शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

‘सर्व्हर’चा झटका अभ्यासाला फटका

By admin | Updated: May 17, 2016 02:09 IST

अगोदरच विदर्भातील तापमान तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित

नागपूर विद्यापीठ : पेपरच्या एक दिवस अगोदर परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांची धावाधावनागपूर : अगोदरच विदर्भातील तापमान तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऐन उन्हात धावाधाव करावी लागत आहे. विद्यापीठाचे ‘सर्व्हर’ संथ झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ होण्यास वेळ झाला. त्यामुळे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत प्रवेशपत्र घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयाच्या चकरा मारताना दिसून आले. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचा पाचवा आणि महत्त्वाचा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. यात अभियांत्रिकीसह बीएसस्सी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील एमए, एमएसस्सी, बीएसस्सी द्वितीय, चतुर्थ आणि नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. या टप्प्यात सुमारे दोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठाची परीक्षा प्रणाली ‘आॅनलाईन’ असल्याने प्रवेशपत्रदेखील ‘डाऊनलोड’ करावे लागतात. महाविद्यालयांकडून ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात येतात. परंतु दोन दिवस अगोदरपर्यंत अनेक महाविद्यालयांच्या ‘लॉग इन’मध्ये प्रवेशपत्रच दिसत नव्हते. विद्यार्थी सातत्याने महाविद्यालयांमध्ये फेऱ्या मारतच होते.अखेर दोन दिवस अगोदर महाविद्यालयांकडे परीक्षा प्रवेशपत्रे पोहोचली. परंतु बहुतांश महाविद्यालयांनी लगेच प्रवेशपत्रे ‘डाऊनलोड’ करण्यास सुरुवात केल्यामुळे विद्यापीठाच्या ‘सर्व्हर’वर त्याचा परिणाम झाला व ओळखपत्रे फारच संथ गतीने ‘डाऊनलोड’ व्हायला लागली. त्यामुळे अखेरच्या दिवशीदेखील शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली.(प्रतिनिधी)‘आॅनलाईन’चा काय उपयोग?४आम्ही वेळेवर परीक्षा अर्ज भरले, शुल्कदेखील दिले. अशा स्थितीत आम्हाला वेळेअगोदर परीक्षा प्रवेशपत्रे मिळणे अपेक्षित होते. परंतु असे काहीही झाले नाही आणि उलट आम्हाला अभ्यास सोडून महाविद्यालयांत फिरावे लागत आहे. असल्या ‘आॅनलाईन’ प्रणालीचा काय उपयोग अशी संतप्त भावना काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.तांत्रिक अडचणीमुळे झाला गोंधळ४यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता तांत्रिक अडचणींमुळे हा गोंधळ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकाच वेळी सर्व महाविद्यालयांनी परीक्षा प्रवेशपत्रे ‘डाऊनलोड’ करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशपत्रे ही ‘पीडीएफ’मध्ये असतात. त्यामुळे सहाजिकच ‘सर्व्हर’वर ताण आला. परंतु अखेरच्या दिवशी सर्वांनाच प्रवेशपत्रे मिळाली आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे तांत्रिक कारणांमुळे तयार झाली नव्हती. त्यांनादेखील दिलासा देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.