शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

सातव्या वेतन आयोगाचे परिणाम देशासाठी घातक

By admin | Updated: September 27, 2015 02:39 IST

शासकीय नोकरदार वर्गाकडून कुठलीही मागणी झाली नसतानाही शासनाने सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे.

जनमंचचा जनसंवाद : संघटित-असंघटितांतील दरी आणखी वाढणार नागपूर : शासकीय नोकरदार वर्गाकडून कुठलीही मागणी झाली नसतानाही शासनाने सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. याअंतर्गत शासकीय नोकरदारांच्या वेतनात ३० पटीने वाढ होणार आहे. एकीकडे संघटित असलेल्या शासकीय नोकरदारांचे वेतन भरमसाट वाढविले जात आहेत. दुसरीकडे शेतकरी, शेतमजुरांसह एकूणच असंघटितांचे काय? सहाव्या वेतन आयोगामुळे आधीच संघटित व असंघटितांमध्ये शासनाने प्रचंड अशी दरी निर्माण करून ठेवली आहे. सातव्या वेतन आयोगामुळे ही दरी आणखी वाढणार आहे. त्याचे परिणाम देशासाठी घातक ठरतील, असा धोक्याचा इशारा जनमंचच्या जनसंवाद या कार्यक्रमाद्वारे उपस्थित मान्यवरांनी दिला.जनमंच या सामजिक संघटनेद्वारे रामदासपेठ येथील ‘विष्णुजी की रसोई’ येथे सायंकाळी ‘सातवा वेतन आयोग आणि शेतकरी’ या विषयावर जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक मुख्य अतिथी होते. जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. शरद पाटील यांनी अतिशय रोखठोक मत व्यक्त केले. संघटित शक्तीच्या भरवशावर नोकरदार असे लाभ पदरात पाडून घेत आहेत. ही कायद्यात बसवून करण्यात आलेली लूट आहेत. त्यासाठी ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. सुधीर पाठक म्हणाले, राजकीय पक्ष हे केवळ मताला घाबरतात. शासकीय नोकरदार वर्ग हे संघटित आहेत म्हणूनच त्यांना न मागता सर्वकाही मिळते. सातव्या वेतन आयोगाचा लाभ हा केवळ २ टक्के नोकरदार व पेन्शनर्स वर्गाला मिळणार आहे. संघटित नोकरदाराला सर्व लाभ हवे, परंतु निर्बंध नव्हे. शासकीय नोकरवर्गाला वेतनवाढ देत असताना त्याच्या कामाचे कुठे तरी मूल्यमापनही झाले पाहिजे. अ‍ॅड. अनिल किलोर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, आम्ही नोकरदार वर्गाच्या विरोधात नाही, परंतु शेतकऱ्यांचाही विचार केला जावा. शेतकरी एकजूट नाही तो दबाव निर्माण करू शकत नाही म्हणून शासनाने त्याचा विचारच करू नये का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संचालन राजीव जगताप यांनी केले. (प्रतिनिधी)