शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा मापदंडांना तिलांजली - थाटली फटाक्यांची दुकाने

By admin | Updated: October 22, 2014 00:59 IST

सुरक्षेच्या मापदंडांना तिलांजली देत शहरात फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे आगीसारखी घटना घडण्याची शक्यता बळावली आहे.

नागपूर : सुरक्षेच्या मापदंडांना तिलांजली देत शहरात फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे आगीसारखी घटना घडण्याची शक्यता बळावली आहे. बहुतांश दुकानांमध्ये आगीच्या घटनेला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काहीच दुकानदारांनी केवळ औपचारिकता म्हणून पाण्याने भरलेला ड्रम आणि वाळूची बादली ठेवलेली आहे. यंदा ९०० वर दुकानदारांनी फटकाविक्रीच्या परवान्यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे अर्ज केले होते. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना सूचविण्यासाठी वेगळा अर्ज भरून दिला होता. प्रत्येक दुकानदारांना परवान्यासाठी एक हजार रुपयांचा भरणा करावा लागला. त्यावर पोलीस ठाण्यातून संबंधित विक्रेत्याला नाहरकत प्रमाणपत्र मिळाले. मात्र दुकानदारांनी दुकाने थाटताना सुरक्षा मापदंडांना पायदळी तुडवले. दुकानदारांनी सुरक्षेची उपाययोजना केली आहे काय, याबाबतची पाहणी पोलीस आणि अग्निशमन विभागाने करणे आवश्यक आहे. परंतु या दोन्ही विभागांची या दिशेने दिसत नाही. अग्निशमन विभागाचे असे म्हणणे आहे की, दुकानदारांनी सूचनापत्रात नमूद सुरक्षा मापदंडांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. मापदंडांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांनी कारवाई केली पाहिजे.कस्तुरचंद पार्क मैदान, जुने पटवर्धन मैदान, छावणी चौक, गांधीबाग परिसर, गांजाखेत चौक, गड्डीगोदाम चौक, जरीपटका, सदर गांधी चौक आदी भागात एका रांगेत फटाक्यांची दुकाने आढळून येतात. याशिवाय गल्लीबोळात, वसाहतींमधील रस्त्यांच्या कडेलाही दुकाने थाटल्या गेली आहेत. त्यापैकी ९० टक्के दुकानांनी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले आहे. कस्तुरचंद पार्क मैदानात एका रांगेत दुकाने आहेत; परंतु कोणीही अग्निशमन उपाययोजना तयार केलेली नाही. औपचारिकता म्हणून २०० लिटर पाण्याचा ड्रम आणि वाळूची बादली दुकानांसमोर ठेवण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)