शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जनता आणि प्रशासनात बांधला सेतू

By admin | Updated: March 2, 2016 03:23 IST

प्रशासन जर गंभीर असेल, जनता सर्तक असेल, तर समस्येचा निपटारा सहज शक्य आहे. प्रशासन गंभीर नसल्याने,

स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार : महापौरांनी घेतली दखलनागपूर : प्रशासन जर गंभीर असेल, जनता सर्तक असेल, तर समस्येचा निपटारा सहज शक्य आहे. प्रशासन गंभीर नसल्याने, जनता कितीही सतर्क झाली तरी समस्या मार्गी लागत नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पार पडलेल्या पुस्तक मेळाव्यात जनता आणि प्रशासनात एका स्वयंसेवी संस्थेने सेतूची भूमिका बजावली. महापौरांनी त्याची दखल घेऊन, जनतेच्या समस्यांचा निपटारा करून दिला. पुस्तक मेळाव्यात नागपूर महापालिकेला काही स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. महापालिकेने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने शहरातील ग्रीन व्हिजिल या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेला एक स्टॉल उपलब्ध करून दिला. संस्थेने आपले २५ व्हॉलेंटियर या कामाला लावले. यातून महापालिकेच्या पर्यावरण विषयीच्या संकल्पना जनतेला पटवून देण्यात आल्या. ऊर्जा बचतीसाठी महापालिकेने केलेला प्रयत्न, तलाव संवर्धनात आम आदमीचा सहभाग, स्वच्छता अभियान, नाग नदी, पिवळ्या नदीचे संवर्धन यासंदर्भात या संस्थेच्या व्हॉलेंटियरनी मेळाव्यात जोरदार जनजागृती केली.त्यांच्या या कार्याचे ६४४ लोकांनी कौतुक केले आणि सूचनाही केल्या. परंतु काही लोकांनी पर्यावरणविषयीच्या लेखी तक्रारी या स्टॉलवर केल्या. यात नालेसफाई, सांडपाण्याचे नियोजन, स्ट्रीट लाईट, अनाधिकृत पार्किंग, वृक्षारोपण अशा ६३ तक्रारी संस्थेकडे आल्या. संस्थेने या संपूर्ण तक्रारींचा तपशील महापौर प्रवीण दटके यांना दिला. महापौरांनी लगेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, लेखी तक्रारीची वैयक्तिक दखल घेऊन, सोडविण्याचे आदेश दिले. १० दिवसात यातील बहुतांश तक्रारी प्रशासनाने सहज सोडविल्या. लोकांचे फिडबॅकही संस्थेकडे आले. प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे झाल्याने महापौरांनी त्यांना नागपूर महोत्सवातही संधी दिली. (प्रतिनिधी)