शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आठवी पर्यंतच्या शाळा बंद कराव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST

नागपूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होताच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा ...

नागपूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होताच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने आठवीपर्यंतच्या सुरू झालेल्या शाळा बंद कराव्या, असा बालरोग तज्ज्ञांचा सूर होता.

अ‍ॅकेडमी ऑफ पेडिायट्रिक्सच्यावतीने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विजय धोटे तर सचिव डॉ. पंकज अग्रवाल यांच्यासह डॉ. अविनाश गावंडे, डॉ. मराठे, डॉ. वसंत खळतकर, डॉ. जयंत उपाध्याय, डॉ. संजय पाखमोडे, डॉ. संजय देशमुख व डॉ. योगेश पापडे आदी उपस्थित होते.

कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच काळात माध्यमिक शाळा सुरू आहेत. पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी कोरोना चा धोक्याबाबत गंभीर राहत नाही. यामुळे त्यांच्याकडून मास्कचा वापर, शारीरिक अंतर, सॅनिटायझरचा वापर होईलच असे नाही. परिणामी, त्यांच्यामध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो. यामुळे तूर्तास तरी आठवीपर्यंतच्या शाळा नको, असे तज्ज्ञांचे म्हणणे होते.

-विद्यार्थ्यांमध्ये वाढले मोबाईलचे व्यसन

लॉकडाऊनमध्ये मुले घरीच होती. यातच शाळेचे ऑनलाईन वर्गाला सुरूवात झाल्याने अनेकांच्या हातात मोबाईल आले. सुरुवातीला त्यांच्या हातातील मोबाईलकडे पालकांचे लक्ष होते. परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे मुलांमध्ये मोबाईलच्या व्यसनासोबतच पोर्नाेग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी पुढील धोका ओळखून मुलांशी मैत्री वाढवावी. चांगल्या वाईट परिणामाची माहिती द्यावी. शक्य झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.