शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंचा शोध.. ताज ते मगनवाडी!

By admin | Updated: March 31, 2015 02:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नवनियुक्त कुलगुरू कोण असणार याबाबत उत्सुकता ताणल्या गेली आहे.

नागपूर विद्यापीठ : ४ एप्रिलला मुलाखतीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नवनियुक्त कुलगुरू कोण असणार याबाबत उत्सुकता ताणल्या गेली आहे. पूर्णवेळ कुलगुरूंचा शोध लवकरच संपणार आहे. शोध समितीने १८ उमेदवारांना सादरीकरणासाठी ४ एप्रिल रोजी वर्धा येथील मगनवाडी येथील ‘एमगिरी’ (महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रुरल इन्डस्ट्रीअलाझेशन) येथे बोलविले आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ताजपासून सुरू झालेला कुलगुरूंचा शोध मगनवाडीमार्गे राजभवन असा होणार आहे. दरम्यान, कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी कुठल्याही राजकीय प्रभावाशिवाय निष्पक्षपणे पाच उमेदवार निवडण्यात यावे अशी अपेक्षा विद्यापीठ वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.डॉ. विलास सपकाळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले कुलगुरुपद भरण्यासाठी शोध समितीने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. सुमारे १३७ जणांचे अर्ज आले. शोध समितीने मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेऊन पात्र उमेदवारांची छाननी केली. दरम्यान, समितीच्या पंचतारांकित बैठकांची बाब समोर आल्याने इतकी उधळपट्टी का असा प्रश्न समोर आला. त्यामुळे उगाच वाद नको म्हणून शोध समितीने पुढील मुलाखतींसाठी थेट गांधीभूमी गाठण्याचा निर्णय घेतला.४ एप्रिल रोजी १८ उमेदवारांच्या मुलाखती ‘एमगिरी’ येथे घेण्यात येणार आहेत. संबंधित उमेदवार आता निवड समितीसमोर ‘पॉवर पॉर्इंट’ सादरीकरण करणार आहेत. यातून शोध समितीतर्फे पाच उमेदवारांची नावे राज्यपाल कार्यालयाला सुचविण्यात येतील. राज्यपाल या पाच उमेदवारांच्या मुंबईतील राजभवन येथे मुलाखती घेतील व कुलगुरूंच्या नावाची घोषणा करतील.(प्रतिनिधी)शर्यतीतील नावांबाबत उत्सुकतानागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होण्यास अनेक जण इच्छुक होते. शिवाय, आपणच या पदासाठी अर्हताप्राप्त आहोत, असे पुन:पुन्हा सांगत होते. शोध समितीकडून पात्र उमेदवारांना ई-मेल आणि दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले. नागपूर विद्यापीठातील सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ काणे यांचा नागपुरातून समावेश आहे. दरम्यान इतर उमेदवार कोण आहेत याबाबत शोध समितीकडून मौन बाळगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील प्रत्येकी दोन तसेच विदेशातील दोन उमेदवारांचादेखील समावेश आहे. उत्तर भारतातूनदेखील उमेदवार असल्याची माहिती आहे.वशिलेबाजीला थारा नकोकुलगुरूपदासारख्या महत्त्वाच्या पदाची निवड करत असताना शोध समितीने केवळ ‘मेरिट’च लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना विद्यापीठाचा विकास अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठाचे नेतृत्व निवडताना शोध समितीकडून वशीलेबाजी अन् पक्ष राजकारणाला अजिबात विचारात घेतले जाणार नाही व दोन्ही नेत्यांप्रमाणेच पारदर्शक कारभार राहील अशी अपेक्षा विद्यापीठ वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.