शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

पेंचचा कालवा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:33 IST

नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली.

ठळक मुद्देनिधीअभावी कामे रखडली : ओलितासाठी पाणी मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली. हा कालवा जलाशयापासून पारशिवनी, रामटेक, मौदामार्गे भंडारा जिल्ह्यात जातो. मागील ३७ वर्षांत या कालव्याची एकदाही प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे एकीकडे पाण्याचा अपव्यय वाढला असून, दुसरीकडे शेतकºयांना ओलितासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. त्यातच निधीअभावी कालवा दुरुस्तीची कामे रखडल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागातील अधिकारी देतात.पेंच जलाशय हे नागपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले होते. या जलाशयातील पाणी नागपूर शहराला पिण्यासाठी तसेच कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला विजेच्या उत्पादनासाठी पाणी दिले जाते; शिवाय पारशिवनी, रामटेक, मौदा आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठीही पाणी उपलब्ध करून दिले जाते. यासाठी डावा आणि उजवा अशा दोन मुख्य कालव्यांची १९८० मध्ये निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजवर या कालव्यांची कधीच प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही.या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने अधूनमधून निधी मंजूर केला. परंतु, भ्रष्टाचारामुळे या कालव्यांची कधीच प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी, मुख्य कालव्यांच्या भिंतीवर ठिकठिकाणी झुडपे वाढली असून, त्यांच्या मुळांमुळे भिंतीला तडा जाऊ लागल्या. एवढेच नव्हे तर खेकड्यांनी भिंती पोखरल्याने कालव्यातील पाणी झिरपण्याचे तसेच पाण्याचा अपव्यय होण्याचे प्रमाणही वाढत गेले.अभियंत्यांनी केली पाहणीपेंच लाभक्षेत्राचे मुख्य अभियंता आर. एम. चव्हाण, कार्यकारी अभियंता जे. बी. तुरखेडे, उपविभागीय अभियंता आर. एम. धोटे यांनी या कालव्याची व वितरिकांची नवरगाव जंक्शन, रामटेक, निमखेडा, खात, शहापूर, सातोना, रेवराळ, नेरी, मौदा, भंडारा या भागात पाहणी केली. कालव्याचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी मिळाले की नाही, याचीही या अभियंत्यांनी चौकशी केली. त्यांना प्रत्येक ठिकाणी कालव्याची दुर्दशा दिसून आली. परंतु, दुरुस्तीबाबत विचारणा केल्यावर या अभियंत्यांनी निधी मिळत नसल्याचे कारण पुढे केले. ही पाहणी कालव्याच्या दुरुस्तीसाठी नसून, शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.