शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीच्या चटक्यांमुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

By admin | Updated: December 6, 2015 03:28 IST

गरिबीचे चटके मुलांना लहानपणातच मोठे बनविते. कळकळ, तळमळ त्यांच्या लवकरच लक्षात येते. काय चांगले,

शारीरिक अन् मानसिक वेदना : तिने करून घेतली सुटकानागपूर : गरिबीचे चटके मुलांना लहानपणातच मोठे बनविते. कळकळ, तळमळ त्यांच्या लवकरच लक्षात येते. काय चांगले, काय वाईट त्याची जाण नसली तरी आपल्यामुळे आप्तांना होत असलेला त्रास त्यांना जाणवतो. त्यातून अस्वस्थ झालेली काही अल्पवयीन मुलं आत्मघातकी निर्णय घेतात. असाच निर्णय घेत रागिणी बबन बोरकर (वय १३) या शाळकरी मुलीने शनिवारी सकाळी गळफास लावला अन् स्वत:ची शारीरिक व मानसिक त्रासातून सुटका करून घेतली. तिच्या आत्महत्येनंतर चर्चेला आलेल्या परिस्थितीमुळे मानकापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मानकापूर हद्दीत पिटेसूर खाण वस्ती आहे. येथे बबन बोरकर (वय ३५) राहतो. तो खाणीवर चालणाऱ्या वाहनावर ड्रायव्हर होता. काम बंद झाल्याने सध्या तो मिळेल ते काम करतो. त्याची पत्नी धनश्री मोलमजुरी करते. त्यांना रागिणी आणि अन्य दोन मुले आहेत. दिवसभर कमवायचे आणि रात्रीची सांज भागवायची, अशी या कुटंबाची स्थिती आहे. त्यांच्या झोपडीला धड दारही नाही. तेथे बाकी गोष्टीची काय सोय असेल याची कल्पना केलेलीच बरी. बबनची मोठी मुलगी रागिणी आठव्या वर्गात शिकत होती. तिला काही तासांपासून डोक्याच्या त्रासाचा आजार जडला. परिस्थिती नसूनही बबन आणि त्याची पत्नी रागिणीला दवाखान्यात नेत होते. मात्र, आराम पडत नव्हता. रागिणीला डोकेदुखीमुळे असह्य वेदना होत होत्या. घरी दोन दोन दिवस खायची सोय नसताना डोकेदुखीच्या वेदना, त्यात स्वत:सोबतच आईवडिलांची होणारी परवड तिला कमालीचा मानसिक त्रास देत होती. स्वत:चा त्रास कमी होण्याचे नाव घेत नव्हता अशात आपल्या आजारामुळे आईवडिलातील विसंवादाने ती अस्वस्थ झाली आणि शनिवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत तिने चिंध्यांची दोरी बनवून गळफास लावून आत्महत्या केली. शेजारची महिला झोपडीसमोरून जात असताना तिला रागिणी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. तिने आरडाओरड केली. शेजारी गोळा झाले. बबन आणि धनश्रीलाही शेजाऱ्यांनी शोधून आणले.(प्रतिनिधी) गरीब शेजाऱ्यांची धावपळदारिद्र्याचे चटके अन् पोटाची आग यामुळे मेटाकुटीला आलेली बबन बोरकरची दोन मुले आठ दिवसांपासून नाशिकला मामांकडे गेली. ती तेथेच आहे. इकडे रागिणीने स्वत:ची अशा प्रकारे सुटका करून घेतली. गोळा झालेल्या शेजाऱ्यांनी धावपळ करीत रागिणीच्या अंत्यसंस्काराची तयारी करतानाच बोरकर दाम्पत्यालाही सावरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रशासन आणि समाज आता या कुटुंबाची कशी मदत करतो, त्याकडे पिटेसूर वस्तीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.