोकून द्यायचे, या विचाराने ती फलाटावर उभी होती.

दरम्यान, दुपारचे ४ वाजले, घरून गेलेली कमला अजून घरी परतली नसल्याने अस्वस्थ असलेल्या कमालच्या मनातही शंका-कुंशकांचे वादळ उठले. त्याने कमलाच्या मोबाईलवर संपर्क केला. तिने फोन उचलला. कुठे आहे, म्हणताच आत्महत्या करायला अजनी रेल्वेस्थानकावर आल्याचे तिने सांगितले. गाडीची वाट बघत आहे, असेही बोलून दाखविले. त्याने तिला स्वत:ची, आपल्या प्रेमाची शपथ दिली. तिच्या आईवडिलांची आण घातली. ती मात्र बधत नव्हती. तिचा दृढनिश्चय कमालच्या काळजाचे पाणी करत होता. अशात दूरवरून स्थानकात येऊ पाहणाऱ्या रेल्वेगाडीचा भोंगा वाजला अन् रडकुंडीला आलेल्या कमालने तिला आपल्या पोटच्या मुलांची शपथ दिली. तू गेल्यानंतर त्यांचे कसे होणार, असा प्रश्न केला अन् आतापर्यंत स्त्री हट्टाने पेटलेल्या कमलातील आई जागली. ती झटक्यात भानावर आली आणि तिने एकच हंबरडा फोडला. दरम्यान, कंट्रोलला कॉल गेल्याने धंतोलीचे पोलीस कर्मचारी रेल्वे स्थानकावर पोहचले. तोपर्यंत काही सजग रेल्वे प्रवाशांच्याही लक्षात हा प्रकार आला होता. त्यामुळे साऱ्यांनीच तिला मायेची उब देऊन रेल्वे पोलीस ठाण्यात पोहचवले.पती, आई, बहिण सारेच धावलेदरम्यान, पतीने कमलाच्या आई आणि बहिणीला माहिती दिल्यामुळे चिमुकल्यांसह ते एकत्रच रेल्वे पोलीस ठाण्यात पोहचले. ठाणेदार मनिषा काशिद यांनी कमलाच्या माहेरच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली. पती चांगला आहे, ही थोडी शिघ्रकोपी असल्याचे प्राथमिक चाैकशीतून पुढे आले. ठाणेदार काशिद यांनी कमलाचे समुपदेशन केले. तिच्या पतीलाही समजावून सांगितले. एकमेकांवर नाहक संशय घेत असल्यामुळे सुखी संसार दुखी झाल्याचेही लक्षात आणून दिले. दोघांनाही चूक उमगली अन् नंतर काळजांच्या तुकड्यांचा लाड करत त्यांनी आपल्या घराचा रस्ता धरला.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर