शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची ५०० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 08:00 IST

Nagpur News यंदा नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची उलाढाल ५०० कोटींची होण्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्दे ९० टक्के कापूस, सोयाबीन बियाण्यांची विक्री रशिया-युक्रेन युद्धामुळे खतांच्या किमतीत वाढ

 

नागपूर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी सुरू केली. आतापर्यंत ९० टक्के पेरणी झाली असून गेल्यावर्षी जास्त भाव मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीनच्या लागवडीवर जास्त भर आहे. भाववाढ नंतर ही बियाण्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा नागपूर जिल्ह्यात बियाण्यांची उलाढाल ५०० कोटींची होण्याचा अंदाज आहे.

बियाण्यांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ

बियाण्यांमध्ये ९५ टक्के कापूस आणि ९० टक्के सोयाबीन बियाण्यांची विक्री झाली. त्याखालोखाल तूर आणि धान बियाण्यांची विक्री झाली आहे. शेतकरी बाजारात खरेदीसाठी अजूनही येत आहेतच. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन, कापसासह मिरची आणि अन्य बियाण्यांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कापसाचे ४७५ ग्रॅम पॅकेट ७६० रुपयांना होते. ते यावर्षी ६० रुपयांनी वाढून ८२० रुपये झाले आहे. याप्रमाणे सोयाबीन बियाण्यांची ३० किलोची बॅग ३२०० रुपयांवरून ४ हजार रुपयांवर गेली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

यावर्षी बियाण्यांसह खतांच्या किमतीतही वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खतांच्या दरवाढीवर झाला आहे. युद्धामुळे कच्च्या मालाचा तुटवडा झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती आकाशाला भिडल्या. त्यामुळे स्थानिक बाजारत ही खतांचा तुटवडा दिसून आला. यंदा नागपूर बाजारपेठेत कुणाकडे खत आहे, तर कुणाकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भावात खरेदी करावे लागत आहे. यंदा ५० किलोची बॅग १२५० रुपयांच्या तुलनेत यंदा १३५० रुपयांवर पोहोचली आहे. पोटॅश पासून तयार होणाऱ्या खताच्या किमतीत ५०० रुपयांची वाढ होऊन बॅगची किंमत ११०० रुपयांवरून १६०० रुपयांवर गेली. हे खत रशिया, बेलारूस आणि कॅनडातून येते. पण युद्धामुळे पुरवठा थांबला आहे.

यंदा मिरची पीक कमी होणार

गेल्यावर्षी मिरचीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ५० टक्के पीक खराब झाले होते. या पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीचा काहीही परिणाम झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी यंदा मिरची पिकाबाबत उत्साहित नाहीत. शिवाय गेल्यावर्षीच्या तुलनेत मिरचीच्या बियाण्यांची मागणी कमी आहे.

पावसामुळे बियाण्यांच्या विक्री वाढली

गेल्या दर जास्त मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात कापूस आणि सोयाबीनची पेरणी जास्त झाली आहे. मात्र, धान्याची पेरणी तेवढीच आहे. यंदा बियाण्यांच्या किमतीत वाढ झाल्यानंतरही विक्री वाढली आहे. नागपूर जिल्ह्यातील जवळपास १५०० विक्रेत्यांच्या माध्यमातून बियाणे विकली जातात. सध्या पावसाचा जोर असल्यामुळे ९० टक्के पेरणी आटोपली आहे.

- शरद चांडक, सचिव, नागपूर जिल्हा ॲग्रो डिलर्स असोसिएशन.

टॅग्स :agricultureशेती