शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

गंगेच्या पाण्यात ब्रह्मतत्त्वांचा शोध

By admin | Updated: August 27, 2015 02:46 IST

गंगानदीबाबत भारतीय जनमानसात पवित्र असे स्थान आहे. गंगेचे पाणी अमृततुल्य मानून त्यात ब्रह्मतत्त्व असल्याची मान्यता प्राचीन काळापासून लोकांमध्ये आहे.

नीरीच्या वैज्ञानिकांवर संशोधनाची जबाबदारीनिशांत वानखेडे  नागपूरगंगानदीबाबत भारतीय जनमानसात पवित्र असे स्थान आहे. गंगेचे पाणी अमृततुल्य मानून त्यात ब्रह्मतत्त्व असल्याची मान्यता प्राचीन काळापासून लोकांमध्ये आहे. लोकांच्या या मान्यतेला वैज्ञानिक जोड देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या नद्या व गंगा पुनर्वसन मंत्रालयातर्फे केला जात आहे. गंगेच्या पाण्यात असणारे मानवी आणि सजीवसृष्टीच्या फायद्याचे औषधीतत्त्व पूर्वी असलेल्या प्रमाणात आहेत की प्रदूषणामुळे त्यांचा ऱ्हास झाला, याच्या संशोधनाचे काम नॅशनल एनव्हायर्नमेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट(नीरी)मध्ये सध्या सुरू आहे.सरकारच्या ‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’अंतर्गत गंगानदीमध्ये झालेले प्रदूषण व गंगासफाईची एकू णच जबाबदारी नागपूरच्या नीरी संस्थेवर सोपविण्यात आली आहे. या संशोधनाच्या कामात नीरीच्या १३ वैज्ञानिकांची टीम कार्यरत असून नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांच्या मार्गदर्शनात व डॉ. पवन लाभशेटवार यांच्या नेतृत्वात ही टीम कार्यरत आहे. या अभियानांतर्गत औषधीतत्त्वांचे संशोधन हाही महत्त्वाचा भाग आहे. गंगेच्या पाण्यात औषधीतत्त्व होते की नाही, कोणकोणत्या औषधीतत्त्वांचा पाण्यात समावेश आहे, आता याचे प्रमाण किती आहे व प्रमाण कमी झाले असेल तर प्रदूषणाचा या तत्त्वांवर कसा परिणाम झाला, या महत्त्वपूर्ण बाबींचे संशोधन केले जाणार आहे. गंगासफाईचा हाच मुख्य बिंदू असून याच संशोधनाच्या आधारावर गंगासफाईचे अभियान राबविण्यात येणार असल्याचे संशोधन आणि विकास नियोजन विभागाचे प्रधान वैज्ञानिक डॉ. प्रकाश कुंभारे यांनी स्पष्ट केले. गंगा सफाईचा केंद्रबिंदूप्रदूषणामुळे या औषधीयुक्त ब्रह्मतत्त्वांची हानी झाले असेल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. विशेषत: शहरी वस्ती, नाल्यांमुळे येणारे प्रदूषण व कारखाने असलेल्या भागात ही शक्यता अधिक आहे. गंगेच्या पात्रातील ज्या भागात या तत्त्वांचे प्रमाण कमी आढळून येईल त्या भागाच्या सफाईवर अधिक भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.