शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

सीट बेल्ट लावाच!

By admin | Updated: June 6, 2014 01:15 IST

वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे.

सीट बेल्टची उपयुक्तता समजूनही दुर्लक्षच : पाच महिन्यात ३४९५ प्रकरणेनागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व  शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच सीट बेल्टची उपयुक्तता समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले  जात आहे. मागील पाच महिन्यात सीट बेल्ट न वापरणार्‍या ३४९५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. २0१३ मध्ये अशी १४ हजार ४५२  प्रकरणे समोर आल्याची धक्कादायक माहिती आहे.   केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित ते आज आपल्यात असते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.  या धर्तीवर पुन्हा एकदा ‘सीटबेल्ट’ चर्चेत आले आहे. सीट बेल्ट (सेफ्टी बेल्ट) १२५ केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९३ ए १ नुसार पुढील आसनाला  सीट बेल्ट बसवणे वाहन (छोट्या कार) उत्पादकाला कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वाहनात समोर बसलेल्या व्यक्तींसाठीच सीट  बेल्ट असल्याचे मानले जाते. परंतु समोर बसलेल्या व्यक्तीप्रमाणोच गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनीही सीट बेल्ट बांधणो गरजेचे आहे. तज्ज्ञाच्या मते,  अपघात झालाच तर सीट बेल्ट वापरणारी व्यक्ती तो न वापरणार्‍या व्यक्तीच्या तुलनेत वाचण्याची शक्यता ७0 टक्के जास्त असते. दुर्दैवाने या सीट  बेल्टचा वापर अनेक जण पोलिसांच्या धास्तीनेच करताना दिसून येतात. विशेषत: ही कारवाई करणारे बहुतांश पोलीसच सीट बेल्ट लावत नसल्याचे  चित्र आहे.  वाहतूक पोलीस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार २0१३ मध्ये १२६५ अपघात झाले आहेत. यात ३१0 जणांचा मृत्यू तर  १२६७ जण जखमी झाले आहेत. जानेवारी ते मे २0१४ या पाच महिन्यात ५0३ अपघात झाले असून १११ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४९८ जण  जखमी झाले आहेत. अपघाताचा हा आकडा भयावह असला तरी सीट बेल्टचा वापर केल्यास मृत्यूचा आकडा कमी होऊ शकतो असे तज्ज्ञाचे मत  आहे. शरीरावर रक्ताचा थेंबही नसला तरी मृत्यूवाहनाला धडक बसल्यानंतर शरीराची गती थांबली तरी शरीरांतर्गत मेंदूत असणार्‍या मांसपेशी त्याच वेगाने पुढे जात असतात. शरीराची गती अचानक  थांबल्याने त्यांची आपापसात जोरात धडक होते. कित्येकदा रक्तवाहिन्या फुटतात व अंतर्गत रक्तस्राव होतो. बाहेर शरीरावर रक्ताचा थेंबही नसतो तरी  माणसे मरतात. सीटबेल्ट व्यवस्थित बांधला असेल तर धडक झाल्यानंतर मानवी शरीराला जागेवरच जखडून ठेवलं जातं. त्यामुळे ज्या वेगाने शरीर  पुढे   जाणार असते त्या वेगाने तीव्रता कमी होते व त्यामुळे डोके किंवा छाती कठीण वस्तूंना धडकत नाहीे.