शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्व्हर’चा झटका अभ्यासाला फटका

By admin | Updated: May 17, 2016 02:09 IST

अगोदरच विदर्भातील तापमान तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित

नागपूर विद्यापीठ : पेपरच्या एक दिवस अगोदर परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांची धावाधावनागपूर : अगोदरच विदर्भातील तापमान तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऐन उन्हात धावाधाव करावी लागत आहे. विद्यापीठाचे ‘सर्व्हर’ संथ झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ होण्यास वेळ झाला. त्यामुळे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत प्रवेशपत्र घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयाच्या चकरा मारताना दिसून आले. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचा पाचवा आणि महत्त्वाचा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. यात अभियांत्रिकीसह बीएसस्सी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील एमए, एमएसस्सी, बीएसस्सी द्वितीय, चतुर्थ आणि नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. या टप्प्यात सुमारे दोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठाची परीक्षा प्रणाली ‘आॅनलाईन’ असल्याने प्रवेशपत्रदेखील ‘डाऊनलोड’ करावे लागतात. महाविद्यालयांकडून ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात येतात. परंतु दोन दिवस अगोदरपर्यंत अनेक महाविद्यालयांच्या ‘लॉग इन’मध्ये प्रवेशपत्रच दिसत नव्हते. विद्यार्थी सातत्याने महाविद्यालयांमध्ये फेऱ्या मारतच होते.अखेर दोन दिवस अगोदर महाविद्यालयांकडे परीक्षा प्रवेशपत्रे पोहोचली. परंतु बहुतांश महाविद्यालयांनी लगेच प्रवेशपत्रे ‘डाऊनलोड’ करण्यास सुरुवात केल्यामुळे विद्यापीठाच्या ‘सर्व्हर’वर त्याचा परिणाम झाला व ओळखपत्रे फारच संथ गतीने ‘डाऊनलोड’ व्हायला लागली. त्यामुळे अखेरच्या दिवशीदेखील शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली.(प्रतिनिधी)‘आॅनलाईन’चा काय उपयोग?४आम्ही वेळेवर परीक्षा अर्ज भरले, शुल्कदेखील दिले. अशा स्थितीत आम्हाला वेळेअगोदर परीक्षा प्रवेशपत्रे मिळणे अपेक्षित होते. परंतु असे काहीही झाले नाही आणि उलट आम्हाला अभ्यास सोडून महाविद्यालयांत फिरावे लागत आहे. असल्या ‘आॅनलाईन’ प्रणालीचा काय उपयोग अशी संतप्त भावना काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.तांत्रिक अडचणीमुळे झाला गोंधळ४यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता तांत्रिक अडचणींमुळे हा गोंधळ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकाच वेळी सर्व महाविद्यालयांनी परीक्षा प्रवेशपत्रे ‘डाऊनलोड’ करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशपत्रे ही ‘पीडीएफ’मध्ये असतात. त्यामुळे सहाजिकच ‘सर्व्हर’वर ताण आला. परंतु अखेरच्या दिवशी सर्वांनाच प्रवेशपत्रे मिळाली आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे तांत्रिक कारणांमुळे तयार झाली नव्हती. त्यांनादेखील दिलासा देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.