शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

-तर एसएनडीएलचा करार रद्द करू !

By admin | Updated: December 12, 2015 06:00 IST

एसएनडीएल फ्रेंचायसीतील त्रुटी दूर करून सादर केलेल्या अहवालाचे आॅडिट केले जाईल. त्रुटी पूर्ण दूर करण्यासाठी

नागपूर : एसएनडीएल फ्रेंचायसीतील त्रुटी दूर करून सादर केलेल्या अहवालाचे आॅडिट केले जाईल. त्रुटी पूर्ण दूर करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ देण्यात येईल. चौकशी समितीला यानंतरही दोष आढळले तर नोटीस देण्यात येईल. सूचनांची अंमलबजावणी न केल्यास एसएनडीएलसोबतचा करार रद्द करण्यासंबंधी कारवाई करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.नागपूर शहरातील महाल, सिव्हिल लाईन्स, गांधीबाग विभागात साडेचार लाख ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्याची जबाबदारी एसएनडीएलवर सोपविण्यात आली आहे. मात्र एसएनडीएलविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी सतत वाढतच आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीतील आर. बी. गोयनका, गौरी चंद्रायण, एस. एम. मडावी या त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून त्रुटी काढल्या. त्यानंतरही एसएनडीएलला मुदत देण्यात आली. याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, पुन्हा काही त्रुटी आढळून आल्यास टर्मिनेशन नोटीस देण्यात येऊन करार रद्द करण्यात येईल, असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आता कृपा कशासाठी?४काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात भाजप नेत्यांनी तुळशीबाग येथे एसएनडीएलच्या विरोधात जोरदार आंदोलन करीत ‘एसएनडीएल को भगाओ, नागपूर बचाओ’चा नारा दिला होता. विशेष म्हणजे त्या आंदोलनात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा सहभागी झाले होते. आता भाजपची सत्ता आहे. मग आता का आंदोलन केले जात नाही, एसएनडीएलसोबतचा करार का रद्द केला जात नाही, एसएनडीएलवर कृपा कशासाठी, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. महसूलमंत्र्यांची विरोधकांवर टीका४शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस गंभीर नसून त्यांना केवळ सभागृहात गोंधळ घालायचा आहे. त्यांना या प्रश्नावर केवळ राजकारण करायचे आहे, अशी टीका महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा करावी, ही विरोधकांची मागणी राजकारणासाठी आहे. त्यांनी गेले पाच दिवस विधिमंडळाचे कामकाज होऊ दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. तेवढे पैसे वाचले असते तर शेतकऱ्यांसाठी निदान तेवढ्या रुपयांचे पॅकेज घोषित करता आले असते, असेही खडसे म्हणाले.