शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंचा शोध.. ताज ते मगनवाडी!

By admin | Updated: March 31, 2015 02:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नवनियुक्त कुलगुरू कोण असणार याबाबत उत्सुकता ताणल्या गेली आहे.

नागपूर विद्यापीठ : ४ एप्रिलला मुलाखतीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नवनियुक्त कुलगुरू कोण असणार याबाबत उत्सुकता ताणल्या गेली आहे. पूर्णवेळ कुलगुरूंचा शोध लवकरच संपणार आहे. शोध समितीने १८ उमेदवारांना सादरीकरणासाठी ४ एप्रिल रोजी वर्धा येथील मगनवाडी येथील ‘एमगिरी’ (महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रुरल इन्डस्ट्रीअलाझेशन) येथे बोलविले आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ताजपासून सुरू झालेला कुलगुरूंचा शोध मगनवाडीमार्गे राजभवन असा होणार आहे. दरम्यान, कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी कुठल्याही राजकीय प्रभावाशिवाय निष्पक्षपणे पाच उमेदवार निवडण्यात यावे अशी अपेक्षा विद्यापीठ वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.डॉ. विलास सपकाळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले कुलगुरुपद भरण्यासाठी शोध समितीने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. सुमारे १३७ जणांचे अर्ज आले. शोध समितीने मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेऊन पात्र उमेदवारांची छाननी केली. दरम्यान, समितीच्या पंचतारांकित बैठकांची बाब समोर आल्याने इतकी उधळपट्टी का असा प्रश्न समोर आला. त्यामुळे उगाच वाद नको म्हणून शोध समितीने पुढील मुलाखतींसाठी थेट गांधीभूमी गाठण्याचा निर्णय घेतला.४ एप्रिल रोजी १८ उमेदवारांच्या मुलाखती ‘एमगिरी’ येथे घेण्यात येणार आहेत. संबंधित उमेदवार आता निवड समितीसमोर ‘पॉवर पॉर्इंट’ सादरीकरण करणार आहेत. यातून शोध समितीतर्फे पाच उमेदवारांची नावे राज्यपाल कार्यालयाला सुचविण्यात येतील. राज्यपाल या पाच उमेदवारांच्या मुंबईतील राजभवन येथे मुलाखती घेतील व कुलगुरूंच्या नावाची घोषणा करतील.(प्रतिनिधी)शर्यतीतील नावांबाबत उत्सुकतानागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होण्यास अनेक जण इच्छुक होते. शिवाय, आपणच या पदासाठी अर्हताप्राप्त आहोत, असे पुन:पुन्हा सांगत होते. शोध समितीकडून पात्र उमेदवारांना ई-मेल आणि दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले. नागपूर विद्यापीठातील सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ काणे यांचा नागपुरातून समावेश आहे. दरम्यान इतर उमेदवार कोण आहेत याबाबत शोध समितीकडून मौन बाळगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील प्रत्येकी दोन तसेच विदेशातील दोन उमेदवारांचादेखील समावेश आहे. उत्तर भारतातूनदेखील उमेदवार असल्याची माहिती आहे.वशिलेबाजीला थारा नकोकुलगुरूपदासारख्या महत्त्वाच्या पदाची निवड करत असताना शोध समितीने केवळ ‘मेरिट’च लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना विद्यापीठाचा विकास अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठाचे नेतृत्व निवडताना शोध समितीकडून वशीलेबाजी अन् पक्ष राजकारणाला अजिबात विचारात घेतले जाणार नाही व दोन्ही नेत्यांप्रमाणेच पारदर्शक कारभार राहील अशी अपेक्षा विद्यापीठ वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.