शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

-तर एसएनडीएलचा करार रद्द करू !

By admin | Updated: December 12, 2015 06:00 IST

एसएनडीएल फ्रेंचायसीतील त्रुटी दूर करून सादर केलेल्या अहवालाचे आॅडिट केले जाईल. त्रुटी पूर्ण दूर करण्यासाठी

नागपूर : एसएनडीएल फ्रेंचायसीतील त्रुटी दूर करून सादर केलेल्या अहवालाचे आॅडिट केले जाईल. त्रुटी पूर्ण दूर करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ देण्यात येईल. चौकशी समितीला यानंतरही दोष आढळले तर नोटीस देण्यात येईल. सूचनांची अंमलबजावणी न केल्यास एसएनडीएलसोबतचा करार रद्द करण्यासंबंधी कारवाई करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.नागपूर शहरातील महाल, सिव्हिल लाईन्स, गांधीबाग विभागात साडेचार लाख ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्याची जबाबदारी एसएनडीएलवर सोपविण्यात आली आहे. मात्र एसएनडीएलविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी सतत वाढतच आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीतील आर. बी. गोयनका, गौरी चंद्रायण, एस. एम. मडावी या त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून त्रुटी काढल्या. त्यानंतरही एसएनडीएलला मुदत देण्यात आली. याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, पुन्हा काही त्रुटी आढळून आल्यास टर्मिनेशन नोटीस देण्यात येऊन करार रद्द करण्यात येईल, असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आता कृपा कशासाठी?४काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात भाजप नेत्यांनी तुळशीबाग येथे एसएनडीएलच्या विरोधात जोरदार आंदोलन करीत ‘एसएनडीएल को भगाओ, नागपूर बचाओ’चा नारा दिला होता. विशेष म्हणजे त्या आंदोलनात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा सहभागी झाले होते. आता भाजपची सत्ता आहे. मग आता का आंदोलन केले जात नाही, एसएनडीएलसोबतचा करार का रद्द केला जात नाही, एसएनडीएलवर कृपा कशासाठी, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. महसूलमंत्र्यांची विरोधकांवर टीका४शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस गंभीर नसून त्यांना केवळ सभागृहात गोंधळ घालायचा आहे. त्यांना या प्रश्नावर केवळ राजकारण करायचे आहे, अशी टीका महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा करावी, ही विरोधकांची मागणी राजकारणासाठी आहे. त्यांनी गेले पाच दिवस विधिमंडळाचे कामकाज होऊ दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. तेवढे पैसे वाचले असते तर शेतकऱ्यांसाठी निदान तेवढ्या रुपयांचे पॅकेज घोषित करता आले असते, असेही खडसे म्हणाले.