शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

पत्नीसोबत बळजबरीचा समागम हा बलात्कार ठरवावा का? नागपुरातील विधिज्ञांनी व्यक्त केली 'ही' मते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 20:29 IST

Nagpur News पतीने स्वत:च्या पत्नीसोबत बळजबरीने केलेल्या समागमाला बलात्काराच्या व्याख्येतून वगळण्याच्या अपवादाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात या मुद्याकडे ज्वलंत विषय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण देशात चर्चिला जात असलेला ज्वलंत मुद्दा

राकेश घानोडे

नागपूर : पतीने स्वत:च्या पत्नीसोबत बळजबरीने केलेल्या समागमाला बलात्काराच्या व्याख्येतून वगळण्याच्या अपवादाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात या मुद्याकडे ज्वलंत विषय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. परिणामी, शहरातील महिला व पुरुष विधिज्ञांची मते जाणून घेतली असता, त्यांनी यासंदर्भात संमिश्र विचार व्यक्त केले.

भारतीय दंड विधानातील कलम ३७५ मध्ये बलात्काराची व्याख्या देण्यात आली आहे. त्या व्याख्येला एक अपवाद असून त्यानुसार १५ वर्षांवरील वयाच्या पत्नीसोबत कोणत्याही परिस्थितीत केलेला समागम बलात्कार ठरत नाही. शहरातील काही विधिज्ञांनी या अपवादाचे समर्थन केले तर, काहींनी हा अपवाद कायद्यातून वगळला गेला पाहिजे, अशी भूमिका मांडली.

पत्नीकरिता इतर कायदेशीर तरतुदी उपलब्ध

आधीच धोक्यात असलेली कुटुंब संस्था आणखी कमकुवत होऊ नये, याकरिता हा अपवाद कायम राहणे आवश्यक आहे. लग्नानंतर दाम्पत्याला एकमेकांसोबत समागम करण्याचा अधिकार प्राप्त होतो. हा अधिकार काढून घेतल्यास कुटुंब संस्थेवर वाईट परिणाम होतील. समागमासाठी पतीकडून बळजबरी झाल्यास पत्नीकरिता भादंवि कलम ४९८-अ, कौटुंबिक हिंसाचार कायदा आदी कायदेशीर आधार उपलब्ध आहेत.

ॲड. फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ विधिज्ञ, हायकोर्ट.

पत्नीसोबत बळजबरीने समागम बलात्कारच

पत्नीसोबत बळजबरीने केलेला समागम बलात्काराचा गुन्हा ठरणे आवश्यक आहे. महिलेने लग्न केले म्हणून तिचा ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही. राज्यघटनेनुसार तिला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. पतीला नकार ऐकता आला पाहिजे. पतीने एवढी समज दाखविल्यास कुटुंब संस्था आणखी बळकट होईल.

 ॲड. केतकी जोशी, मुख्य सरकारी अधिवक्ता, हायकोर्ट.

अपवाद वगळल्यास वाद वाढतील

पतीने पत्नीसोबत केलेला समागम कोणत्याही परिस्थितीत बलात्काराचा गुन्हा ठरवला जाऊ शकत नाही. कायद्यातील अपवाद वगळल्यास पती-पत्नीमधील वाद वाढतील. त्यातून पतीवर वाईट हेतूने बलात्काराचे खोटे आरोप केले जातील. याशिवाय पती-पत्नीमधील विश्वासाचे घट्ट नाते कमकुवत होईल.

ॲड. शशिभूषण वाहाणे, ज्येष्ठ विधिज्ञ, हायकोर्ट.

पत्नी ही पतीची मालमत्ता नाही

पतीने पत्नीसोबत तिच्या मनाविरुद्ध केलेल्या समागमाला बलात्काराचा गुन्हा ठरवले गेले पाहिजे. लग्न झाल्यानंतर पती हा पत्नीला स्वत:ची मालमत्ता समजायला लागतो. तो पत्नीचे मूलभूत अधिकार नाकारतो. पत्नीला स्वत:च्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तिच्या मनाविरुद्ध समागम केले जाऊ शकत नाही.

ॲड. निवेदिता मेहता, सहायक सरकारी अधिवक्ता, हायकोर्ट.

बलात्काराच्या तक्रारीचा अधिकार मिळावा

पत्नीची समागम करण्याची इच्छा नसेल तर, पती बळजबरी करू शकत नाही. याकरिता पती हा पत्नीवर हक्क सांगू शकत नाही. पतीने बळजबरीने समागम केल्यास त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्याचा अधिकार पत्नीला मिळायला हवा.

 ॲड. सुधीर पुराणिक, ज्येष्ठ विधिज्ञ, हायकोर्ट.

अपवाद कायम ठेवणे आवश्यक

संसाराची घडी नीट राहण्यासाठी पत्नीसोबतच्या समागमाला बलात्काराच्या व्याख्येतून वगळण्याची तरतूद कायम ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा पतीविरुद्ध बलात्काराच्या खोट्या तक्रारी दाखल केल्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे विवाह संस्था मोडकळीस येईल. पत्नीला स्वत:च्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी अन्य कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत.

----- ॲड. ज्योती धर्माधिकारी, ज्येष्ठ अधिवक्ता, हायकोर्ट.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHigh Courtउच्च न्यायालय