शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

Coronavirus in Nagpur; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढला ३० टक्क्याने मानसिक आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 07:10 IST

Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३ लाख ४५ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर, ४,७८८ रुग्णांचे बळी गेले आहेत. याचा मोठा प्रभाव मानसिक आरोग्यावरही पडला आहे. आजाराची भीती आणि चिंतेमुळे मानसिक आजाराच्या रुग्णात साधारण ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देमेयोत महिन्याकाठी ७०० रुग्ण लहान मूल, तरुण व्यक्ती गमावलेल्या नातेवाईकांमध्ये गंभीर लक्षणे

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३ लाख ४५ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर, ४,७८८ रुग्णांचे बळी गेले आहेत. याचा मोठा प्रभाव मानसिक आरोग्यावरही पडला आहे. आजाराची भीती आणि चिंतेमुळे मानसिक आजाराच्या रुग्णात साधारण ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: या आजारात ज्यांनी लहान मूल, तरुण व कर्ता व्यक्ती गमावला आहे, त्या कुटुंबातील नातेवाईकांमध्ये मानसिक आजाराची गंभीर लक्षणे दिसून येत असल्याचे पुढे आले आहे.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आजाराचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर मनावरही झाला आहे. काही रुग्णांमध्ये व सामान्यांमध्ये इतकी जबरदस्त भीती व चिंता वाढली आहे की, त्यांच्यावरील मानसिक परिणाम दुरोगामी होण्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मानसिक रोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी यांच्यानुसार, कोरोनाचा शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामापेक्षा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम दीर्घकाळ टिकतो. यामुळे मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत जवळपास तिपटीने वाढ झाल्याने मेयोच्या मानसिक रोग विभागात महिन्याला जवळपास ७०० ते ८०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. ही संख्या मोठी आहे.

- आजार होऊ नये याची अतिकाळजी तर, काहींना पुन्हा आजार होण्याची भीती

डॉ. सोमानी म्हणाले, मानसिक रोगाच्या रुग्णांमध्ये तीन प्रकारचे रुग्ण दिसून येत आहेत. पहिल्या प्रकारात कोरोना होऊ नये याची खूप जास्त काळजी घेणारे रुग्ण आहेत. यातील काही रुग्ण पुन्हा पुन्हा हात धुतात. काही रुग्ण कोरोना होईल या भीतीने घराबाहेर जाण्यास टाळतात, घरातही कुणाला येऊ देत नाही. दुसऱ्या प्रकारात कोरोनातून बरे झालेले परंतु पुन्हा आजार होण्याची भीती बाळगून असलेले रुग्ण आहेत. अशा रुग्णांमध्ये थोडे जरी डोके दुखले किंवा शिंक आली तर कोरोना तर नाही ना अशी हुरहुर लागते. सध्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची मोठी धास्ती पाहायला मिळत आहे. असे रुग्ण समुपदेशाने बरे होतात.

- तिसऱ्या प्रकारातील रुग्णांना औषधोपचाराची गरज

ज्या कुटुंबात कोरोनामुळे लहान मूल, तरुण किंवा कर्ता व्यक्ती मृत पावला आहे, त्यांच्या नातेवाईकांच्या मनावर मोठा आघात झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रभावित मानसिक आजाराच्या या तिसऱ्या प्रकारातील रुग्णाची संख्या अलीकडे वाढली आहे. यांच्यात नैराश्याचे प्रमाण मोठे असल्याने त्यांना औषधोपचाराखाली आणणे गरजेचे आहे. आयसीयूमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या वयोवृद्धांमध्ये भ्रमित होण्याचे प्रमाण वाढल्याचेही डॉ. सोमानी म्हणाले.

- अनिश्चिततेचा विचार आला की सजग व्हा

कोरोनाचा हा प्रादुर्भाव पुढचे काही दिवस वा महिने टिकू शकतो, म्हणूनच मनाला बदल मिळू देणे महत्त्वाचे आहे. जमेल तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जा, सूर्यप्रकाशात जाणे अधिक चांगले. व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. मनामध्ये अनिश्चिततेचा विचार आला की त्याबद्दल सजग व्हा. विचार करून काहीही फायदा होणार नाही, असे स्वत:ला समजवा.

-डॉ. अभिषेक सोमानी, मानसिक रोग विभाग, मेयो

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस