शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

गरिबीच्या चटक्यांमुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

By admin | Updated: December 6, 2015 03:28 IST

गरिबीचे चटके मुलांना लहानपणातच मोठे बनविते. कळकळ, तळमळ त्यांच्या लवकरच लक्षात येते. काय चांगले,

शारीरिक अन् मानसिक वेदना : तिने करून घेतली सुटकानागपूर : गरिबीचे चटके मुलांना लहानपणातच मोठे बनविते. कळकळ, तळमळ त्यांच्या लवकरच लक्षात येते. काय चांगले, काय वाईट त्याची जाण नसली तरी आपल्यामुळे आप्तांना होत असलेला त्रास त्यांना जाणवतो. त्यातून अस्वस्थ झालेली काही अल्पवयीन मुलं आत्मघातकी निर्णय घेतात. असाच निर्णय घेत रागिणी बबन बोरकर (वय १३) या शाळकरी मुलीने शनिवारी सकाळी गळफास लावला अन् स्वत:ची शारीरिक व मानसिक त्रासातून सुटका करून घेतली. तिच्या आत्महत्येनंतर चर्चेला आलेल्या परिस्थितीमुळे मानकापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मानकापूर हद्दीत पिटेसूर खाण वस्ती आहे. येथे बबन बोरकर (वय ३५) राहतो. तो खाणीवर चालणाऱ्या वाहनावर ड्रायव्हर होता. काम बंद झाल्याने सध्या तो मिळेल ते काम करतो. त्याची पत्नी धनश्री मोलमजुरी करते. त्यांना रागिणी आणि अन्य दोन मुले आहेत. दिवसभर कमवायचे आणि रात्रीची सांज भागवायची, अशी या कुटंबाची स्थिती आहे. त्यांच्या झोपडीला धड दारही नाही. तेथे बाकी गोष्टीची काय सोय असेल याची कल्पना केलेलीच बरी. बबनची मोठी मुलगी रागिणी आठव्या वर्गात शिकत होती. तिला काही तासांपासून डोक्याच्या त्रासाचा आजार जडला. परिस्थिती नसूनही बबन आणि त्याची पत्नी रागिणीला दवाखान्यात नेत होते. मात्र, आराम पडत नव्हता. रागिणीला डोकेदुखीमुळे असह्य वेदना होत होत्या. घरी दोन दोन दिवस खायची सोय नसताना डोकेदुखीच्या वेदना, त्यात स्वत:सोबतच आईवडिलांची होणारी परवड तिला कमालीचा मानसिक त्रास देत होती. स्वत:चा त्रास कमी होण्याचे नाव घेत नव्हता अशात आपल्या आजारामुळे आईवडिलातील विसंवादाने ती अस्वस्थ झाली आणि शनिवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत तिने चिंध्यांची दोरी बनवून गळफास लावून आत्महत्या केली. शेजारची महिला झोपडीसमोरून जात असताना तिला रागिणी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. तिने आरडाओरड केली. शेजारी गोळा झाले. बबन आणि धनश्रीलाही शेजाऱ्यांनी शोधून आणले.(प्रतिनिधी) गरीब शेजाऱ्यांची धावपळदारिद्र्याचे चटके अन् पोटाची आग यामुळे मेटाकुटीला आलेली बबन बोरकरची दोन मुले आठ दिवसांपासून नाशिकला मामांकडे गेली. ती तेथेच आहे. इकडे रागिणीने स्वत:ची अशा प्रकारे सुटका करून घेतली. गोळा झालेल्या शेजाऱ्यांनी धावपळ करीत रागिणीच्या अंत्यसंस्काराची तयारी करतानाच बोरकर दाम्पत्यालाही सावरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रशासन आणि समाज आता या कुटुंबाची कशी मदत करतो, त्याकडे पिटेसूर वस्तीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.