शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

नागपूर रेल्वे स्थानकावर भरकटलेल्या ४१४ बालकांना सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:00 IST

जानेवारी ते सप्टेबर दरम्यान तब्बल ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची धक्कादायक माहिती आहे. हे बालक असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना आरपीएफने सुरक्षा कवच पुरवून सुखरुप कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे.

ठळक मुद्देआरपीएफचे योगदानहरवलेली मुले केली कुटुंबीयांना सुपूर्द

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईने रागावले, वडील दारू पितात, शाळेत शिक्षकांनी मारले अशा एक ना अनेक कारणावरून अनेक मुलेमुली घर सोडण्याचा विचार करतात. मिळेल त्या रेल्वेगाडीने प्रवास करतात. जानेवारी ते सप्टेबर दरम्यान तब्बल ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची धक्कादायक माहिती आहे. हे बालक असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना आरपीएफने सुरक्षा कवच पुरवून सुखरुप कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे.लहान मुलांच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होतो. क्षुल्लक कारणावरून ते घर सोडण्याचा निर्णय घेतात. कोणताच विचार न करता ते रेल्वेत बसून निघून जातात. कुठे जायचे, काय करायचे हे कोणतेच विचार त्यांच्या मनात नसतात. अशा वेळी असामाजिक तत्त्वांची नजर त्यांच्यावर गेल्यास त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती राहते.अशा साध्या कारणातून जानेवारी ते सप्टेबर या नऊ महिन्याच्या कार्यकाळात ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची नोंद रेल्वे सुरक्षा दलाने केली आहे. यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने नऊ महिन्यात ३१४ मुलामुलींना तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने १०० मुलामुलींना सुरक्षा कवच पुरविले. अशी बालके आढळल्याबरोबर त्यांची आरपीएफतर्फे आस्थेने विचारपूस करण्यात येते. विश्वासात घेऊन त्यांना घरून निघून येण्याचे कारण विचारतात. आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा अशा मुलामुलींचे समुपदेशन करतात. घरून निघून आलेली मुले आढळल्यानंतर त्याची सूचना रेल्वे चाईल्ड लाईनला देण्यात येते. कुटुंबीय येईपर्यंत या मुलामुलींना रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविण्यात येते. रेल्वेत प्रवाशांना लहान मुले एकटी दिसल्यास १८२ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे तसेच कुली, आॅटोचालक, व्हेंडर आदींना अशी मुले आढळल्यास आरपीएफला कळविण्याच्या सूचना देण्यात येतात. लहान मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरुप पोहोचवून आरपीएफने आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देऊन या बालकांचे आयुष्यही सावरण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

बालकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध‘बालकांच्या सुरक्षेसाठी आरपीएफतर्फे अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात. १८२ हेल्पलाईनवर प्रवाशांनी अशा मुलांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात येते. व्हेंडर, आॅटोचालकही अशी मुले दिसताच त्याबाबत माहिती देतात.’- ज्योती कुमार सतीजा,वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर