शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

सुरक्षा मापदंडांना तिलांजली - थाटली फटाक्यांची दुकाने

By admin | Updated: October 22, 2014 00:59 IST

सुरक्षेच्या मापदंडांना तिलांजली देत शहरात फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे आगीसारखी घटना घडण्याची शक्यता बळावली आहे.

नागपूर : सुरक्षेच्या मापदंडांना तिलांजली देत शहरात फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे आगीसारखी घटना घडण्याची शक्यता बळावली आहे. बहुतांश दुकानांमध्ये आगीच्या घटनेला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काहीच दुकानदारांनी केवळ औपचारिकता म्हणून पाण्याने भरलेला ड्रम आणि वाळूची बादली ठेवलेली आहे. यंदा ९०० वर दुकानदारांनी फटकाविक्रीच्या परवान्यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे अर्ज केले होते. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना सूचविण्यासाठी वेगळा अर्ज भरून दिला होता. प्रत्येक दुकानदारांना परवान्यासाठी एक हजार रुपयांचा भरणा करावा लागला. त्यावर पोलीस ठाण्यातून संबंधित विक्रेत्याला नाहरकत प्रमाणपत्र मिळाले. मात्र दुकानदारांनी दुकाने थाटताना सुरक्षा मापदंडांना पायदळी तुडवले. दुकानदारांनी सुरक्षेची उपाययोजना केली आहे काय, याबाबतची पाहणी पोलीस आणि अग्निशमन विभागाने करणे आवश्यक आहे. परंतु या दोन्ही विभागांची या दिशेने दिसत नाही. अग्निशमन विभागाचे असे म्हणणे आहे की, दुकानदारांनी सूचनापत्रात नमूद सुरक्षा मापदंडांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. मापदंडांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांनी कारवाई केली पाहिजे.कस्तुरचंद पार्क मैदान, जुने पटवर्धन मैदान, छावणी चौक, गांधीबाग परिसर, गांजाखेत चौक, गड्डीगोदाम चौक, जरीपटका, सदर गांधी चौक आदी भागात एका रांगेत फटाक्यांची दुकाने आढळून येतात. याशिवाय गल्लीबोळात, वसाहतींमधील रस्त्यांच्या कडेलाही दुकाने थाटल्या गेली आहेत. त्यापैकी ९० टक्के दुकानांनी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले आहे. कस्तुरचंद पार्क मैदानात एका रांगेत दुकाने आहेत; परंतु कोणीही अग्निशमन उपाययोजना तयार केलेली नाही. औपचारिकता म्हणून २०० लिटर पाण्याचा ड्रम आणि वाळूची बादली दुकानांसमोर ठेवण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)