शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वाघाच्या हल्ल्यात सात गाई ठार

By admin | Updated: February 20, 2016 03:29 IST

तीन ते पाच वाघांनी शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यात सात जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, नऊ जनावरे गंभीर जखमी झालीत.

उमरेड, नवेगाव शिवारातील घटना : ९ जनावरे गंभीर जखमी, ३१ बेपत्ताउमरेड : तीन ते पाच वाघांनी शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढविला. त्यात सात जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, नऊ जनावरे गंभीर जखमी झालीत. शिवाय, ३१ जनावरे बेपत्ता आहेत. ही घटना उमरेड येथून १० कि.मी.वरील नवेगाव (साधू) शिवारात गुरुवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दहशत निर्माण झाली आहे. श्रीराम बनकर, रा. नवेगाव (साधू), ता. उमरेड यांची गावालगत शेती आहे. या शेतात गुरांची दावण असून, त्यात १२० जनावरे नेहमीप्रमाणे बांधली होती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे पाच वाघांनी या जनावरांवर एकाचवेळी हल्ला चढविला. पहाटेपर्यंत वाघांची शिकारीसाठी ओढाताण सुरू होती. सर्वच जनावरे जीवाच्या आकांताने सुसाट सैरावैरा पळत होती, हंबरडा फोडत होती. अंगाचा थरकाप उडविणारा हा प्रसंग श्रीराम बनकर यांनी प्रत्यक्ष अनुभवला. ते शेतातील मचाणावर जागली करीत होते.माहिती मिळताच ग्रामस्थांनी सकाळी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. दुसरीकडे, सूचना देऊनही सकाळी ९.३० वाजेपर्यंत वनविभागाचा एकही बडा अधिकारी घटनास्थळी हजर झाला नाही. ‘साहेब, गेले कुठे’ अशी विचारणा वनविभागातील वाहनचालक शकील शेख यांना केली असता ‘ते’ नागपूरहून येत असल्याचे सांगितले. वनरक्षक पी. टी. कामडी, वनमजूर ए. बी. वैरागडे, वन्यजीवचे नितीन राठोड, प्रशांत हिवरकर शेतकऱ्यांची विचारपूस करून पंचनामा करीत होते. (प्रतिनिधी)‘चांदी’चे बछडे असावेतया घटनेबाबत वन्यप्रेमी सुहास बोकडे, पक्षीतज्ज्ञ नितीन राहाटे यांच्याशी चर्चा केली असता, हे चांदी नामक वाघिणीचे बछडे असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. चांदीला चार बछडे असून, ते १८ महिन्यांचे आहेत. गाय व वासरांच्या शरीरावरील जखमा फारशा खोल नाहीत. हल्ला करीत असताना सैरावैरा पळत सुटल्यानेच वाघही भीतीने जनावरांवर तुटून पडले असावेत आणि यातच जनावरांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा हल्ला नवलच वाघ कधीच समूहाने शिकार करीत नाही. तो गनिमी काव्याने शिकार करतो. परंतु, चांदीचे बछडे १८ महिन्यांचे आहेत. ते शिकार शोधण्यासाठी समूहाने पोहचले. जनावरांच्या कळपावर हल्ला करताच जनावरे सुसाट पळायला लागली. वाघही गोंधळले आणि त्यातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. असा प्रकार सहसा घडत नाही. बछड्यांच्या सोबतीला चांदी नसावी, असेही बोलले जात आहे.मोबदला ताबडतोब हवावन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे ठार झाल्यानंतर वनविभाग तातडीने मोबदला देत नाही, अशी कैफियत विठ्ठल बोढे यांनी मांडली. या हल्ल्यात ठार व जखमी झालेल्या जनावरांच्या मालकांना तातडीने बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी माजी नगरसेवक दयालचंद्र पौनीकर, गोविंदा बोढे, देवराव कोळसे यांनी केली आहे. अभयारण्याच्या सभोवताल सौरऊर्जा कुंपण लावण्याची मागणीही सचिन तळेकर यांनी केली. लोकप्रतिनिधी व वनविभाग या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.वाघांना पाहून घाबरलोमी मचाणावर झोपून होतो. त्यातच जनावरांच्या हंबरण्याचा आवाज ऐकायला आला. वरूनच वाकून बघितले तेव्हा एक वाघ काही अंतरावरच गाईवर तुटून पडत होता. दोन-तीन वाघ काही अंतरावर गाईच्या कळपाजवळ असावेत. त्या ठिकाणीही ओढाताण सुरू होती. दावे तोडून जनावरे शेतात पळत सुटली होती. मी खूप घाबरलो. कधी वाकून बघायचो तर, कधी पांघरून घ्यायचो. सकाळी ६ वाजताच्या सुमारासच मचाणावरून खाली उतरलो. त्यानंतर लोक गोळा व्हायला लागले.- श्रीराम बनकर, शेतकरी वाघांना लागली ‘चटक’गाईला जंगलात दावणीला बांधून वाघाच्या शुटींग प्रकरणाचा लोकमतने नुकताच पर्दाफाश केला. सकाळीच लोकमतची चमू घटनास्थळी दाखल झाली. अशातच ‘भाऊ, वाघाला गाईची चटक लागली’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांनी ‘गाय’ प्रकरण किती गंभीरपणे घेतले, याचा हा नमुनाच होता.