शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

शाब्बास! नागपूर पोलीस

By admin | Updated: October 13, 2016 03:54 IST

सर्जिकल स्ट्राइकनंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला वेगळी अनुभूती देणारी होती.

नागपूर : सर्जिकल स्ट्राइकनंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला वेगळी अनुभूती देणारी होती. दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपूरला सुरक्षा यंत्रणांकडून ‘जागते रहो’ अर्थात् सतर्कतेच्या सूचना मिळाल्या होत्या. दरम्यान, पवित्र दीक्षाभूमीवर समतेचे सोने लुटण्यासाठी लाखोंच्या संख्येत बौद्ध बांधव हजेरी लावणार होते. अशा परिस्थितीत शहर पोलिसांची ही अग्निपरीक्षाच होती. परंतु पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे योग्य नियोजन आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रम व सतर्कतेमुळे शहरात दसरा व धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा शांततेत यशस्वीपणे पार पडला. पोलीसही या अग्निपरीक्षेत यशस्वी ठरले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी दिवस तसेच रात्र अशा दोन पाळीत सातत्याने कर्तव्य पार पाडले. त्यासाठी १३०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी (महिला-पुरुष) तैनात करण्यात आले होते. पवित्र दीक्षाभूमीच्या आतबाहेर आणि चोहोबाजूने पोलीस बंदोबस्त होता. साध्या वेशातील जवानही गर्दीच्या आतबाहेर चौकस नजर ठेवून होते. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लावण्यात आले होत. दीक्षाभूमी परिसरातील बंदोबस्त हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले होते. गर्दीत हरविलेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकानेही मदत केली. कुणालाही, कसलीही अडचण असल्यास पोलीस तात्काळ मदत करायचे. नागरिकांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी विविध प्रकारचे फलक या भागात लावण्यात आले होते. पोलीस उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांच्या थेट निगराणीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यावर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची नजर होती. बारीकसारीक घडामोडींची माहिती सतत घेतली जात होती. . सर्वांना व्यवस्थित जाता-येता यावे, यासाठी विशिष्ट प्रकारची बॅरेकेटिंग करण्यात आली आहे. यासोबतच स्मार्तना पाटील यांनी वाहतूक व्यवस्थेचे यशस्वी नियोजन पार पाडले. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा झाला नाही. १६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. वाहनांची कोंडी न झाल्याने अनुयायांना सुद्धा व्यवस्थितपणे दीक्षाभूमीवर येता आले आणि बाहेर जाता आले. (प्रतिनिधी)