शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

संत कबीरांच्या शब्द वाणीने पावित्र्याची अनुभूती

By admin | Updated: October 17, 2015 03:25 IST

संत कबीर म्हणजे मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सोपे आणि सहजपणे सांगणारे संत. धार्मिक तेढ संपवून हिंदु-मुस्लिमांचे ऐक्य ...

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या ‘वाको नाम कबीर’ महोत्सवाला प्रारंभ : शब्द आणि सुफी गायनाची रंगतनागपूर : संत कबीर म्हणजे मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सोपे आणि सहजपणे सांगणारे संत. धार्मिक तेढ संपवून हिंदु-मुस्लिमांचे ऐक्य साधणाऱ्या संत कबीरांनी धर्माच्या अवडंबरावर आणि कर्मकांडावर त्यांच्या रचनातून प्रहार केला. निर्गुण ब्रह्माचे उपासक असलेल्या कबीरांनी भारतीय समाजाला नवी दृष्टी दिली आणि सर्व धर्मांना मानवतेच्या एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे दोहे, रचना सहजपणे कुणालाही क्लिष्ट तत्त्वज्ञान सोपे करुन सांगणाऱ्या आहेत. संत कबीरांच्या कार्याची आणि विचारांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी ‘वाको नाम कबीर’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शास्त्रीय गायन, सुफी गायनातून संत कबीरांच्या शब्दचा अर्थ उलगडण्याच्या सादरीकरणाने उपस्थितांना पावित्र्याच्या अनुभूतीचा आनंद दिला. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी संत कबीरांच्या रचनांवर आधारित सादरीकरणाने महोत्सवात अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. जगविख्यात शबद गायक उस्ताद बलजित सिंह नामधारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शब्द सादर करुन रसिकांची दाद घेतली. यानंतर राजस्थानचे सुप्रसिद्ध सुफी व कबीर गायक मुख्तीयार अली यांच्या सुफी गायनाने महोत्सवाला चार चाँद लावले. बलजित सिंह नामधारी यांनी केदार रागातील शबदने गायनाला प्रारंभ केला आणि वातावरण पावित्र्याने भारले गेले. कबीरांचे दोहे आपल्याला माहिती आहेत पण त्याचे शास्त्रीय गायन फारसे ऐकलेले नाही. शबदचे हे गायन ऐकण्याचा अनुभव नागपूरकरांसाठी वेगळा होता. त्यांना गुरुमितसिंह नामधारी यांनी रबाब या वाद्यावर साथ केली. बलजितसिंह यांनी गायनासह तार शहनाई या वाद्यावर वादन करून रसिकांना जिंकले. याप्रसंगी बलजित सिंह यांनी राग खमाज आणि मिश्र भैरवीत गायन सादर केले. त्यांना तबल्यावर इंद्रदीपसिंह तर तानपुऱ्यावर पंकज रंगारी यांनी साथसंगत केली. यानंतर मुख्तीयार अली यांनी सुफी गायनाने तान छेडली आणि कार्यक्रमाला अधिक उंचावर नेले. त्यांच्या सुफी गायनाने आणि दमदार आवाजाने महोत्सवात रंगत आली. या महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक बसंतलाल शॉ, विभागीय आयुक्त अनुपकुमार आणि शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिल्लीचे जैनेंद्रसिंग यांनी केले. (प्रतिनिधी)