शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

-तर एसएनडीएलचा करार रद्द करू !

By admin | Updated: December 12, 2015 06:00 IST

एसएनडीएल फ्रेंचायसीतील त्रुटी दूर करून सादर केलेल्या अहवालाचे आॅडिट केले जाईल. त्रुटी पूर्ण दूर करण्यासाठी

नागपूर : एसएनडीएल फ्रेंचायसीतील त्रुटी दूर करून सादर केलेल्या अहवालाचे आॅडिट केले जाईल. त्रुटी पूर्ण दूर करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ देण्यात येईल. चौकशी समितीला यानंतरही दोष आढळले तर नोटीस देण्यात येईल. सूचनांची अंमलबजावणी न केल्यास एसएनडीएलसोबतचा करार रद्द करण्यासंबंधी कारवाई करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.नागपूर शहरातील महाल, सिव्हिल लाईन्स, गांधीबाग विभागात साडेचार लाख ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्याची जबाबदारी एसएनडीएलवर सोपविण्यात आली आहे. मात्र एसएनडीएलविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी सतत वाढतच आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीतील आर. बी. गोयनका, गौरी चंद्रायण, एस. एम. मडावी या त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून त्रुटी काढल्या. त्यानंतरही एसएनडीएलला मुदत देण्यात आली. याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, पुन्हा काही त्रुटी आढळून आल्यास टर्मिनेशन नोटीस देण्यात येऊन करार रद्द करण्यात येईल, असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आता कृपा कशासाठी?४काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात भाजप नेत्यांनी तुळशीबाग येथे एसएनडीएलच्या विरोधात जोरदार आंदोलन करीत ‘एसएनडीएल को भगाओ, नागपूर बचाओ’चा नारा दिला होता. विशेष म्हणजे त्या आंदोलनात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा सहभागी झाले होते. आता भाजपची सत्ता आहे. मग आता का आंदोलन केले जात नाही, एसएनडीएलसोबतचा करार का रद्द केला जात नाही, एसएनडीएलवर कृपा कशासाठी, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. महसूलमंत्र्यांची विरोधकांवर टीका४शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस गंभीर नसून त्यांना केवळ सभागृहात गोंधळ घालायचा आहे. त्यांना या प्रश्नावर केवळ राजकारण करायचे आहे, अशी टीका महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा करावी, ही विरोधकांची मागणी राजकारणासाठी आहे. त्यांनी गेले पाच दिवस विधिमंडळाचे कामकाज होऊ दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. तेवढे पैसे वाचले असते तर शेतकऱ्यांसाठी निदान तेवढ्या रुपयांचे पॅकेज घोषित करता आले असते, असेही खडसे म्हणाले.