शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

जनता आणि प्रशासनात बांधला सेतू

By admin | Updated: March 2, 2016 03:23 IST

प्रशासन जर गंभीर असेल, जनता सर्तक असेल, तर समस्येचा निपटारा सहज शक्य आहे. प्रशासन गंभीर नसल्याने,

स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार : महापौरांनी घेतली दखलनागपूर : प्रशासन जर गंभीर असेल, जनता सर्तक असेल, तर समस्येचा निपटारा सहज शक्य आहे. प्रशासन गंभीर नसल्याने, जनता कितीही सतर्क झाली तरी समस्या मार्गी लागत नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पार पडलेल्या पुस्तक मेळाव्यात जनता आणि प्रशासनात एका स्वयंसेवी संस्थेने सेतूची भूमिका बजावली. महापौरांनी त्याची दखल घेऊन, जनतेच्या समस्यांचा निपटारा करून दिला. पुस्तक मेळाव्यात नागपूर महापालिकेला काही स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. महापालिकेने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने शहरातील ग्रीन व्हिजिल या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेला एक स्टॉल उपलब्ध करून दिला. संस्थेने आपले २५ व्हॉलेंटियर या कामाला लावले. यातून महापालिकेच्या पर्यावरण विषयीच्या संकल्पना जनतेला पटवून देण्यात आल्या. ऊर्जा बचतीसाठी महापालिकेने केलेला प्रयत्न, तलाव संवर्धनात आम आदमीचा सहभाग, स्वच्छता अभियान, नाग नदी, पिवळ्या नदीचे संवर्धन यासंदर्भात या संस्थेच्या व्हॉलेंटियरनी मेळाव्यात जोरदार जनजागृती केली.त्यांच्या या कार्याचे ६४४ लोकांनी कौतुक केले आणि सूचनाही केल्या. परंतु काही लोकांनी पर्यावरणविषयीच्या लेखी तक्रारी या स्टॉलवर केल्या. यात नालेसफाई, सांडपाण्याचे नियोजन, स्ट्रीट लाईट, अनाधिकृत पार्किंग, वृक्षारोपण अशा ६३ तक्रारी संस्थेकडे आल्या. संस्थेने या संपूर्ण तक्रारींचा तपशील महापौर प्रवीण दटके यांना दिला. महापौरांनी लगेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, लेखी तक्रारीची वैयक्तिक दखल घेऊन, सोडविण्याचे आदेश दिले. १० दिवसात यातील बहुतांश तक्रारी प्रशासनाने सहज सोडविल्या. लोकांचे फिडबॅकही संस्थेकडे आले. प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे झाल्याने महापौरांनी त्यांना नागपूर महोत्सवातही संधी दिली. (प्रतिनिधी)