शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्याकांडात दुसरा आरोपी ताब्यात

By admin | Updated: November 20, 2015 03:22 IST

इंद्रप्रस्थनगर जयताळा येथील दुहेरी हत्याकांडात सोनेगाव पोलिसांनी ओमप्रकाश शहारे (वय २९, रा. पाटील लेआऊट) याला संशयावरून ताब्यात घेतले तर,

नागपूर : इंद्रप्रस्थनगर जयताळा येथील दुहेरी हत्याकांडात सोनेगाव पोलिसांनी ओमप्रकाश शहारे (वय २९, रा. पाटील लेआऊट) याला संशयावरून ताब्यात घेतले तर, यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी मनोज सुरेश भारद्वाज (वय २९, रा. अनंतनगर जयताळा) याला कोर्टात हजर करून त्याचा २५ तारखेपर्यंत पीसीआर मिळवला. मंगळवारी रात्री इंद्रप्रस्थनगरातील रेल्वेच्या डम्पिंग यार्डजवळ बंटी ऊर्फ संदीप शरद आटे (वय २५, रा. तुकडोजीनगर) आणि रवी प्रकाश टुले (वय २६, रा. गोपालनगर) या दोघांची निर्घृण हत्या झाली होती. बुधवारी सकाळी हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले. त्यानंतर ठाणेदार अरुण जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धावपळ करीत आरोपी मनोजला अटक केली. त्याने या दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली. हत्येचे कारण सांगताना त्याने रवीच्या प्रेयसीच्या दुचाकीचे कारण पुढे केले. त्यानुसार, रवीचे एका विधवा महिलेशी वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. तिने रवीला काही दिवसांपूर्वी प्लेझर दिली. रवीने ही दुचाकी मनोजला वापरायला दिली. मनोजकडून दुचाकी परत घेतल्यानंतर ती गहाण ठेवली. हा प्रकार मनोजने रवीच्या प्रेयसीला सांगितला. (प्रतिनिधी)बनवाबनवीमुळे संशय विशेष म्हणजे, बंटी आणि रवीला आपण एकट्यानेच मारल्याचे आरोपी मनोज पोलिसांना सांगत आहे. मात्र, एकूणच घटनाक्रम बघता पोलिसांना तो खोटे बोलत असावा, असा संशय आहे. त्याचमुळे पोलिसांनी आलटून पालटून त्याची चौकशी केली असता त्याने रात्री उशिरा या घटनेच्या वेळी शहारे तेथेच उभा होता, असे सांगितले. प्रारंभी शहारेने ते नाकारले होते. आपण या दोघांचे भांडण सुरू होताच तेथून निघून गेल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही गुरुवारी ताब्यात घेतले. प्रेयसीचा दोन तासांपूर्वीच फोनया दुहेरी हत्याकांडात पुन्हा एक धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, घटनेच्या दोन तासांपूर्वी रवीच्या प्रेयसीचा मनोजला फोन आला होता. या दोघांची त्यावेळी बातचित झाली. त्यामुळे रवीच्या प्रेयसीचीही भूमिका संशयास्पद ठरली आहे. मनोज नेमका रवीच्या प्रेयसीशी कधी जुळला आणि तिची या हत्याकांडात काय भूमिका आहे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्याचमुळे पोलिसांनी तिचीही चौकशी केली. तिने फोन केल्याचे मान्य केले. ती तीन मुलींची आई आहे. १० वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. ती एका कंपनीत काम करते. रवी तिला सीताबर्डीत आणायचा आणि कार्यालयातून परत घरी न्यायचा. तिने मनोजला हत्याकांडाच्या दोन तासांपूर्वी कशासाठी फोन केला होता, या प्रश्नाचे पोलीस उत्तर शोधत आहेत.