शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाचे परिणाम देशासाठी घातक

By admin | Updated: September 27, 2015 02:39 IST

शासकीय नोकरदार वर्गाकडून कुठलीही मागणी झाली नसतानाही शासनाने सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे.

जनमंचचा जनसंवाद : संघटित-असंघटितांतील दरी आणखी वाढणार नागपूर : शासकीय नोकरदार वर्गाकडून कुठलीही मागणी झाली नसतानाही शासनाने सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. याअंतर्गत शासकीय नोकरदारांच्या वेतनात ३० पटीने वाढ होणार आहे. एकीकडे संघटित असलेल्या शासकीय नोकरदारांचे वेतन भरमसाट वाढविले जात आहेत. दुसरीकडे शेतकरी, शेतमजुरांसह एकूणच असंघटितांचे काय? सहाव्या वेतन आयोगामुळे आधीच संघटित व असंघटितांमध्ये शासनाने प्रचंड अशी दरी निर्माण करून ठेवली आहे. सातव्या वेतन आयोगामुळे ही दरी आणखी वाढणार आहे. त्याचे परिणाम देशासाठी घातक ठरतील, असा धोक्याचा इशारा जनमंचच्या जनसंवाद या कार्यक्रमाद्वारे उपस्थित मान्यवरांनी दिला.जनमंच या सामजिक संघटनेद्वारे रामदासपेठ येथील ‘विष्णुजी की रसोई’ येथे सायंकाळी ‘सातवा वेतन आयोग आणि शेतकरी’ या विषयावर जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक मुख्य अतिथी होते. जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. शरद पाटील यांनी अतिशय रोखठोक मत व्यक्त केले. संघटित शक्तीच्या भरवशावर नोकरदार असे लाभ पदरात पाडून घेत आहेत. ही कायद्यात बसवून करण्यात आलेली लूट आहेत. त्यासाठी ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. सुधीर पाठक म्हणाले, राजकीय पक्ष हे केवळ मताला घाबरतात. शासकीय नोकरदार वर्ग हे संघटित आहेत म्हणूनच त्यांना न मागता सर्वकाही मिळते. सातव्या वेतन आयोगाचा लाभ हा केवळ २ टक्के नोकरदार व पेन्शनर्स वर्गाला मिळणार आहे. संघटित नोकरदाराला सर्व लाभ हवे, परंतु निर्बंध नव्हे. शासकीय नोकरवर्गाला वेतनवाढ देत असताना त्याच्या कामाचे कुठे तरी मूल्यमापनही झाले पाहिजे. अ‍ॅड. अनिल किलोर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, आम्ही नोकरदार वर्गाच्या विरोधात नाही, परंतु शेतकऱ्यांचाही विचार केला जावा. शेतकरी एकजूट नाही तो दबाव निर्माण करू शकत नाही म्हणून शासनाने त्याचा विचारच करू नये का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संचालन राजीव जगताप यांनी केले. (प्रतिनिधी)