शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

जागा वाटपावरून विरोधकांचा पोळा फुटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 20:22 IST

भाजपा मजबूत झाल्यामुळे कमजोर असलेले सर्व विरोधक एकत्र येत आहेत. एकमेकांकडे न पाहणारे आता हातात हात उंचावत आहे. भाजपाने त्यांच्यात प्रेम निर्माण केले आहे. हे पोटनिवडणुकीत एकत्र आले असले तरी मुख्य निवडणुकीत तिकीट वाटपावरून यांचा पोळा फुटेल, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर साधला. राजकारणात काहीही घडू शकते. आजचे मित्र उद्या एकमेकांचे शत्रूही होऊ शकतात. मात्र, आम्हाला कुणाची पर्वा नाही. विकासाच्या मुद्यावर आम्ही सर्वांशी ताकदीने लढू, असे आव्हानही त्यांनी दिले.

ठळक मुद्दे नितीन गडकरी : काँग्रेस प्रादेशिक पक्ष झाल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपा मजबूत झाल्यामुळे कमजोर असलेले सर्व विरोधक एकत्र येत आहेत. एकमेकांकडे न पाहणारे आता हातात हात उंचावत आहे. भाजपाने त्यांच्यात प्रेम निर्माण केले आहे. हे पोटनिवडणुकीत एकत्र आले असले तरी मुख्य निवडणुकीत तिकीट वाटपावरून यांचा पोळा फुटेल, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर साधला. राजकारणात काहीही घडू शकते. आजचे मित्र उद्या एकमेकांचे शत्रूही होऊ शकतात. मात्र, आम्हाला कुणाची पर्वा नाही. विकासाच्या मुद्यावर आम्ही सर्वांशी ताकदीने लढू, असे आव्हानही त्यांनी दिलेगेल्या चार वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा गडकरी यांनी शनिवारी प्रसार माध्यमांसमोर सादर केला. या वेळी गडकरी म्हणाले, देशाने नेहरू-गांधी कुटुंबाला ४८ वर्षे राज्य करू दिले. भाजपाला आता ४८ महिने मिळाले आहेत. देशात जातीयवाद व सांप्रदायिकता पसरविण्याचे राजकारण सुरू आहे. आम्ही संविधान बदलत आहोत, अशी भीती दाखवून दलितांना दुरावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुस्लिमांच्या मनात असुरक्षितता पसरविण्याचे काम सुरू आहे. काही घटक जातीत संघर्ष लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, २०१४ पासूनचा क्रम पाहता आता पंजाब वगळता काँग्रेस कुठे आहे. काँग्रेस एक प्रादेशिक पक्ष झाला असल्याची टीका करीत भाजपा देशाच्या उत्तर-पूर्व भागापर्यंत पोहचल्याचे त्यांनी सांगितले. एकट्या आपल्या विभागाने देशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन कोटी रोजगार देण्याचे काम केले आहे. पण विरोधकांचा अपप्रचारावरच भर आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत राहुल गांधी हे जेडीएसही भाजपाची बी टीम असल्याचे सांगत होते. आता त्या बी टीमशी कसे काय सरकार स्थापन करीत आहेत, असा सवाल त्यांनी केला. या वेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करावे देशातील अतिरिक्त उत्पादन व जागतिक अर्थव्यवस्था यामुळे दुधासह कृषी उत्पादनांचे भाव कमी झाले आहेत. साखर, दाळीने गोदामे भरलेली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने खत, बियाण्याच्या किमती कमी केल्या. कमी दराने कर्ज उपलब्ध करून दिले. सोयाबीनला भाव मिळावा म्हणून आयात शुल्क वाढवून ४५ टक्के केले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार समर्पित आहे. सरकारने अनेक योजना राबविल्या, पण काही समस्या कायम आहेत. शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन गडकरी यांनी संपकरी शेतकऱ्यांना केले.मोदीच पंतप्रधान भाजपाला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या तर अशा परिस्थितीत सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून आपले नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येऊ शकते का, या प्रश्नावर गडकरी म्हणाले, भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल व नरेंद्र मोदी हेच आमचे पंतप्रधान बनतील. साखरेच्या किमतीबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी आपली भेट घेतली. यावेळी पालखी मार्गावरही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पेट्रोल-डिझेलला इथेनॉल व इलेक्ट्रिकचा पर्याय पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर दिसतात. पण साखर, तेल, कांदे यासारख्या अनेक जीवनावश्यक गोष्टी स्वस्त झाल्या हे दिसत नाही. नुसते राजकारण सुरू आहे. भारतात फक्त ३० टक्के क्रूड आॅईल तयार होते. आठ लाख कोटींची आयात करावी लागते. त्यासाठी भारताने या क्षेत्रात स्वावलंबी होणे आवश्यक आहे. यावर पर्याय म्हणून पुढील काळात इलेक्ट्रिक, इथेनॉल व बायो सीएनजीवरील वाहनांची निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी डिझेल दोन रुपयांनी स्वस्त वर्धा, भंडारा व नागपूर येथे शेतकत्यां ना ट्रॅक्टरसाठी डिझेल दोन रुपयांनी स्वस्तात उपलब्ध करून दिले जाईल. आपल्या साखर कंपन्यांमार्फत ही सोय केली जाईल, अशी घोषणा गडकरी यांनी या वेळी केली.मार्च २०१९ पर्यंत ८० टक्के गंगा निर्मल- गंगा शुद्धीकरणासाठी २१० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. ७० टक्के गंगा ही १० मोठ्या शहरांमुळे प्रदूषित झाली आहे. या शहरात प्राधान्याने ४७ प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. १०५ चे काम सुरू आहे. मार्च २०१९ पर्यंत ८० टक्के गंगा निर्मल होईल, असा दावा गडकरी यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMediaमाध्यमे