शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी मंडळाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करा

By admin | Updated: October 19, 2016 03:13 IST

नागपूर-वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर भ्रष्टाचार, वशिलेबाजी व गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.

हायकोर्ट : भ्रष्टाचार, वशिलेबाजी व गैरव्यवहाराचा आरोपनागपूर : नागपूर-वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर भ्रष्टाचार, वशिलेबाजी व गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी याची दखल घेऊन मंडळाची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिला. समितीमध्ये अन्य सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार मुख्य सचिवांकडे सोपविण्यात आला असून या समितीला तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करून न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे.लोह उद्योगांमध्ये काम करणारे माथाडी कामगार अव्वाच्यासव्वा वेतन मिळवित आहेत असा दावा एका वृत्तपत्रातील बातमीत करण्यात आला होता. ही बाब खटकल्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याप्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करून मंडळावर भ्रष्टाचार, वशिलेबाजी व गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. मंडळाच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीमुळे सार्वजनिक निधी व लोह उद्योगांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मंडळाचे गेल्या अनेक वर्षांपासून लेखा परीक्षण करण्यात आलेले नाही. शासनास लेखा परीक्षण अहवालही सादर करण्यात आलेला नाही. न्यायालयाने याचिका दाखल केल्यानंतर मंडळाने घाईगडबडीत लेक्षापरीक्षण करून घेतले. यामुळे लेखापरीक्षणात अनेक प्रकारच्या चुका झाल्या आहेत. माथाडी मंडळ हे स्पर्धा कायदा-२००२ मधील कलम ३ व ४ मधील तरतुदींच्या विरोधात वागत आहे काय हे तपासण्यासाठी प्रकरण भारतीय स्पर्धा आयोगाचे महासंचालक (तपास) यांच्याकडे पाठविण्याची गरज आहे असे अ‍ॅड. भांडारकर यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे आदेश दिला आहे. मध्यस्थातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)उद्योजकांना फटकामाहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, एका पोलाद प्रकल्पात लोडिंग-अनलोडिंगसाठी १७८ माथाडी कामगार कार्यरत आहेत. या प्रकल्पात यंत्राच्या साहाय्याने लोडिंग-अनलोडिंग केले जाते. यंत्राने उचलावयाच्या वस्तूला केवळ हुक लटकविण्याचे काम कामगारांना करावे लागते. यासाठी माथाडी मंडळ कंपनीकडून तब्बल ११ कोटी ३० लाख रुपये वसुल करते. येथील माथाडी कामगाराचे मासिक उत्पन्न ५० हजारावर तर, वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांवर आहे. उद्योजकांना याचा फटका बसतोय याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.