शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

आठवी पर्यंतच्या शाळा बंद कराव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST

नागपूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होताच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा ...

नागपूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होताच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने आठवीपर्यंतच्या सुरू झालेल्या शाळा बंद कराव्या, असा बालरोग तज्ज्ञांचा सूर होता.

अ‍ॅकेडमी ऑफ पेडिायट्रिक्सच्यावतीने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विजय धोटे तर सचिव डॉ. पंकज अग्रवाल यांच्यासह डॉ. अविनाश गावंडे, डॉ. मराठे, डॉ. वसंत खळतकर, डॉ. जयंत उपाध्याय, डॉ. संजय पाखमोडे, डॉ. संजय देशमुख व डॉ. योगेश पापडे आदी उपस्थित होते.

कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच काळात माध्यमिक शाळा सुरू आहेत. पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी कोरोना चा धोक्याबाबत गंभीर राहत नाही. यामुळे त्यांच्याकडून मास्कचा वापर, शारीरिक अंतर, सॅनिटायझरचा वापर होईलच असे नाही. परिणामी, त्यांच्यामध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो. यामुळे तूर्तास तरी आठवीपर्यंतच्या शाळा नको, असे तज्ज्ञांचे म्हणणे होते.

-विद्यार्थ्यांमध्ये वाढले मोबाईलचे व्यसन

लॉकडाऊनमध्ये मुले घरीच होती. यातच शाळेचे ऑनलाईन वर्गाला सुरूवात झाल्याने अनेकांच्या हातात मोबाईल आले. सुरुवातीला त्यांच्या हातातील मोबाईलकडे पालकांचे लक्ष होते. परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे मुलांमध्ये मोबाईलच्या व्यसनासोबतच पोर्नाेग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी पुढील धोका ओळखून मुलांशी मैत्री वाढवावी. चांगल्या वाईट परिणामाची माहिती द्यावी. शक्य झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.