शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

...अन् तिने प्रियकराऐवजी पालकांना दिले झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:19 IST

High court, Love story १९ वर्षीय प्रियकराने त्याच्या २७ वर्षीय प्रेयसीला पालकांच्या ताब्यातून बाहेर काढण्यासाठी आणि तिला सोबत घेऊन जाण्यासाठी मोठ्या आशेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु, प्रेयसीने प्रियकराऐवजी पालकांना झुकते माप देऊन त्यांच्यासोबतच जाणे व राहणे पसंत केले. ''अजब प्रेम की गजब कहाणी'' प्रकारात मोडणारे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले.

ठळक मुद्देमुलीला डांबून ठेवल्याचा प्रियकराचा आरोप ठरला निरर्थक

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : १९ वर्षीय प्रियकराने त्याच्या २७ वर्षीय प्रेयसीला पालकांच्या ताब्यातून बाहेर काढण्यासाठी आणि तिला सोबत घेऊन जाण्यासाठी मोठ्या आशेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु, प्रेयसीने प्रियकराऐवजी पालकांना झुकते माप देऊन त्यांच्यासोबतच जाणे व राहणे पसंत केले. ''अजब प्रेम की गजब कहाणी'' प्रकारात मोडणारे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले.

अभिषेक बाबू असे प्रियकराचे नाव आहे. त्याची प्रेयसी कविता (बदललेले नाव) अभियांत्रिकी पदवीधारक असून सध्या ती बी. एड. पदवीचे शिक्षण घेत आहे. ती फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयात गेली. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यामुळे ती घरीच राहायला लागली. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कविता व अभिषेक पुणे येथे एकमेकांना भेटले. तेथे त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्यानंतर ते नागपूरला येऊन पुन्हा एक रात्र हॉटेलमध्ये थांबले. दुसऱ्या दिवशी ते आपापल्या घरी निघून गेले. पुढे अभिषेकचा कवितासोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कविताला तिच्या पालकांनी अवैधरीत्या डांबून ठेवले असावे असा त्याचा समज झाला. परिणामी, त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कविताला पालकांच्या ताब्यातून बाहेर काढण्याची विनंती केली. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी कविताला न्यायालयात आणले. न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी दोन महिला अधिकाऱ्यांमार्फत कविताची विचारपूस केली असता, तिने पालकांवरील आरोप अमान्य केले. पालकांनी बळजबरीने घरात डांबून ठेवले नाही अशी माहिती तिने दिली. कविताची आईदेखील न्यायालयात उपस्थित होती. तिने कविता अभिषेकसाेबत जाण्यास तयार असल्यास आक्षेप घेणार नाही अशी भूमिका मांडली. त्यानंतर कवितानेच अभिषेकऐवजी पालकांसोबत जाण्यास व राहण्यास पसंती दिली. त्यामुळे अभिषेकचा भ्रमनिरास झाला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट