शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

शंकरबाबांच्या २४व्या मुलीचा विवाह ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

नागपूर : विवाह हा राष्ट्रीय महोत्सव व्हावा, ही कल्पनाच मनाला न शिवणारी. मात्र, या संकल्पनेला मूर्त रूप देणारे ज्येष्ठ ...

नागपूर : विवाह हा राष्ट्रीय महोत्सव व्हावा, ही कल्पनाच मनाला न शिवणारी. मात्र, या संकल्पनेला मूर्त रूप देणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर आहेत. त्यांनी सांभाळलेल्या बेवारस, उपेक्षित दिव्यांग मूकबधिरांना पालकत्त्व बहाल केले आणि त्यांच्या भविष्याची तजवीजही करून ठेवली. त्याच उपक्रमातील त्यांच्या २४ व्या मुलीचा विवाह ठरला आहे. विशेष म्हणजे, या मुलीचा कन्यादान संस्कार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांची भार्या आरती देशमुख करणार आहेत.

शंकरबाबा पापळकर अमरावती येथून ६० किमी अंतरावर असलेल्या वझ्झर येथे स्व. अंबादासपंत वैद्य अनाथालय चालवतात. येथे वर्तमानात बेवारस व दिव्यांग, मूकबधिर अशा ९८ मुली व २५ मुले आहेत. यातीलच वर्षा ही एक मूकबधिर मुलगी. याच आश्रमात राहणारा समीर हाही एक मूकबधिर मुलगा आहे. वर्षा ही एक वर्षाची असताना नागपूर रेल्वे स्थानकावर सापडली तर समीर हा दोन तीन वर्षाचा असताना डोंबिवली मुंबई येथे सापडला. या दोघांनाही आपले नाव देऊन शंकरबाबांनी त्यांचे संगोपन करत स्वावलंबनाचे धडे दिले. दोघेही मोठे झाले आणि त्यांच्या भविष्याचा विचार सुरू झाला. या दोघांचाही विवाह २० डिसेंबर रोजी नागपुरात ठरला आहे. हा सोहळा राष्ट्रीय महोत्सवासारखा साजरा व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. हेतू हाच की दिव्यांग, मूकबधिरांच्या पुनर्वसनाचा कायदा व्हावा. या सोहळ्यात गृहमंत्री देशमुख दाम्पत्य आपल्या शब्दाला जागत कन्यादान संस्कार पार पाडणार आहेत. सोहळ्याच्या माध्यमातून १८ वर्षावरील दिव्यांग बेवारस मुलामुलींना आजीवन पुनर्वसनाकरिता बालगृहात राहू द्यावे, असा भारत सरकारने कायदा करावा, असा आग्रह धरला जाणार आहे.

कायदा हाच माझा पुरस्कार - शंकरबाबा

शासनाने अनेकदा मला पुरस्कार जाहीर केले. परंतु, कायदाच होणार नसेल तर त्या पुरस्काराचे काय करू. हा दिव्यांग, मूकबधिर बेवारस पुनर्वसनाचा कायदा होणे हाच माझा पुरस्कार असल्याची भावना शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली.

२५ नातवंडांचे आजोबा

शंकरबाबांनी आतापर्यंत आश्रमाच्या माध्यमातून २३ बेवारस दिव्यांग मुलींचे लग्न लावून दिले आहे. त्यातील १८ मुलींना सुदृढ अशी मुले झाली असून, २५ नातवंडांचा आजोबा असल्याचे ते आनंदाने सांगतात. कोणतीही शासकीय मदत नाकारात ते केवळ शेगाव देवस्थान व हनुमान व्यायाम शाळेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवत आहेत.