शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शेतकऱ्यांमध्ये शरद जोशींनी स्वाभिमान जागृत केला

By admin | Updated: December 27, 2015 03:24 IST

शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाला नवी दिशा दिली. त्यांनी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला.

मान्यवरांचे मत : तिरपुडे महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजलीनागपूर : शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाला नवी दिशा दिली. त्यांनी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला. त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे काम केले, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.सिव्हिल लाईन्स येथील तिरपुडे महाविद्यालयाच्या ठवरे सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी राजकुमार तिरपुडे होते. व्यासपीठावर निवृत्त पोलीस महासंचालक पी. के. बी. चक्रवर्ती, अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, दिलीप नरवडिया, धनंजय धार्मिक, इंद्रजित आमगावकर, अरुण केदार उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे राम नेवले म्हणाले, शरद जोशींनी कांदा, ऊस, कापसाला भाव मिळावा यासाठी अनेकदा आंदोलने केली. अनेक मेळावे घेऊन त्यांनी देशाच्या विकासाचे मूळ शेतमालाच्या भावात आहे हे सरकारला पटवून दिले. शेतकऱ्यांना कर्जात मरू देणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. परंतु त्यांच्या अकस्मात निधनामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, शरद जोशींनी शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा मंत्र देऊन त्यांच्यात आत्मविश्वास जागृत केला. आत्मविश्वासावर शेतकरी संघटना उभी करून तरुण शेतकऱ्यांना संघटित केले. माजी पोलीस महासंचालक पी. के. बी. चक्रवर्ती म्हणाले, देशाला नवा विचार देऊन शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी शरद जोशींसोबत केलेल्या आंदोलनांना उजाळा देऊन शेतकऱ्यांचा चांगला नेता देशाने गमावल्याची खंत व्यक्त केली. संचालन अरुण केदार यांनी केले. कार्यक्रमाला बाबा कोंबाडे, वामनराव कोंबाडे, तिरपुडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)