शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

तडीपारीचा न्यायप्रविष्ट प्रकरणांशी संबंध नाही

By admin | Updated: February 28, 2017 21:46 IST

गुन्हेगाराविरुद्ध न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांचा तडीपारीशी काहीच संबंध नाही. गुन्हेगाराला तडीपार करताना तो समाजाकरिता किती घातक आहे

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - गुन्हेगाराविरुद्ध न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांचा तडीपारीशी काहीच संबंध नाही. गुन्हेगाराला तडीपार करताना तो समाजाकरिता किती घातक आहे हे पाहिले जाते. त्याच्याविरुद्ध न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विचार केला जात नाही. त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणे लक्षात न घेता व प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित राहण्याची परवानगी न देता गुन्हेगाराला संबंधित हद्दीतून तडीपार केल्यास तो आदेश चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्णपीठाने मंगळवारी दिला. पूर्णपीठामध्ये न्या. भूषण गवई, न्या. प्रसन्न वराळे व न्या. इंदिरा जैन यांचा समावेश होता.
महाराष्ट्र पोलीस कायदा-१९५१ मध्ये गुन्हेगारांना तडीपार करण्याची तरतूद आहे. तसेच, तडीपार गुन्हेगाराला विविध कारणांनी प्रतिबंधिित हद्दीत तात्पुरता प्रवेश करायचा असल्यास तो त्यासाठी कायद्यातील कलम ६३ अंतर्गत संबंधित प्राधिकाºयाकडे परवानगी मागू शकतो. त्यामुळे तडीपारीचा आदेश जारी करताना गुन्हेगाराला न्यायप्रविष्ट प्रकरणावरील सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा विचार करणे गरजेचे नाही असेही पूर्णपीठाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या द्विसदस्यीय न्यायपीठांनी ‘अक्रम अजिज शेख’ व ‘पंकज आत्राम’ या दोन प्रकरणांत भिन्न भूमिका घेतल्या होत्या. ‘अक्रम अजिज शेख’ प्रकरणामध्ये गुन्हेगाराला तडीपार करण्यापूर्वी  प्रतिबंधित हद्दीतील त्यांच्याविरुद्धची न्यायप्रविष्ट प्रकरणे लक्षात घेणे व त्याला प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित राहण्याची परवानगी देणे आवश्यक असल्याचे म्हटले गेले आहे. ‘पंकज आत्राम’ प्रकरणामध्ये ‘अक्रम अजिज शेख’ प्रकरणावरील निर्णयाचा संदर्भ देण्यात आला असता न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदुरकर यांनी यापेक्षा भिन्न भूमिका घेतली. परिणामी २६ आॅगस्ट २०१६ रोजी या न्यायपीठाने सदर मुद्यावर  पूर्णपीठाकडून योग्य निर्णय होण्यासाठी हे प्रकरण मुख्य न्यायमूर्तींकडे पाठविले होते. पूर्णपीठाने गेल्या १४ फेब्रुवारी रोजी प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय मंगळवारी घोषित करण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास, अ‍ॅड. आर. पी. जोशी, अ‍ॅड. अमित किनखेडे व अ‍ॅड. रजत माहेश्वरी तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता शिशिर उके यांनी युक्तीवाद केला.