शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जनता आणि प्रशासनात बांधला सेतू

By admin | Updated: March 2, 2016 03:23 IST

प्रशासन जर गंभीर असेल, जनता सर्तक असेल, तर समस्येचा निपटारा सहज शक्य आहे. प्रशासन गंभीर नसल्याने,

स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार : महापौरांनी घेतली दखलनागपूर : प्रशासन जर गंभीर असेल, जनता सर्तक असेल, तर समस्येचा निपटारा सहज शक्य आहे. प्रशासन गंभीर नसल्याने, जनता कितीही सतर्क झाली तरी समस्या मार्गी लागत नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पार पडलेल्या पुस्तक मेळाव्यात जनता आणि प्रशासनात एका स्वयंसेवी संस्थेने सेतूची भूमिका बजावली. महापौरांनी त्याची दखल घेऊन, जनतेच्या समस्यांचा निपटारा करून दिला. पुस्तक मेळाव्यात नागपूर महापालिकेला काही स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. महापालिकेने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने शहरातील ग्रीन व्हिजिल या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेला एक स्टॉल उपलब्ध करून दिला. संस्थेने आपले २५ व्हॉलेंटियर या कामाला लावले. यातून महापालिकेच्या पर्यावरण विषयीच्या संकल्पना जनतेला पटवून देण्यात आल्या. ऊर्जा बचतीसाठी महापालिकेने केलेला प्रयत्न, तलाव संवर्धनात आम आदमीचा सहभाग, स्वच्छता अभियान, नाग नदी, पिवळ्या नदीचे संवर्धन यासंदर्भात या संस्थेच्या व्हॉलेंटियरनी मेळाव्यात जोरदार जनजागृती केली.त्यांच्या या कार्याचे ६४४ लोकांनी कौतुक केले आणि सूचनाही केल्या. परंतु काही लोकांनी पर्यावरणविषयीच्या लेखी तक्रारी या स्टॉलवर केल्या. यात नालेसफाई, सांडपाण्याचे नियोजन, स्ट्रीट लाईट, अनाधिकृत पार्किंग, वृक्षारोपण अशा ६३ तक्रारी संस्थेकडे आल्या. संस्थेने या संपूर्ण तक्रारींचा तपशील महापौर प्रवीण दटके यांना दिला. महापौरांनी लगेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, लेखी तक्रारीची वैयक्तिक दखल घेऊन, सोडविण्याचे आदेश दिले. १० दिवसात यातील बहुतांश तक्रारी प्रशासनाने सहज सोडविल्या. लोकांचे फिडबॅकही संस्थेकडे आले. प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे झाल्याने महापौरांनी त्यांना नागपूर महोत्सवातही संधी दिली. (प्रतिनिधी)