शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा पहिला ठोका आज

By admin | Updated: June 26, 2014 00:59 IST

शाळेच्या वर्गखोल्यांतील प्रत्येक कोपऱ्याची आकर्षक सजावट, प्रवेशद्वारावर मनमोहक रांगोळ्या, दरवाजांवर सुगंधितफुलांच्या माळा, येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्पाने होणारे स्वागत!

पहिली घंटा प्रवेशोत्सवाची : विद्यार्थ्यांचे होणार स्वागतनागपूर : शाळेच्या वर्गखोल्यांतील प्रत्येक कोपऱ्याची आकर्षक सजावट, प्रवेशद्वारावर मनमोहक रांगोळ्या, दरवाजांवर सुगंधितफुलांच्या माळा, येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्पाने होणारे स्वागत! विद्यार्थ्यांचा पहिला दिवस स्मरणीय व्हावा आणि त्यांचा उत्साह आणखी वाढावा, याकरिता हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करण्याची तयारी शाळांतर्फे करण्यात आली आहे. गुरुवारी शालेय सत्राच्या पहिल्याच दिवशी निरनिराळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या प्रवेशोत्सवासाठी तसेच मोठ्या सुटीनंतर मित्र-मैत्रिणी भेटणार म्हणून विद्यार्थ्यांमध्येदेखील उत्साह आहे . शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवी पाठ्य़पुस्तके आणि गणवेशांचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी पुस्तक दिंडी आणि प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. शहरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे. खासगी शाळांमध्येदेखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शाळांना यासंदर्भातील निर्देशदेखील जारी करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात ३,८६३ शाळा आहेत, यात १९ शासकीय, जिल्हा परिषदेच्या १,५८२, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या २८३ तर खासगी १,९७९ शाळांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)सायकल, गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप-२६ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सायकल, गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे निर्देश शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आले होते. दरवर्षीचा अनुभव विचारात घेता यंदा विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळेल, असे नियोजन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थी-पालकांची तयारी पूर्ण-दरम्यान, शाळेच्या नवीन सत्रासाठी विद्यार्थी व पालकांची तयारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. विशेषत: पहिलीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी तर उत्साह दिसून येत होता. दप्तर, वॉटरबॅग, कपडे इत्यादींची तयारी करणे सुरू होते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सोडायला कोण कोण जाणार, याची चर्चादेखील अनेक घरांत रंगली होती.