शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालयांनी सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यावा

By admin | Updated: July 10, 2017 01:37 IST

समाजातील नव्या बदलांची सुरुवात ही शिक्षण क्षेत्रापासूनच होत असते. जग आता सौरऊर्जेकडे वळत असून राज्यातील महाविद्यालयांनीदेखील यासंदर्भात पुढाकार घेतला पाहिजे.

चंद्रशेखर बावनकुळे : राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या अधिवेशनाला सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील नव्या बदलांची सुरुवात ही शिक्षण क्षेत्रापासूनच होत असते. जग आता सौरऊर्जेकडे वळत असून राज्यातील महाविद्यालयांनीदेखील यासंदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. सौरऊर्जेचा नियमित व नियोजनबद्ध वापर सुरू झाल्यास ८० टक्के विजेची बचत होऊ शकते, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या ३७ व्या अधिवेशनाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य संघटना व धनवटे नॅशनल कॉलेजतर्फे महाविद्यालयाच्याच परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.अरुण शेळके हे होते. याशिवाय उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, विभागीय सहसंचालक डॉ.अंजली रहाटगावकर, ‘नॅक’चे सल्लागार डॉ.जगन्नाथ पाटील, राष्ट्रीय प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष ब्रह्मभट, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, प्राचार्य डॉ. बबन तायवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात शाळा-महाविद्यालयांचे ‘डिजिटलायझेन’ होत आहे. मात्र भविष्यात विजेची आवश्यकतादेखील वाढणार आहे. त्यामुळे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्या संस्था सौरऊर्जा प्रकल्प उभारतील त्यांना शासन ५० टक्के अनुदान देईल, असे आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिले. उच्चशिक्षणाच्या विकासात प्राचार्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. शिक्षण क्षेत्रासाठी शासनाने आर्थिक तरतूद वाढविण्याची गरज आहे. शिक्षणाचे खासगीकरण वेगाने होत असून हे भविष्यासाठी चांगले नाही. राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. सुभाष ब्रह्मभट म्हणाले. शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा फटका देशाच्या विकासाच्या गतीला बसेल. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत कामा नये असे अ‍ॅड. शेळके म्हणाले. डॉ. तायवाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले तर डॉ. टाले यांनी आभार मानले. अधिवेशनात राज्यभरातील ४५० हून अधिक प्राचार्य सहभागी झाले आहेत.