शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सुरक्षा मापदंडांना तिलांजली - थाटली फटाक्यांची दुकाने

By admin | Updated: October 22, 2014 00:59 IST

सुरक्षेच्या मापदंडांना तिलांजली देत शहरात फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे आगीसारखी घटना घडण्याची शक्यता बळावली आहे.

नागपूर : सुरक्षेच्या मापदंडांना तिलांजली देत शहरात फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे आगीसारखी घटना घडण्याची शक्यता बळावली आहे. बहुतांश दुकानांमध्ये आगीच्या घटनेला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काहीच दुकानदारांनी केवळ औपचारिकता म्हणून पाण्याने भरलेला ड्रम आणि वाळूची बादली ठेवलेली आहे. यंदा ९०० वर दुकानदारांनी फटकाविक्रीच्या परवान्यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे अर्ज केले होते. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना सूचविण्यासाठी वेगळा अर्ज भरून दिला होता. प्रत्येक दुकानदारांना परवान्यासाठी एक हजार रुपयांचा भरणा करावा लागला. त्यावर पोलीस ठाण्यातून संबंधित विक्रेत्याला नाहरकत प्रमाणपत्र मिळाले. मात्र दुकानदारांनी दुकाने थाटताना सुरक्षा मापदंडांना पायदळी तुडवले. दुकानदारांनी सुरक्षेची उपाययोजना केली आहे काय, याबाबतची पाहणी पोलीस आणि अग्निशमन विभागाने करणे आवश्यक आहे. परंतु या दोन्ही विभागांची या दिशेने दिसत नाही. अग्निशमन विभागाचे असे म्हणणे आहे की, दुकानदारांनी सूचनापत्रात नमूद सुरक्षा मापदंडांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. मापदंडांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांनी कारवाई केली पाहिजे.कस्तुरचंद पार्क मैदान, जुने पटवर्धन मैदान, छावणी चौक, गांधीबाग परिसर, गांजाखेत चौक, गड्डीगोदाम चौक, जरीपटका, सदर गांधी चौक आदी भागात एका रांगेत फटाक्यांची दुकाने आढळून येतात. याशिवाय गल्लीबोळात, वसाहतींमधील रस्त्यांच्या कडेलाही दुकाने थाटल्या गेली आहेत. त्यापैकी ९० टक्के दुकानांनी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले आहे. कस्तुरचंद पार्क मैदानात एका रांगेत दुकाने आहेत; परंतु कोणीही अग्निशमन उपाययोजना तयार केलेली नाही. औपचारिकता म्हणून २०० लिटर पाण्याचा ड्रम आणि वाळूची बादली दुकानांसमोर ठेवण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)