शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची ५०० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 08:00 IST

Nagpur News यंदा नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची उलाढाल ५०० कोटींची होण्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्दे ९० टक्के कापूस, सोयाबीन बियाण्यांची विक्री रशिया-युक्रेन युद्धामुळे खतांच्या किमतीत वाढ

 

नागपूर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी सुरू केली. आतापर्यंत ९० टक्के पेरणी झाली असून गेल्यावर्षी जास्त भाव मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर जास्त भर आहे. भाववाढ नंतर ही बियाण्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची उलाढाल ५०० कोटींची होण्याचा अंदाज आहे.

बियाण्यांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ

बियाण्यांमध्ये ९५ टक्के कापूस आणि ९० टक्के सोयाबीन बियाण्यांची विक्री झाली. त्याखालोखाल तूर आणि धान बियाण्यांची विक्री झाली आहे. शेतकरी बाजारात खरेदीसाठी अजूनही येत आहेतच. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन, कापसासह मिरची आणि अन्य बियाण्यांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कापसाचे ४७५ ग्रॅम पॅकेट ७६० रुपयांना होते. ते यावर्षी ६० रुपयांनी वाढून ८२० रुपये झाले आहे. याप्रमाणे सोयाबीन बियाण्यांची ३० किलोची बॅग ३२०० रुपयांवरून ४ हजार रुपयांवर गेली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

यावर्षी बियाण्यांसह खतांच्या किमतीतही वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खतांच्या दरवाढीवर झाला आहे. युद्धामुळे कच्च्या मालाचा तुटवडा झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती आकाशाला भिडल्या. त्यामुळे स्थानिक बाजारत ही खतांचा तुटवडा दिसून आला. यंदा नागपूर बाजारपेठेत कुणाकडे खत आहे, तर कुणाकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भावात खरेदी करावे लागत आहे. यंदा ५० किलोची बॅग १२५० रुपयांच्या तुलनेत यंदा १३५० रुपयांवर पोहोचली आहे. पोटॅश पासून तयार होणाऱ्या खताच्या किमतीत ५०० रुपयांची वाढ होऊन बॅगची किंमत ११०० रुपयांवरून १६०० रुपयांवर गेली. हे खत रशिया, बेलारूस आणि कॅनडातून येते. पण युद्धामुळे पुरवठा थांबला आहे.

यंदा मिरची पीक कमी होणार

गेल्यावर्षी मिरचीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ५० टक्के पीक खराब झाले होते. या पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीचा काहीही परिणाम झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी यंदा मिरची पिकाबाबत उत्साहित नाहीत. शिवाय गेल्यावर्षीच्या तुलनेत मिरचीच्या बियाण्यांची मागणी कमी आहे.

पावसामुळे बियाण्यांच्या विक्री वाढली

गेल्या दर जास्त मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात कापूस आणि सोयाबीनची पेरणी जास्त झाली आहे. मात्र, धान्याची पेरणी तेवढीच आहे. यंदा बियाण्यांच्या किमतीत वाढ झाल्यानंतरही विक्री वाढली आहे. नागपूर जिल्ह्यातील जवळपास १५०० विक्रेत्यांच्या माध्यमातून बियाणे विकली जातात. सध्या पावसाचा जोर असल्यामुळे ९० टक्के पेरणी आटोपली आहे.

- शरद चांडक, सचिव, नागपूर जिल्हा ॲग्रो डिलर्स असोसिएशन.

टॅग्स :agricultureशेती